सरकारकडे भरपूर पैसा आहे; मग कृत्रिम पाऊस का? पाडत नाही,शेतकऱ्यांची सरकारला मागणी...
आधुनिक केसरी न्यूज
राजरत्न भोजने
औरंगाबाद : या वर्षीचा मान्सूनचा पाऊस सुरुवातीला थोड्या प्रमाणात झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात खरिपाची पिके उध्वस्त होत असून खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, मका, बाजरी हे पिके कोलमडून गेली आहे. सुरुवातीच्या मान्सूनने दगा दिल्यामुळे खरिप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले,असून आता रब्बीच्या पिकांसाठी शेतकरी परतीच्या मान्सूनकडे वाट पाहत बसला आहे.
यावर्षी बरसलेला मान्सून कोकण आणि विदर्भामध्ये चांगला झाला असला तरी मराठवाडा आणि नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात मात्र मान्सूनने दगा दिला आहे. त्यामुळे या 11 जिल्ह्यांमध्ये खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. परतीचा मान्सून देखील चांगला झाला नाही तर या जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे.
सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा :-
मराठवाड्यात कमी प्रमाणात मान्सून बरसल्याने धरणात एकूण उपलब्ध असलेला पाणीसाठ्यापैकी जायकवाडी धरणात 33 टक्के,माजलगाव 13 टक्के,मांजरा 23टक्के,विष्णुपरी 85टक्के आहे,हा पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने पाणी पिण्याची समस्या उदभवणार आहे.
महिनाभर पाऊस पडला नाही तर काय परिस्थिती येईल :-
पाणी हे आपल्या जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी पडलेच नाही यर सर्व नद्या कोरड्या पडतील, ज्यामुळे या भागातील जीवनमानावर गंभीर परिणाम होईल. तसेच झाडे सुकतील. झाडे त्यांची पाने सोडण्यास सुरवात करतील, ज्यामुळे हवेत परत ऑक्सिजनचे प्रमाण खराब होईल. सर्वत्र शेती उद्योगाची वाफ होईल. यामुळे लोक, पशुधन आणि तसेच, सर्व काही आणि प्रत्येकाच्या अन्न संसाधनांवर महत्त्वपूर्ण ताण पडेल. ती संपूर्ण ऑक्सिजन नसलेली गोष्ट अखेरीस आपल्या सर्वांचा जीव घेऊ शकते, परंतु कदाचित आपल्याला इतर मार्गांनी त्रास होईल…
आपल्याकडे लक्षणीय प्रमाणात पाणी साठले असले तरी ते पाच वर्षे टिकणार नाही.आमच्याकडे असलेले पाणी आम्हाला रेशन करावे लागेल,परंतु ते टिकणार नाही. कदाचित आपण कसे तरी पाण्याचे संश्लेषण करू शकू, परंतु त्यासाठी खूप ऊर्जा लागेल आणि जगाच्या ऊर्जेचा एक हिस्सा सामान्यत: जलविद्युत स्त्रोतांद्वारे निर्माण केला जातो, जो या वर्षा-नंतरच्या जगात फारसा सामान्य नसेल. मला खात्री आहे की काही काळासाठी पृष्ठभागावरील पाण्याचे स्त्रोत शिल्लक असतील, परंतु ते मृत प्राण्यांमुळे प्रदूषित होतील.
शेतकऱ्यांची मागणी कृत्रिम पाऊस पाडा :-
मराठवाड्यापाठोपाठ आता खानदेशामधूनही कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. खरे तर मागील दोन दशकांचा विचार केला असता एखादे-दुसरे वर्ष वगळता दरवर्षी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून झाली आहे. शेतकऱ्यांनी आग्रह धरल्यावर शासन-प्रशासन कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करण्यास सुरुवात करते. अनेकदा याबाबत निर्णय होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. निर्णय झालाच तर कुठे, कसा पाऊस पाडायचा याबाबत हालचाली सुरू होतात. कृत्रिम पावसाची यंत्रणा जुळवाजुळव करून उभी करण्यास विलंब होतो आणि पुन्हा वेळ निघून गेल्याने निर्णय बासनात गुंडाळून ठेवावा लागतो. निर्णय झाला, यंत्रणा उभारली, प्रयोग झाले तरी राज्यात कृत्रिम पावसाचे बहुतांश प्रयोग फसलेले आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर काही ठिकाणी पाऊस झालाच तर तो नैसर्गिक की कृत्रिम याबाबत शास्त्रज्ञांतच वाद होतात.
कृत्रिम पाऊस म्हणजे काय :-
पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान,वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते.
अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस.
ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते.
एखादा सूक्ष्म कण हा पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिम रित्या घडवून आणावी लागते.
त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषून्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला की बाष्प पावसाचे थेंब म्हणून खाली पडते.
एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात. चीन येथे ओलम्पिक पूर्वी तर रशिया तही असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार फार मोठा असतो. तिथेसुद्धा सोडियम आयोडाईडचे ‘कण’ फवारले की गारांची संख्या वाढते, पण त्यांचा आकार कमी होऊ शकतो
कृत्रिम पाऊस खर्चिक बाब :-
कृत्रिम पाऊस खर्चिक बाब आहे,यासाठी विमाने वैगरे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो,उष्ण ढगात 14 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे थेंब नसतात, अशावेळी ढगामध्ये सोडिअम क्लोराईड किंवा मिठाच्या 4 ते 11 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराची पावडर फवारली जाते. मिठाला पाण्याचं आकर्षण असल्यामुळे हे कण ढगात पसरतात.
कृत्रिम पाऊस 30 % यशस्वी होते :-
जगभरात कृत्रिम पावसाचे खूप सारे प्रयोग झाले आहेत त्यापैकी केवळ 30 टक्के ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विचार करून मगच हा निर्णय घ्यायचा असतो. कृत्रिम पावसाचं शास्त्र अजूनही पूर्णपणे विकसित होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अगदी अगतिकता असेल, तरच कृत्रिम पावसाचा प्रयोग करायला हवा
चिन देश कृत्रिम पाऊस पाडण्यात यशस्वी :-
1959 मध्ये, क्लाउड सीडिंग कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र सत्तेद्वारे अस्तित्वात होते व्यंगचित्रकाराला प्रेरणा आणि मुक्तता.जनरल इलेक्ट्रिक काम करणारे रसायन, व्हिटीन्सेंट शेफर, या पहिल्या वापरासाठी अस्तित्वात होते. ते आम्हांला लक्षात ठेवा की, त्यांच्या संरक्षणकरीता त्यांच्या सिरसवादाला जन्म, चक्रीविरोधक शस्त्रास्त्रे या संशोधकाचा विस्तार करण्यासाठी जनरल इलेक्ट्रिक सह सेना सामील होते.ढगांच्या खालच्या थरार सिल्व्हर आयोडून बीजन तंत्राचा वापर करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.मात्र चीनचा कृत्रिम पाऊस पडण्याचा फर्मूला जगाला दिलेला नाही.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List