धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घणाघाती टीका

धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :- मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात ४ सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोला त्यांनी लगावला आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुंबई 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'चे जागतिक केंद्र होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'चे जागतिक केंद्र होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज  संतोष पाटील  मुंबई : मुंबई ही देशाची 'एंटरटेनमेंट कॅपिटल' आहे आणि याच शहरातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
२५१५ योजनेत ६.९५कोटींचा बनावट शासन आदेश! आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी
काळे फासणाऱ्या इसमाचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद
वारणाली येथील मल्टीस्पेशालिटी दवाखान्याचे काम गतीने पूर्ण करण्याच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचना; तर काळ्याखाणी मधील कारंजे १५ ऑगस्ट पर्यंत सूर होणार
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याची तस्करी ; ५ संशयित ताब्यात तर १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; महात्मा गांधी चौक पोलिसांची कामगिरी
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय ; आरक्षणाकडे लागल्या सर्वांच्या नजरा