पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने

पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने

 

आधुनिक केसरी न्यूज 

धुळे : पॅकींग अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारणी केली जाणार असून केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे, त्यामुळे हा जीएसटी रद्द करावा,अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धुळे व्यापारी महासंघाने म्हटले आहे की, सतत वाढत असलेल्या महागाईच्या वाढत्या आलेखात आता अजून भर पडणार आहे . सर्वसाधारण नागरीकांच्या दैनंदिन वापराच्या धान्यावर केंद्र शासन आता ५ टक्के जीएसटीची आकारणी करणार आहे , असे नुकतेच जाहीर झाले आहे . पूर्वी ब्रॅण्डेड पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जात होती . पण आता सर्वच पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जाणार आहे केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे . व्यापारी वर्गाला अजून नवीन कराचा भार सहन करावा लागणार आहे . यासाठी नव्याने कर सल्लागार , अकाउंटंट व संगणकाचा खर्च वाढणार आहे . त्याबरोबरच सर्वसामान्य नागरीकांनाही ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे यावाढीव करामुळे सामान्यांचे बजेट चुकणार आहे . अन्नवस्त्र निवारा या मुलभुत गरजांना किमान व्यापारी वर्गाच्यावतीने महासंघाचे करकक्षातून दुर ठेवावे अशी मागणी अध्यक्ष नितीन बंग , अजय बरडीया , अनिल रुणवाल , झुल्फीखार अब्बास बोहरी , नंदु सोनार यांनी केले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!  नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे...
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार