मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग

मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग

आधुनिक केसरी न्यूज 

विनोद पाटील बोडखे 
 

रिसोड : तालुक्यात काल दिनाक 10 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्याने रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मान्सून पुर्व पाऊस न झाल्याने शेतातील कामे खोळंबली होती.खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला तरी मशागतीच्या कामांना   सुरुवात झाली नव्हती. काल मृग नक्षत्राच्या पावसाच्या दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून मोठा आनंद उत्साह व्यक्त करण्यात येत असून आज शेतकरी आपल्या खरीप पिकांच्या लागवडीसाठी कामाला लागले असून. लोणी बुद्रुक परिसरात हळद लागवडीला देखील सुरुवात करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. रिसोड तालुका हा पूर्वी कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध होता. मात्र हल्ली कपाशीची लागवड मात्र नामशेष झाली असून हा पट्टा सोयाबीन पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तसेच रिसोड  तालुक्यात सोयाबीन बरोबरच तूर देखील मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.विशेषतः या परिसरातील तूर ही मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने खण्यास उपयुक्त असल्याने या भागात उत्पादित तुरीला मोठी मागणी आहे.
 शेतकरी कामाला लागला असून गावात मात्र शुकशुकाटाचे वातावरण असून कृषी सेवा केंद्रावर मात्र शेतकऱ्यांची बी बियाणे खते खरेदी साठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच  मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

यावर्षी उन्हाळ्यात एकही अवकाळी पाऊस पडला नाही त्यामुळे शेतातील नागरणी केलेल्या शेताचे ढेकळे अजूनही तशीच होती. काल मृग नक्षत्राचा चांगला पहिलाच पाऊस झाल्याने  पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

प्रवीण बोडखे  शेतकरी

काल तालुक्यात दमदार पाऊस झाला या पाऊसाने शेतातील कामे सुरू झाली असून आमच्या भागात हळद लागवडीला देखील सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी खरीप पीक पेरणीसाठी आपली शेत तयार करत आहेत.एकंदरीत बळीराजा सुखावला असून एक नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.

शंकर बोडखे युवा शेतकरी लोणी बु

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा...
पत्रकारीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर गंगासागरे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : वरिष्ठ सहायकपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा  
देगलूर तालुक्यातील  तमलूरचा सचिन वनंजे  शूर पुत्र देशासाठी शहीद 
शिळ्या आरोपांवरून केलेली सेवासमाप्ती चूकच  : उच्च न्यायालयाचा निर्वाळा
पाणी जपून वापरा ! पुण्यातील 'या' भागात होणार पाणी कपात
शेळगाव गौरी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटार व केबलची चोरी