<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/tag/35/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>राजकीय - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/tag/35/rss</link>
                <description>राजकीय RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>लॉकडाऊनमुळे लोक कंटाळलेत, संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन मनोरंजन करा; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना पत्र</title>
                                    <description><![CDATA[औरंगाबाद : गेली दोन वर्ष लॉकडाऊनमुळे सर्व लोक कंटाळलेले आहेत व आता उन्हामुळे त्रस्त झालेले आहेत. आपण उत्तर महाराष्ट्रातही सभा घेऊन या सर्व लोकांचे आपल्या उत्कृष्ट अशाा स्टॅन्डअप कॉमेडीने मनोरंजन करुन सर्वांना हसवावे, अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यासागर घुगे यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. विद्यासागर घुगे राज… Continue reading लॉकडाऊनमुळे लोक कंटाळलेत, संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन मनोरंजन करा; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना पत्र
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3058/-e0-a4-b2-e0-a5-89-e0-a4-95-e0-a4-a1-e0-a4-be-e0-a4-8a-e0-a4-a8-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-b3-e0-a5-87--e0-a4-b2-e0-a5-8b-e0-a4-95--e0-a4-95-e0-a4-82-e0-a4-9f-e0-a4-be-e0-a4-b3-e0-a4-b2-e0-a5-87-e0-a4-a4"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-04/untitled-design-2.jpg" alt=""></a><br /><p><strong>औरंगाबाद :</strong> गेली दोन वर्ष लॉकडाऊनमुळे सर्व लोक कंटाळलेले आहेत व आता उन्हामुळे त्रस्त झालेले आहेत. आपण उत्तर महाराष्ट्रातही सभा घेऊन या सर्व लोकांचे आपल्या उत्कृष्ट अशाा स्टॅन्डअप कॉमेडीने मनोरंजन करुन सर्वांना हसवावे, अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यासागर घुगे यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.<br /> विद्यासागर घुगे राज ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात म्हणतात, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या नात्याने आपणास आमंत्रित करतो की गुढीपाडव्यानिमित्त आपण घेतलेली सभा व त्यानंतर दिनांक 12/04/2022 रोजी घेणार असलेली उत्तर सभा बघता उत्तर महाराष्ट्रावर अन्याय होत असल्यासारखे वाटत आहे. गेली दोन वर्ष लॉकडाऊन मुळे सर्व लोक कंटाळलेले आहेत व आत्ता उन्हामुळे त्रस्त झालेले आहेत. आपण उत्तर महाराष्ट्रात देखील सभा घेऊन या सर्व लोकांचे आपल्या उत्कृष्ट अशा स्टॅन्डअप कॉमेडीने मनोरंजन करून सर्वांना हसवावे हि विनंती. आपण करत असलेल्या नकलांनी भारावलेला आपलाच, विद्यासागर घुगे. असे पत्रात नमुद आहे.</p> <p><img class="wp-image-8571 size-full" src="https://www.adhunikkesari.com/media/2022-04/fqkqwsqamaayd13.jpg" alt="Rashtrawadi Congress Letter To Raj Thackrey" width="873" height="1280"></img>Rashtrawadi Congress Letter To Raj Thackrey</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                            <category>लॉक डाऊन</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3058/-e0-a4-b2-e0-a5-89-e0-a4-95-e0-a4-a1-e0-a4-be-e0-a4-8a-e0-a4-a8-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-b3-e0-a5-87--e0-a4-b2-e0-a5-8b-e0-a4-95--e0-a4-95-e0-a4-82-e0-a4-9f-e0-a4-be-e0-a4-b3-e0-a4-b2-e0-a5-87-e0-a4-a4</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3058/-e0-a4-b2-e0-a5-89-e0-a4-95-e0-a4-a1-e0-a4-be-e0-a4-8a-e0-a4-a8-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-b3-e0-a5-87--e0-a4-b2-e0-a5-8b-e0-a4-95--e0-a4-95-e0-a4-82-e0-a4-9f-e0-a4-be-e0-a4-b3-e0-a4-b2-e0-a5-87-e0-a4-a4</guid>
                <pubDate>Thu, 14 Apr 2022 06:28:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-04/untitled-design-2.jpg"                         length="75012"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वरळी गॅस दुर्घटना : अनाथ बालकाच पालकत्व शिवसेना स्विकारणार &amp;#8211; महापौर</title>
                                    <description><![CDATA[मुंबई : वरळी येथील केशवआळीत राहणाऱ्या पुरी कुटुंबावर सोमवारी मोठं संकट ओढवलं. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 4 जण भाजले. यातील महिला विद्या पुरी यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यातील चार महिन्यांच्या मुलाचा सोमवारीच मृत्यू झाला. 24 तासानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतील पाच वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना… Continue reading वरळी गॅस दुर्घटना : अनाथ बालकाच पालकत्व शिवसेना स्विकारणार – महापौर
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/756/worli-gas-tragedy-shiv-sena-to-accept-guardianship-of-orphans-mayor"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-12/mumbai-mayor-kishori-pednekar-1.jpg" alt=""></a><br /><img width="1280" height="720" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/mumbai-mayor-kishori-pednekar.jpg" alt="" class="wp-image-3264"></img>    <p><strong>मुंबई :</strong> वरळी येथील केशवआळीत राहणाऱ्या पुरी कुटुंबावर सोमवारी मोठं संकट ओढवलं. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 4 जण भाजले. यातील महिला विद्या पुरी यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यातील चार महिन्यांच्या मुलाचा सोमवारीच मृत्यू झाला. 24 तासानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतील पाच वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. </p>    <p>किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ५ वर्षाचे अनाथ बाळ वाचविण्यासाठी प्रयत्नशील. बाळ वाचल्यास आम्ही दत्तक घेणार. पालकत्व आम्हीच स्विकारणार. बाळाची प्रकृती ठिक आहे. किशोरी पेडणेकर यांनी पुढे विरोधकांना उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की,’संवेदना बोंब मारून येणार नाहीत, तर त्या ह्रद्यातून याव्या लागतात’.</p>    <p>तसेच दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर टीका होत आहे. याला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ‘ब्लास्ट झाल्यावर सेनेचे कार्यकर्ते पोहचले होते. उपचाराकरता त्यांना तात्काळ रूग्णालयातही नेण्यात आले. मात्र थोडा संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांना नायर रूग्णालयात नेण्यात आले.’</p>    <p>पुढे महापौर म्हणाल्या की, तो व्हिडिओ कुणीही पाहिला तरी राग येण्यासारखाच होता.  ज्या कंपनीची गॅस टाकी होती, त्या कंपनीसोबतही बोलत आहोत. </p>    <h2><strong>आशिष शेलारांच्या टीकेला उत्तर </strong></h2>    <p>आशिष शेलार भ्रमिष्ट झालेत. पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने ते भ्रमिष्ट झालेत. महिलेबद्दल निजल्या हा शब्द ते वापरतात आणि पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतात. आज साडेतीन वाजता महिला आघाडी पोलिसांना भेटणार. कोवीड काळात तम्ही कुठल्या निजलेल्यांना अंगाई गात होते?  गोरखपूरमध्ये ६० मुले ऑक्सीजविना गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या, असा सवालही महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला? </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>death</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/756/worli-gas-tragedy-shiv-sena-to-accept-guardianship-of-orphans-mayor</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/756/worli-gas-tragedy-shiv-sena-to-accept-guardianship-of-orphans-mayor</guid>
                <pubDate>Tue, 07 Dec 2021 07:11:16 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/mumbai-mayor-kishori-pednekar-1.jpg"                         length="54342"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला</title>
                                    <description><![CDATA[यूपीए म्हणजे काय? आता युपीए नाही या ममता बॅनर्जींच्या यांच्या मुंबईतील वक्तव्यांनंतर २०२४ पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारत आहे. पण काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपाला तोंड देऊ शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया… Continue reading “महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/722/even-though-we-have-differences-in-maharashtra-we-sanjay-rauts-advice-to-mamata-from-upa-leadership"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-12/mamata-banerjee-sanjay-raut-and-aditya-thackeray-1.jpg" alt=""></a><br /><img width="1248" height="702" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/mamata-banerjee-sanjay-raut-and-aditya-thackeray.jpg" alt="" class="wp-image-3185"></img>    <p>यूपीए म्हणजे काय? आता युपीए नाही या ममता बॅनर्जींच्या यांच्या मुंबईतील वक्तव्यांनंतर २०२४ पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारत आहे. पण काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपाला तोंड देऊ शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.</p>    <p>“ममता बॅनर्जी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. भाजपाविरुद्ध जो लढा सुरु आहे त्यात महत्त्वपूर्ण लढा त्या देत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्याप्रकारे संघर्ष करुन विजय मिळवला तो प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला एक दिशा दिली आहे. युपीए कुठे आहे हा ममतांचा प्रश्न योग्य आहे. उद्धव ठाकरेंनीही वारंवार हाच प्रश्न विचारला आहे. जर युपीए नाही तर एनडीएसुद्धा कुठे आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण २०२४साठी वेगळी आघाडी उभी राहत असेल त्याचा काय फायदा होईल याचा विचार करायला हवा. जी आघाडी आधीपासून आहे त्याला आणखी मजबूत करा असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर हे योग्य नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.</p>    <p>काँग्रेससोबत मिळून काम केले तर चांगली आघाडी तयार होईल. यूपीए महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडी त्याचेच प्रतिक आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, असेही राऊत म्हणाले. “या गोष्टी सर्व आपल्याला विसरून जायला हव्यात. महाराष्ट्रातही आम्ही एकमेकांवर अनेक टीका करतो. पण भाजपाला थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि दोन वर्षांपासून आमचे सरकार चालत आहे. आम्ही एकत्र येवून काम करु शकतो हा आदर्श आम्ही देशासमोर उभा केला आहे. आम्ही परत ममतांची भेट घेऊ. आता युपीएला सोनिया गांधी चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल,” असे संजय राऊत म्हणाले.</p>    <p>“आदित्य ठाकरे आणि माझ्यासोबत ममतांची चर्चा झाली आहे. ममतांनी एक विचार घेऊन शरद पवारांशी संवाद साधला आहे. ममतांच्या बोलण्यातही दम आहे की यूपीएचे आज अस्तित्व नाही. ममतांचे म्हणणे सत्य आहे. कोणतीही आघाडी बनली तर ती काँग्रेससोबतच बनेल. अनेक राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे,” असे राऊत म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/722/even-though-we-have-differences-in-maharashtra-we-sanjay-rauts-advice-to-mamata-from-upa-leadership</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/722/even-though-we-have-differences-in-maharashtra-we-sanjay-rauts-advice-to-mamata-from-upa-leadership</guid>
                <pubDate>Sat, 04 Dec 2021 07:02:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/mamata-banerjee-sanjay-raut-and-aditya-thackeray-1.jpg"                         length="97768"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती</title>
                                    <description><![CDATA[नवी दिल्ली : दक्षिण आफ्रीकेत आलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे नवे रूग्ण भारतात सापडल्याने चिंता वाढली आहे. देशात पुन्हा एकदा कडक निर्बंधांची शक्यता आहे. तर, देशात तातडीने लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं. ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत… Continue reading ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/714/important-information-about-omycron-given-by-union-health-minister-in-lok-sabha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-12/461127-mandviya-1.jpg" alt=""></a><br /><img width="700" height="400" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/461127-mandviya.jpg" alt="" class="wp-image-3149"></img>    <p><strong>नवी दिल्ली :</strong> दक्षिण आफ्रीकेत आलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे नवे रूग्ण भारतात सापडल्याने चिंता वाढली आहे. देशात पुन्हा एकदा कडक निर्बंधांची शक्यता आहे. तर, देशात तातडीने लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं. ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. </p>    <p>केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत  डेटा सादर केला. याद्वारे त्यानी कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याशिवाय मांडविया यांनी देशातील आरोग्य क्षेत्रात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती सभागृहाला दिली. कोरोना महामारीच्या काळात सरकारने निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली.</p>    <p>आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, भारतात 3.46 कोटी कोविड-19 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, तर 4.6 लाख लोकांनी या धोकादायक विषाणूमुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या एकुण प्रकरणांपैकी मृत्यूची संख्या 1.36 टक्के आहे. ते म्हणाले की, भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 5,000 प्रकरणे आणि 340 मृत्यूची नोंद झाली आहे. जगातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. </p>    <p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम सुरू आहे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मागील सरकारांना दोष न देता, आताच्या सरकारने चांगले परिणाम मिळवण्यासाठी काम केलं असल्याचं मांडविया म्हणाले.</p>    <p>ओमायक्रॉनबद्दल बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी महत्त्वाची माहिती दिली. ओमायक्रॉनचा जीनोम सिक्वेंसिंगचा रिपोर्ट आता 30 तासात मिळणं शक्य होणार आहे. 50 हजार वेंटिलेटर्स राज्यांना दिली आहेत. मदतीवरुन कोणीही राजकारण करु नये.  मोदी सरकारने पॉवरने नाही तर विल पॉवरने काम केलंय, अशी स्तुतीही त्यांनी केली.  </p>    <p>तसंच लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोस देण्याबाबत वैज्ञानिक टास्क फोर्सच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल असंही मांडविया यांनी म्हटलं आहे. </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/714/important-information-about-omycron-given-by-union-health-minister-in-lok-sabha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/714/important-information-about-omycron-given-by-union-health-minister-in-lok-sabha</guid>
                <pubDate>Fri, 03 Dec 2021 11:47:37 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-12/461127-mandviya-1.jpg"                         length="31888"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत</title>
                                    <description><![CDATA[शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपावर सडकून टीका केलीय. तसेच फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना… Continue reading अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/698/amravati-riots-fadnavis-should-not-use-sticks-sanjay-raut"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/raut-fadnavis-1.jpg" alt=""></a><br /><img width="1200" height="667" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/raut-fadnavis.jpg" alt="" class="wp-image-3114"></img>    <p><a href="https://www.loksatta.com/tag/sanjay-raut/lite/">शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी</a> अमरावती हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपावर सडकून टीका केलीय. तसेच फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.</p>    <p>संजय राऊत म्हणाले, “हे ठाकरे सरकार आहे. इथे कारवाई करताना गट तट पक्ष पहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाता कामा नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे.”</p>    <h2>” अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली हे सर्वांना माहिती”</h2>    <p>“तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या शेजारी गडचिरोलीत याच पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. कायद्यासमोर सगळे समान आहेत. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करू नये एवढंच मी महाविकासआघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/698/amravati-riots-fadnavis-should-not-use-sticks-sanjay-raut</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/698/amravati-riots-fadnavis-should-not-use-sticks-sanjay-raut</guid>
                <pubDate>Mon, 22 Nov 2021 06:07:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/raut-fadnavis-1.jpg"                         length="92572"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी</title>
                                    <description><![CDATA[बीड : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या… Continue reading गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/694/gutkha-smuggled-prakarnat-shivsena-jilhapramukh-adachanit-udhav-thakrenchya-aadeshanantar-uchalbangadi"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/kundalik-khande-beed-shivsena-1.jpg" alt=""></a><br /><img width="360" height="203" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/kundalik-khande-beed-shivsena.jpg" alt="" class="wp-image-3104"></img>    <p><strong>बीड :</strong> गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.</p>    <p><strong> काय आहे प्रकरण?                                                 </strong>पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खांडे आणि आबा मुळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला.</p>    <p>बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर सुद्धा खांडे हे उजळ माथ्याने जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात फिरत असल्याचे दिसून आले.</p>    <p><strong>शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल</strong></p>    <p>या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील असे म्हटले आहे.</p>    <p><strong>शिवसेना सचिवांसमोर जाणं अंगलट</strong></p>    <p>गुटखा तस्करी प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यावर बीडच्या केज पोलिसात गुन्हा दाखल होता. खांडे हे फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोधही घेत होते. मात्र शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या बीड दौऱ्यातील एका कार्यक्रमात फरार आरोपी कुंडलिक खांडे हे कार्यक्रमात उघडपणे फिरताना पहायला मिळाले. या प्रकरणी माध्यम प्रतिनिधींनी अनिल देसाई यांना घेराव घातला असता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कुंडलिक खांडे यांच्यावर लवकरच कारवाई करतील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार कुंडलिक खांडे यांच्यावर पक्षाने कारवाई केले आहे.</p>    <p><strong>कुंडलिक खांडे अनेक आरोपांच्या गर्त्यात</strong></p>    <p>बीड जिल्हा रोजगार हमी असो वा चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणात खांडे यांच्यावर आरोप झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जागेत जुगाराचा क्लब देखील सुरू होता. आता थेट गुटखा तस्करी प्रकरणात नाव आल्याने खांडे यांची कुंडली पोलिसांसमोर आली आहे. मात्र गुटखा तस्करी प्रकरणात मला गोवले जात असल्याचा आरोप कुंडलिक खांडे यांनी केलेला होता. आता थेट शिवसेना भवनातून खांडे यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/694/gutkha-smuggled-prakarnat-shivsena-jilhapramukh-adachanit-udhav-thakrenchya-aadeshanantar-uchalbangadi</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/694/gutkha-smuggled-prakarnat-shivsena-jilhapramukh-adachanit-udhav-thakrenchya-aadeshanantar-uchalbangadi</guid>
                <pubDate>Mon, 22 Nov 2021 04:47:37 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/kundalik-khande-beed-shivsena-1.jpg"                         length="8348"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राजकारणातील हे दिग्गज नेते, कोणाच्या लग्नात आलेत एकत्र!</title>
                                    <description><![CDATA[नाशिक :  एरव्ही महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिग्गज नेते आज मात्र एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होतं नाशिकमध्ये रंगलेल्या लग्नसोहळ्याचं. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे.यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त राज्यातल्या दिग्गज राजकीय नेत्यांची मांदियाळी नाशिकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत शेजारी-शेजारी बसल्याचे… Continue reading राजकारणातील हे दिग्गज नेते, कोणाच्या लग्नात आलेत एकत्र!
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/692/rajakarnatiel-hey-giants-nete-konachya-lagaalet-collect"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/458985-nashikwed-1.jpg" alt=""></a><br /><img width="700" height="400" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/458985-nashikwed.jpg" alt="" class="wp-image-3094"></img>    <p><strong>नाशिक :</strong>  एरव्ही महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिग्गज नेते आज मात्र एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होतं नाशिकमध्ये रंगलेल्या लग्नसोहळ्याचं.</p>    <p>भाजपच्या आमदार देवयानी फरांदे.यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त राज्यातल्या दिग्गज राजकीय नेत्यांची मांदियाळी नाशिकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत शेजारी-शेजारी बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. </p>    <p>तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येताच संजय राऊत यांनी त्यांचे हसतमुखानं स्वागत केले. या सोहळ्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उदात्त दर्शन घडले. </p>    <p></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/692/rajakarnatiel-hey-giants-nete-konachya-lagaalet-collect</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/692/rajakarnatiel-hey-giants-nete-konachya-lagaalet-collect</guid>
                <pubDate>Sat, 20 Nov 2021 09:30:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/458985-nashikwed-1.jpg"                         length="29245"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित</title>
                                    <description><![CDATA[बुलडाणा :  रविकांत तुपकर आंदोलन पुढे ढकलले शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे ‘स्वाभिमान’चे नेते रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडे आंदोनल ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढविण्यात आला. तुपकरांच्या आंदोलनामुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसून आलेत. राज्य राखीव दलासह दंगा काबूचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पोलीस तुपकरांना उचलण्याच्या तयारीत होते. तर… Continue reading रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/682/ravikant-tupkars-condition-deteriorated-the-agitation-was-immediately-suspended-after-assurances"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/dd170b9c3bfa6171bef05dad6e09cbb4_original-1.jpg" alt=""></a><br /><img width="720" height="540" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/dd170b9c3bfa6171bef05dad6e09cbb4_original.jpg" alt="" class="wp-image-3069"></img>    <p><strong>बुलडाणा : </strong> रविकांत तुपकर आंदोलन पुढे ढकलले शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे ‘स्वाभिमान’चे नेते रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडे आंदोनल ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढविण्यात आला.</p>    <p>तुपकरांच्या आंदोलनामुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसून आलेत. राज्य राखीव दलासह दंगा काबूचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पोलीस तुपकरांना उचलण्याच्या तयारीत होते. तर  कॅबिनेट मंत्री डॉ. शिंगणेंच्या मध्यस्थीनंतर तुपकर यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मागण्यांवर चर्चा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांना आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बुधवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्या काही मागण्या आहेत, त्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला आहे.</p>    <p>गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासन चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले होते. दरम्यान रविकांत तुपकरांनी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे त्यामुळे आता अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये याकरिता तुपकरांच्य घराभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. राज्य राखीव पोलीस दलासह दंगा काबू पथकाच्या देखील गाड्या याठिकाणी दाखल झाल्या होत्या. कोणत्याही वेळी पोलीस तुपकरांना ताब्यात घेऊ शकतात अशी याठिकाणी परिस्थिती होती. मात्र, त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.</p>    <p>पोलिसांच्या चोख बंदोबस्तासह महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि विशेष म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांच्या आंदोलनाला भेट दिली. डॉ शिंगणे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. शेतकऱ्यांना मागण्या रास्त असून यावर येणाऱ्या बुधवारी राज्य पातळीवरील चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली तसेच आंदोलनकर्ते रविकांत तुपकर यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.त्यामुळे सकारात्मक चर्चेतून लवकरच मार्ग निघेल या आशेपोटी तुपकरांनी आंदोलन स्थगित केले आहे. </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/682/ravikant-tupkars-condition-deteriorated-the-agitation-was-immediately-suspended-after-assurances</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/682/ravikant-tupkars-condition-deteriorated-the-agitation-was-immediately-suspended-after-assurances</guid>
                <pubDate>Sat, 20 Nov 2021 07:20:47 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/dd170b9c3bfa6171bef05dad6e09cbb4_original-1.jpg"                         length="39959"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत</title>
                                    <description><![CDATA[शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय. “ज्या पद्धतीने ईस्ट इंडियाच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये आमच्या विरांना चिरडलं, तसंच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.… Continue reading आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/680/this-morning-seems-to-be-the-dawn-of-freedom-for-the-farmers-because-sanjay-raut"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/page-14-1.jpg" alt=""></a><br /><img width="660" height="440" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/page-14.jpg" alt="" class="wp-image-3061"></img>    <p><a href="https://www.loksatta.com/tag/sanjay-raut/lite/">शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी</a> शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय. “ज्या पद्धतीने ईस्ट इंडियाच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये आमच्या विरांना चिरडलं, तसंच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.</p>    <p>संजय राऊत म्हणाले, “कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.”</p>    <h2>“भांडवलदारांना शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला”</h2>    <p>“नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या प्रकारे व्यापारासाठी देशात घुसली आणि देश पारतंत्र्यात टाकला त्या प्रमाणे भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला. या देशातील शेतकऱ्यांनी एक ते दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पावसाचा विचार केला नाही. रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडलं, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपाच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले. यानंतरही पंजाब-हरियाणाचा शेतकरी मागे हटला नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.</p>    <h2>“हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं, भिकेत नाही”</h2>    <p>संजय राऊत म्हणाले, “जसं मोदी सांगत होते तसं हे शेतकरी फक्त २ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होते. म्हणून शेवटी सरकारला झुकावं लागलं. ३ काळे कायदे रद्द होत आहेत हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलं नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय.”</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                            <category>pm</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/680/this-morning-seems-to-be-the-dawn-of-freedom-for-the-farmers-because-sanjay-raut</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/680/this-morning-seems-to-be-the-dawn-of-freedom-for-the-farmers-because-sanjay-raut</guid>
                <pubDate>Sat, 20 Nov 2021 06:28:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/page-14-1.jpg"                         length="37483"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विरोधकांचे नव्हे हे आंदोलनाचे यश, अण्णा हजारेंनी व्यक्त केला आनंद</title>
                                    <description><![CDATA[अहमदनगर: ‘केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा ऐकून मलाही आनंद झाला, समाधान वाटले. हे विरोधी पक्षांचे नव्हे तर आंदोलनाचे यश आहे. केवळ पंजाब-हरियाणाच नव्हे तर देशभरातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून यासंबंधी आंदोलन करीत होते,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर हजारे प्रसारमाध्यमांशी बोलत… Continue reading विरोधकांचे नव्हे हे आंदोलनाचे यश, अण्णा हजारेंनी व्यक्त केला आनंद
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/668/decision-to-repeal-central-agriculture-act"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/907935-anna-hazare-1-1.jpg" alt=""></a><br /><img width="700" height="400" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/907935-anna-hazare-1.jpg" alt="" class="wp-image-3034"></img>    <p><strong>अहमदनगर:</strong> ‘केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा ऐकून मलाही आनंद झाला, समाधान वाटले. हे विरोधी पक्षांचे नव्हे तर आंदोलनाचे यश आहे. केवळ पंजाब-हरियाणाच नव्हे तर देशभरातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून यासंबंधी आंदोलन करीत होते,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक <a class="topic" href="https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87">अण्णा हजारे</a>  यांनी व्यक्त केली.</p>    <p>पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर हजारे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले, त्यावेळी आंदोलकांचे एक शिष्टमंडळ हजारे यांना येऊन भेटले होते. आंदोलनासाठी दिल्लीत येण्याची विनंती त्यांनी हजारे यांना केली होती. मात्र, काही कारणास्तव दिल्लीत येता येणार नसल्याचे सांगत हजारे यांनी राळेगणसिद्धी येथेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.</p>    <p>या पार्श्वभूमीवर हजारे म्हणाले, ‘आज जेव्हा ही बातमी मला समजली तेव्हा आनंद झाला. आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी अडचणीत आहे. खर्चाच्या तुलनेत त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे यासंबंधी कायदेशीर संरक्षण असणे आवश्यक होते. सरकारने केलेल्या कायद्यांतही या गोष्टींचा समावेश नव्हता. सुमारे तीन वर्षांपासून आपण आणि देशातील शेतकरीही या विषयावर विविध पातळ्यांवर आंदोलन करीत होतो. मुळात आपल्या मागण्यांसाठी सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर आंदोलनाची वेळ येणे हेच दुर्दैवी आहे. आता हे कायदे मागे घेतले. शेतीमालाला योग्य भाव मिळण्याचा प्रश्नही सुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र, हा निर्णय होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचा बळी जावा लागला.