सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या

वाकुळणी (काशिगिरी तांडा) येथील  शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज

सोपान कोळकर

बदनापूर : नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या मानसिक ताणाला कंटाळून वाकुळणी (काशिगिरी तांडा) येथील गोरख एकनाथ राठोड (वय ४०) यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याची हृदयद्रावक घटना १ डिसेंबर २०२५ रोजी घडली. गावाजवळील शेतात त्यांनी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.गोरख राठोड यांच्या अवघ्या दोन एकर शेतीवरच उदरनिर्वाह चालत होता. सततच्या नापिकीमुळे उत्पन्न घटत असतानाच जालना येथील आयसीआयसीआय बँकेचे तब्बल ३ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर होते. कर्जफेडीचा वाढता तगादा, आर्थिक अडचणी आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली.

घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तसेच महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनाने कुटुंब उघड्यावर पडले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्याच्या मागे पत्नी, तीन मुली आणि दोन मुलांचा असा मोठा परिवार असून त्यांच्यावर अचानक आर्थिक संकट कोसळले आहे. कुटुंबाकडे कोणताही आधार किंवा पर्याय नसल्याने त्यांचे भवितव्य प्रश्नचिन्हात आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबवण्यासाठी आणि पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.दरम्यान स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांनी प्रशासनाने तातडीने राठोड कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

"शेतकऱ्याची आत्महत्या हि खूपच दुःखद घटना आहे. आम्ही शासनस्तरावर पंचनामा केला असून याबाबत वरिष्ठांना लवकरच अहवाल पाठविण्यात येणार आहे. शासकीय नियमानुसार योग्य ती मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणत्याही शेतकऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलू नये अशी आम्ही विनंती करत आहोत."

श्रीमती तेजस्विनी जाधव, तहसीलदार बदनापूर.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर  शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
आधुनिक केसरी न्यूज  कुडूत्री : राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी, विविध संघटना व पालक यांच्या...
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी
मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड 
कारगिल चौकातील अपघाताने गडचिरोली हादरले; “आधी नागरिक गेले, आज आरोग्य सभापती” : नगरपरिषदेसाठी इशार्‍याची घंटा