<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/tag/67/award" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>award - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/tag/67/rss</link>
                <description>award RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>अभिमानास्पद! २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज, हरनाझ संधू ठरली मानकरी</title>
                                    <description><![CDATA[‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ सिंधूनं जिंकलाय. मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. हरनाझच्या… Continue reading अभिमानास्पद! २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज, हरनाझ संधू ठरली मानकरी
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/782/-e0-a4-85-e0-a4-ad-e0-a4-bf-e0-a4-ae-e0-a4-be-e0-a4-a8-e0-a4-be-e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a4-a6--e0-a5-a8-e0-a5-a7--e0-a4-b5-e0-a4-b0-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-12/images-2.jpg" alt=""></a><br /><p>‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ सिंधूनं जिंकलाय.</p>    <p>मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.</p>    <p>हरनाझच्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट घातला गेला तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. “नवीन मिस युनिव्हर्स आहे…इंडिया,” असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलंय. क्लिपमध्ये मेक्सिकोची मिस युनिव्हर्स २०२० आंद्रिया मेझा भावनिक झालेल्या हरनाझला मुकुट घालताना दाखवली आहे.</p>    <p><strong>कोण आहे हरनाझ संधू</strong><strong>?</strong></p>    <p>चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.</p>    <img width="640" height="480" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/images-2.jpg" alt="" class="wp-image-3325"></img>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/782/-e0-a4-85-e0-a4-ad-e0-a4-bf-e0-a4-ae-e0-a4-be-e0-a4-a8-e0-a4-be-e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a4-a6--e0-a5-a8-e0-a5-a7--e0-a4-b5-e0-a4-b0-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/782/-e0-a4-85-e0-a4-ad-e0-a4-bf-e0-a4-ae-e0-a4-be-e0-a4-a8-e0-a4-be-e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a4-a6--e0-a5-a8-e0-a5-a7--e0-a4-b5-e0-a4-b0-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80</guid>
                <pubDate>Mon, 13 Dec 2021 11:06:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/images-2.jpg"                         length="31532"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नाम में क्या है?</title>
                                    <description><![CDATA[विशेष संपादकीय ! सूड, अपमान, धोका, बदला, आरोप-प्रत्यारोप, गद्दारी हे राजकारणाच्या डिजिटल डायरीतले शब्द अलीकडे क्षणाक्षणाला लाखो राजकारणी सर्च करत आहेत…
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/208/-e0-a4-a8-e0-a4-be-e0-a4-ae--e0-a4-ae-e0-a5-87-e0-a4-82--e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b9-e0-a5-88"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-08/images-32-2.jpeg" alt=""></a><br /><ul class="blocks-gallery-grid"><li class="blocks-gallery-item"><img width="302" height="402" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/images-32-1.jpeg" class="wp-image-1744" alt="images-32-1.jpeg"></img>माजी पंतप्रधान राजीव गांधी</li></ul>    <p>विशेष संपादकीय <br />डॉ. प्रभू गोरे,संपादक</p>    <p><br />सूड, अपमान, धोका, बदला, आरोप-प्रत्यारोप, गद्दारी हे राजकारणाच्या डिजिटल डायरीतले शब्द अलीकडे क्षणाक्षणाला लाखो राजकारणी सर्च करत आहेत. सत्ता, खुर्ची आली की जनतेचे काम कमी आणि विरोधकांचेच काम तमाम करण्याचा अजेंडा काही अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्ष राबवत आहेत. तिकडे टोकीओत ऑलम्पिकमध्ये आपले खेळाडू देशासाठी जीव तोडून खेळत असताना इकडे देशात राजकीय ऑलम्पिक सुरू झाले आहे. आपले बदलवीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्न पुरस्कारावरून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव काढून टाकले व मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी काय बदलतील याचा कोणालाही अंदाज घेता येत नाही. नोटाबंदीच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ते बदलण्यात किती माहीर आहेत, याचा साक्षात्कार संपूर्ण जगाला आला आहे. यामुळे कालच्या बदलाचा फारसा परिणाम काँग्रेस वगळता इतर कोणावरही झाला नाही आणि होण्याचे तसे काही कारणही नाही. खेळांच्या संबंधित पुरस्काराला खेळाडूचेच नाव शोभून दिसते. नामांतराचे स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावे देणे योग्य आहे. देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. १९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. असा देशातला सर्वोच्च पुरस्कार सध्या नामांतरामुळे बदनाम होऊ लागला आहे. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून देशासाठी वंदनीय आहेत. पण खेळाच्या पुरस्काराला त्यांचे नाव तेव्हा का दिले गेले हे त्या देणाऱ्यांनाच ठाऊक. एखाद्या गोष्टीला नाव देताना थोडा तरी मागचा पुढचा विचार करायला पाहिजे की नाही? का सत्ता आहे म्हणून मनाला येईल ते करायचे. देशात अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांचा आणि त्यांना देण्यात आलेल्या नावांचा काहीही संबंध नाही. मंत्रिमंडळाचे खातेवाटप करताना जसे मागासवर्गीय नेत्याला समाज कल्याण, महिलेला महिला व बालकल्याण, आदिवासी पुढाऱ्याला आदिवासी विकास खाते देता तसा विचार पुरस्काराला, वास्तूला, योजनेला नाव देतानाही का करत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्नचे नामांतर केले. ते करताना का केले, याचे स्पष्टीकरणही दिले. आता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्टेडियमला जे त्याचे नाव देण्यात आले आहे तेही बदलून टाकावे. अन्यथा आज त्यांनी जे पेरले आहे ते उद्या सरकार बदलल्यावर उगवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वच नामांतरवीरांना एक सल्ला आहे, “देना ही है तो काम देख के नाम दो। वरना ऐसे नाम मे क्या रखा है ।”</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>संपादकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/208/-e0-a4-a8-e0-a4-be-e0-a4-ae--e0-a4-ae-e0-a5-87-e0-a4-82--e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b9-e0-a5-88</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/208/-e0-a4-a8-e0-a4-be-e0-a4-ae--e0-a4-ae-e0-a5-87-e0-a4-82--e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b9-e0-a5-88</guid>
                <pubDate>Sun, 08 Aug 2021 05:46:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/images-32-2.jpeg"                         length="8588"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>साडी सोडून केली झोळी&amp;#8230;</title>
                                    <description><![CDATA[जळगाव :१६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते.
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/192/-e0-a4-b8-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a5-8b-e0-a4-a1-e0-a5-82-e0-a4-a8--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-b2-e0-a5-80--e0-a4-9d-e0-a5-8b-e0-a4-b3-e0-a5-80"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-08/deshdoot_2021-08_62edcceb-5e54-47dd-b606-dfa4a918a001_vimalabai_bhil-1.jpg" alt=""></a><br /><ul class="blocks-gallery-grid"><li class="blocks-gallery-item"><img width="1200" height="1322" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/deshdoot_2021-08_62edcceb-5e54-47dd-b606-dfa4a918a001_vimalabai_bhil.jpg" class="wp-image-1692" alt="deshdoot_2021-08_62edcceb-5e54-47dd-b606-dfa4a918a001_vimalabai_bhil.jpg"></img>विमलबाई भिल</li></ul>    <p>जळगाव :१६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर ही जखमी झाली. ५० फुट खोल दरीत हे विमान कोसळले डोंगराळ भाग असल्यामुळे रूग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नव्हती. आदिवसाी बांधवांनी विमानाची काच फोडून या तरूणीला बाहेर काढले. यावेळी ३ किमी लांबवर असलेल्या रूग्णवाहिकेजवळ तिला तात्काळ नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे विमलबाई भिल यांनी तात्काळ अंगावरची साडी काढून त्याची झोळी तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे तात्काळ रूग्णवाहिकेजवळ आणून इस्पितळात दाखल करता आले व या तरूणीचा प्राण  वाचला.</p>    <p>सदर घटनेत विमलबाई भिल यांनी प्रसंगावधान दाखवत मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. ११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी- चोळी देवून हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी विमलबाई भिल यांच्यासोबत अपघातस्थळी मदत करणाऱ्या ११ तरूणांचादेखील स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला जाणार आहे. ११ ऑगस्टला विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार सोहळ्यात विमलबाई भिल यांना हा पुरस्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन राहणार आहेत.<br /></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/192/-e0-a4-b8-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a5-8b-e0-a4-a1-e0-a5-82-e0-a4-a8--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-b2-e0-a5-80--e0-a4-9d-e0-a5-8b-e0-a4-b3-e0-a5-80</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/192/-e0-a4-b8-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a5-8b-e0-a4-a1-e0-a5-82-e0-a4-a8--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-b2-e0-a5-80--e0-a4-9d-e0-a5-8b-e0-a4-b3-e0-a5-80</guid>
                <pubDate>Fri, 06 Aug 2021 13:09:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/deshdoot_2021-08_62edcceb-5e54-47dd-b606-dfa4a918a001_vimalabai_bhil-1.jpg"                         length="265977"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या; नाना पटोले</title>
                                    <description><![CDATA[मुंबई: केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे.
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/190/-e0-a4-85-e0-a4-b9-e0-a4-ae-e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-a6-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-9f--e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-9f"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-08/images-34-1.jpeg" alt=""></a><br /><ul class="blocks-gallery-grid"><li class="blocks-gallery-item"><img width="640" height="480" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/images-34.jpeg" class="wp-image-1688" alt="images-34.jpeg"></img></li><li class="blocks-gallery-item"><img width="619" height="495" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/images-33.jpeg" class="wp-image-1687" alt="images-33.jpeg"></img></li></ul>    <p>मुंबई: केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे, असा नाना पटोलेंनी घणाघात केलाय. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे.</p>    <p><br />देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे.हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. त्यांचे नाव दिल्याचा आम्हालाआनंदच आहे, परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान आणि करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून, अशा पद्धतीने ते स्थान तसूभरही कमी होणार नाही,</p>    <p>राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल, तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते, परंतु त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलेच, त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृती भाजपा आणि संघाच्या द्वेषमूलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडे आपले सरकार क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचे किती हित जपते हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे काम करायचे, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही .मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>खेळ</category>
                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/190/-e0-a4-85-e0-a4-b9-e0-a4-ae-e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-a6-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-9f--e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-9f</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/190/-e0-a4-85-e0-a4-b9-e0-a4-ae-e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-a6-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-9f--e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-9f</guid>
                <pubDate>Fri, 06 Aug 2021 12:32:37 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-08/images-34-1.jpeg"                         length="24428"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        