</p>    <p>स्वातंत्र्यासाठी जसे अनेकांनी बलिदान दिले, तसेच हे शेतकऱ्यांचे बलिदान आहे. त्यांचे देशाला कायम स्मरण राहील,’ असेही हजारे म्हणाले.<br />आंदोलनाचे श्रेय कोणाचे याबद्दल बोलताना हजारे म्हणाले, ‘हे विरोधी पक्षांचे यश नाही, हे आंदोलनाचे यश आहे. आपल्या देशाला आंदोलनाची परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्यही याच माध्यमातून मिळालेले आहे. आपल्या मागण्या करून घेण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. आंदोलनामुळेच सरकार झुकले आणि हा निर्णय झाला,’ असेही हजारे म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/668/decision-to-repeal-central-agriculture-act</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/668/decision-to-repeal-central-agriculture-act</guid>
                <pubDate>Fri, 19 Nov 2021 11:04:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/907935-anna-hazare-1-1.jpg"                         length="21836"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत</title>
                                    <description><![CDATA[मुंबई : कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचं उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत.… Continue reading सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/660/the-country-knows-the-strength-of-common-people-the-chief-minister-welcomed-the-decision"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/458843-cm-1.jpg" alt=""></a><br /><img width="700" height="400" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/458843-cm.jpg" alt="" class="wp-image-3016"></img>    <p><strong>मुंबई : </strong>कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचं उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. </p>    <p>शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. </p>    <p>आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली. त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. </p>    <p>केंद्राने यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणतात.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/660/the-country-knows-the-strength-of-common-people-the-chief-minister-welcomed-the-decision</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/660/the-country-knows-the-strength-of-common-people-the-chief-minister-welcomed-the-decision</guid>
                <pubDate>Fri, 19 Nov 2021 09:35:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/458843-cm-1.jpg"                         length="31432"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत यांनी सांगणं म्हणजे…” ; भाजपा नेत्याचा टोला!</title>
                                    <description><![CDATA[भाजपा नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच विधानावरून निशाणा साधला आहे. “शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणातात, हे असं म्हणण्यासारखं आहे की मांजर कधीच उंदीर खात नाही. ” असं अनिल बोंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे. याचबरोबर, “शरद पवारांना मी कालच विनंती केली… Continue reading “पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत यांनी सांगणं म्हणजे…” ; भाजपा नेत्याचा टोला!
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/656/sanjay-rauts-statement-that-pawar-never-lies-means-bjp-leaders-toll"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2021-11/pawar-and-sanjay-raut-1.jpg" alt=""></a><br /><img width="830" height="461" src="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/pawar-and-sanjay-raut.jpg" alt="" class="wp-image-3003"></img>    <p>भाजपा नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच विधानावरून निशाणा साधला आहे. “शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणातात, हे असं म्हणण्यासारखं आहे की मांजर कधीच उंदीर खात नाही. ” असं अनिल बोंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.</p>    <p>याचबरोबर, “शरद पवारांना मी कालच विनंती केली होती, सांगितलं होतं की इथे शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, मदत मिळाली नाही, बोनस जाहीर झाला नाही. शिवाय एसटी कामगारांचा देखील संप आहे, मोठ्याप्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळे शरद पवार यांनी येऊ नये. अस्वस्थता असंतोष त्यांना कदाचित त्यांच्या दौऱ्यात नागपूर, चंद्रपूरमध्ये दिसला असेल आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल. त्यामुळे त्यांनी यवतमाळ आणि वर्धेचा दौरा रद्द केला. माझी डॉक्टर या नात्याने त्यांना विनंती आहे, की त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कारण, विदर्भातील हवामान राष्ट्रवादीला मानण्यासारखं नाही.” असंही यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितलं.तर, संजय राऊत म्हणाले होते की, “शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय.”</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/656/sanjay-rauts-statement-that-pawar-never-lies-means-bjp-leaders-toll</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/656/sanjay-rauts-statement-that-pawar-never-lies-means-bjp-leaders-toll</guid>
                <pubDate>Thu, 18 Nov 2021 11:04:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2021-11/pawar-and-sanjay-raut-1.jpg"                         length="39083"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        