पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने

पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने

 

आधुनिक केसरी न्यूज 

धुळे : पॅकींग अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारणी केली जाणार असून केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे, त्यामुळे हा जीएसटी रद्द करावा,अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धुळे व्यापारी महासंघाने म्हटले आहे की, सतत वाढत असलेल्या महागाईच्या वाढत्या आलेखात आता अजून भर पडणार आहे . सर्वसाधारण नागरीकांच्या दैनंदिन वापराच्या धान्यावर केंद्र शासन आता ५ टक्के जीएसटीची आकारणी करणार आहे , असे नुकतेच जाहीर झाले आहे . पूर्वी ब्रॅण्डेड पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जात होती . पण आता सर्वच पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जाणार आहे केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे . व्यापारी वर्गाला अजून नवीन कराचा भार सहन करावा लागणार आहे . यासाठी नव्याने कर सल्लागार , अकाउंटंट व संगणकाचा खर्च वाढणार आहे . त्याबरोबरच सर्वसामान्य नागरीकांनाही ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे यावाढीव करामुळे सामान्यांचे बजेट चुकणार आहे . अन्नवस्त्र निवारा या मुलभुत गरजांना किमान व्यापारी वर्गाच्यावतीने महासंघाचे करकक्षातून दुर ठेवावे अशी मागणी अध्यक्ष नितीन बंग , अजय बरडीया , अनिल रुणवाल , झुल्फीखार अब्बास बोहरी , नंदु सोनार यांनी केले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? ... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?
आधुनिक केसरी मुंबई  : राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी...
वारकरी परतीच्या प्रवासात ...सकाळीच कालावाटुन केली षष्ठीची सांगता
पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयासाठी १५ एकर भूसंपादनाचा शासननिर्णय
तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी
शेतकऱ्यांना सरकार घाबरले ;पोलिसांनी दंडुक्याच्या बळावर संवैधानिक आंदोलन चिरडले 
जय हो....बिल गेट्स यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल
उष्माघाताच्या लाटेपासून स्वत:चे संरक्षण करा : जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन