पोलीस - नक्षल चकमकित तीन नक्षल्यांचा खात्मा 

पोलीस - नक्षल चकमकित तीन नक्षल्यांचा खात्मा 

 आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परीसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती १३ मे रोजी सकाळी पोलिस विभागाला मिळाली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या दोन तुकड्या तातडीने परीसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परीसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर १ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्याचे मृतदेह आढळले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून तीन १ एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास रायफल, अशी तीन स्वयंचलित शस्त्रे तसेच नक्षल साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

यातील एका मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह पेरिमिली दलमचा प्रभारी आणि डीव्हीसीएम कमांडर वासू याचा असल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!  नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे...
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार