अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी विमान, लिअरजेट ४५, हे बारामती येथे विमान उतरवत असताना कोसळले. त्यात बसलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाचही जण ठार झाले आहेत. कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक हे विमानाचे नेतृत्व करत होते. लँडिंग दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे विमान शेतात कोसळले आणि मोठा स्फोट झाला ज्यामध्ये ही दुखद घटना घडल्याचे समोर आले आहे.
बुधवारी महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा असा काळा अध्याय घडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळा जवळ कोसळले. या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. या विमानाचे नेतृत्व अनुभवी पायलट कॅप्टन सुमित आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक करत होते, तर पिंकी माळी ही फ्लाइट अटेंडंट होती.
हे VSR व्हेंचर्स लिअरजेट ४५ विमान होते. ज्याचा नोंदणी क्रमांक VT-SSK होता. या विमानाचे एकूण वजन ९७५२ किलोग्रॅम होते. शांभवी पाठक ही २०२२ पासून कंपनीत होती. तिने मुंबई विद्यापीठातून विमान चालकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर तिने २०१८ ते २०१९ पर्यंत न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
अपघात कसा झाला?
सकाळी ९.०० ते ९:१५ च्या दरम्यान हा अपघात झाला असल्याचे सांगितल्या जाते. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. बारामती धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच विमानात तांत्रिक बिघाड झाला. यावेळी पायलटने मे डे, मे डे हा आपत्कालीन संदेशही दिला असल्याचे सूत्रानुसार कळते आहे. या बिघाडामुळेच धावपट्टीवर उतरण्याऐवजी ते जवळच्या शेतात कोसळले. विमान कोसळताच विमानाचे तुकडे झाले आणि त्याला आग लागली. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह इतर ५ जणांचा समावेश आहे.
डीजीसीए ने केली मृत्यूची पुष्टी केली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) नुसार, अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए), एक सुरक्षा रक्षक आणि दोन्ही वैमानिकांसह एकूण पाच जण अपघातात मृत्युमुखी पडले. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. डीजीसीएने अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, अजित पवार आज बारामतीमध्ये चार मोठ्या रॅलींना संबोधित करणार होते जाते का मोठ्या महिला मेळाव्याचे समाज होता. ज्यासाठी सकाळपासूनच समर्थकांची मोठी गर्दी बारामतीत जमली होती. तथापि, रॅली सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List