धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घणाघाती टीका

धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :- मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात ४ सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोला त्यांनी लगावला आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
आधुनिक केसरी न्यूज  रोहित दळवी  वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या...
किशोर बारवकर, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू लढवय्या आणि उपनगराध्यक्ष
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
ज्ञानोत्सवाचे भव्य आयोजन, सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन : आमदार किशोर आप्पा पाटील 
मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना 
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान