<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/62/stories" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>Stories - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/62/rss</link>
                <description>Stories RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>पोल्सन बटर जगभर गाजलेला ब्रँड नाहीसा,कसा झाला जाणून घ्या...</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>राजरत्न भोजने</p>
<p>छत्रपती संभाजीनगर : पोल्सन बटर एकेकाळी  गाजलेला ब्रँड. या ब्रॅंडने आपली जगभर क्रेझ बनवली.मात्र आपण त्याच पोल्सन बटर बद्दल जाणून घेवूया,पोल्सन बटर प्रत्येकाच्या ओठांवर असलेलं नाव अचानक कसे नाहीसे झाले.</p>
<p>१९४० मध्ये पोल्सन बटर कंपनी पेस्टनजी एडूल यांनी १३ व्या वर्षी स्थापन केली.या काळात अमूल हे नाव कोणालाच माहीत नव्हते.प्रत्येक भारतीयांच्या मुखामध्ये पोल्सन बटर हा ब्रँड गाजलेला होता.</p>
<p>पेस्टनजी एडूल यांनी एका छोट्याशा दुकानात कॉफीचा व्यवसाय सुरू केला.१२ वर्षानंतर त्यांनी भव्य कंपनी उभी केली.एडूलजी याच निकनेम पॉली होते.कारण, ब्रिटिश काळ असल्याचे जास्त कस्टमर ब्रिटिश असायचे म्हणून त्यांना पॉली नावाने ओळखू लागले. याच नावाने त्यांनी पोल्सन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9133/stories"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-09/picsart_23-09-11_17-21-36-647.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>राजरत्न भोजने</p>
<p>छत्रपती संभाजीनगर : पोल्सन बटर एकेकाळी  गाजलेला ब्रँड. या ब्रॅंडने आपली जगभर क्रेझ बनवली.मात्र आपण त्याच पोल्सन बटर बद्दल जाणून घेवूया,पोल्सन बटर प्रत्येकाच्या ओठांवर असलेलं नाव अचानक कसे नाहीसे झाले.</p>
<p>१९४० मध्ये पोल्सन बटर कंपनी पेस्टनजी एडूल यांनी १३ व्या वर्षी स्थापन केली.या काळात अमूल हे नाव कोणालाच माहीत नव्हते.प्रत्येक भारतीयांच्या मुखामध्ये पोल्सन बटर हा ब्रँड गाजलेला होता.</p>
<p>पेस्टनजी एडूल यांनी एका छोट्याशा दुकानात कॉफीचा व्यवसाय सुरू केला.१२ वर्षानंतर त्यांनी भव्य कंपनी उभी केली.एडूलजी याच निकनेम पॉली होते.कारण, ब्रिटिश काळ असल्याचे जास्त कस्टमर ब्रिटिश असायचे म्हणून त्यांना पॉली नावाने ओळखू लागले. याच नावाने त्यांनी पोल्सन बटर या कंपनीला नाव देण्याचा निर्णय घेतला.</p>
<p>पोल्सन कंपनी कॉफी साठी प्रसिद्ध असल्याने फ्रेंच रेसिफी म्हणून ओळख जगभर मिळाली.नंतर १९१० मध्ये एडूलजी यांनी ब्रिटिश आर्मी साठी बटर सप्लाय करण्याचा निर्णय घेतला.</p>
<p>पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी ब्रिटिश भारतीय आणि अमेरिकन सैन्याला पोल्सन बटर आणि पोल्सनची शुद्ध कॉफी पुरवली.त्यांच शिखरावर ते दररोज ५ टन लोणी तयार करत होते.आणि सैन्याला मागणीची पूर्तता करण्यासाठी परिणाम मुंबईत नविन कारखाना १९१५ मध्ये सुरू करण्यात आला.</p>
<p>पोल्सन त्यांच्या मलाईला काही दिवस आंबट ठेवण्यासाठी ओळखले जात असे आणि त्या शिळ्या मलाईवर मीठ घालून त्यावर प्रक्रिया करून बटर बनवले जात असे,यामुळे प्रतिस्पर्धी ब्रँड अमूलचे फ्रेश क्रिम बनवलेले बटर बाजारात फ्लॉप झाले.कारण ग्राहकांना पोल्सनच्या चवीची खूपच सवय झाली.</p>
<p>मोठ्या ग्राहकांना प्रोत्साहन म्हणून ब्रँड पुरस्कार म्हणून गिफ्ट कुपन देत असे,१९४५ पर्यत पोल्सन एक ब्रँड म्हणून भरभराट होत होता.आणि दरवर्षी ३ दशलक्ष पौंड लोणीचे विक्रमी उत्पादन गाठले होते.</p>
<p>सरकारच्या पाठिंब्याने त्यांनी स्थापन केलेल्या मक्तेदारीमुळे शेतकरी त्यांचे दूध इतर विक्रेत्याला बाजारात विकू शकत नव्हते.स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय राष्ट्रवादी नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लक्षात आणून दिले.सरदार वल्लभभाई पटेल जे १९४२ पासून सहकारी संस्था उघडण्याच्या कल्पनेशी खेळत होते.</p>
<p>सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४६ मध्ये शेतकऱ्यांसोबत सहकारी चळवळ सुरू केली.त्यामुळे अमूलची स्थापना झाली.१४ डिसेंबर १९४६ रोजी एक प्रतिस्पर्धी आणि दुग्ध सहकारी व्यवसायातील या घसरणीमुळे पोल्सन मुख्य प्रवर्तक सुशीला आणि जगदीश अमोल कपाडिया यांनी विकत घेतला.इथून पुढे अमूलची सुरुवात झाली.हळूहळू पोल्सनला मागे टाकत पोल्सन बटर नाहीसा झाला.आणि अमूल बटरने जगभर मोठा ब्रँड उभा केला.आणि आज रोजी अमूल बटर हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9133/stories</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9133/stories</guid>
                <pubDate>Mon, 11 Sep 2023 18:12:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-09/picsart_23-09-11_17-21-36-647.jpg"                         length="122847"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सरकारकडे भरपूर पैसा आहे; मग कृत्रिम पाऊस का? पाडत नाही,शेतकऱ्यांची सरकारला मागणी...</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>राजरत्न भोजने</p>
<p>औरंगाबाद : या वर्षीचा मान्सूनचा पाऊस सुरुवातीला थोड्या प्रमाणात झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात खरिपाची पिके उध्वस्त होत असून खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, मका, बाजरी हे पिके कोलमडून गेली आहे. सुरुवातीच्या मान्सूनने दगा दिल्यामुळे खरिप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले,असून आता रब्बीच्या पिकांसाठी शेतकरी परतीच्या मान्सूनकडे वाट पाहत बसला आहे.</p>
<p>यावर्षी बरसलेला मान्सून कोकण आणि विदर्भामध्ये चांगला झाला असला तरी मराठवाडा आणि नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात मात्र मान्सूनने दगा दिला आहे. त्यामुळे या 11 जिल्ह्यांमध्ये खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. परतीचा मान्सून देखील चांगला झाला नाही तर या जिल्ह्यांमध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9096/stories"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-09/picsart_23-09-04_13-58-32-826.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>राजरत्न भोजने</p>
<p>औरंगाबाद : या वर्षीचा मान्सूनचा पाऊस सुरुवातीला थोड्या प्रमाणात झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात खरिपाची पिके उध्वस्त होत असून खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, मका, बाजरी हे पिके कोलमडून गेली आहे. सुरुवातीच्या मान्सूनने दगा दिल्यामुळे खरिप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले,असून आता रब्बीच्या पिकांसाठी शेतकरी परतीच्या मान्सूनकडे वाट पाहत बसला आहे.</p>
<p>यावर्षी बरसलेला मान्सून कोकण आणि विदर्भामध्ये चांगला झाला असला तरी मराठवाडा आणि नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात मात्र मान्सूनने दगा दिला आहे. त्यामुळे या 11 जिल्ह्यांमध्ये खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. परतीचा मान्सून देखील चांगला झाला नाही तर या जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे.</p>
<p>सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा  :- <br />मराठवाड्यात कमी प्रमाणात मान्सून बरसल्याने धरणात एकूण उपलब्ध असलेला पाणीसाठ्यापैकी जायकवाडी धरणात 33 टक्के,माजलगाव 13 टक्के,मांजरा 23टक्के,विष्णुपरी 85टक्के आहे,हा पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने पाणी पिण्याची समस्या उदभवणार आहे.</p>
<p>महिनाभर पाऊस पडला नाही तर काय परिस्थिती येईल :- <br />पाणी हे आपल्या जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी पडलेच नाही यर सर्व नद्या कोरड्या पडतील, ज्यामुळे या भागातील जीवनमानावर गंभीर परिणाम होईल. तसेच झाडे सुकतील. झाडे त्यांची पाने सोडण्यास सुरवात करतील, ज्यामुळे हवेत परत ऑक्सिजनचे प्रमाण खराब होईल. सर्वत्र शेती उद्योगाची वाफ होईल. यामुळे लोक, पशुधन आणि तसेच, सर्व काही आणि प्रत्येकाच्या अन्न संसाधनांवर महत्त्वपूर्ण ताण पडेल. ती संपूर्ण ऑक्सिजन नसलेली गोष्ट अखेरीस आपल्या सर्वांचा जीव घेऊ शकते, परंतु कदाचित आपल्याला इतर मार्गांनी त्रास होईल…</p>
<p>आपल्याकडे लक्षणीय प्रमाणात पाणी साठले असले तरी ते पाच वर्षे टिकणार नाही.आमच्याकडे असलेले पाणी आम्हाला रेशन करावे लागेल,परंतु ते टिकणार नाही. कदाचित आपण कसे तरी पाण्याचे संश्लेषण करू शकू, परंतु त्यासाठी खूप ऊर्जा लागेल आणि जगाच्या ऊर्जेचा एक हिस्सा सामान्यत: जलविद्युत स्त्रोतांद्वारे निर्माण केला जातो, जो या वर्षा-नंतरच्या जगात फारसा सामान्य नसेल. मला खात्री आहे की काही काळासाठी पृष्ठभागावरील पाण्याचे स्त्रोत शिल्लक असतील, परंतु ते मृत प्राण्यांमुळे प्रदूषित होतील.</p>
<p>शेतकऱ्यांची मागणी कृत्रिम पाऊस पाडा :- <br />मराठवाड्यापाठोपाठ आता खानदेशामधूनही कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. खरे तर मागील दोन दशकांचा विचार केला असता एखादे-दुसरे वर्ष वगळता दरवर्षी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून झाली आहे. शेतकऱ्यांनी आग्रह धरल्यावर शासन-प्रशासन कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करण्यास सुरुवात करते. अनेकदा याबाबत निर्णय होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. निर्णय झालाच तर कुठे, कसा पाऊस पाडायचा याबाबत हालचाली सुरू होतात. कृत्रिम पावसाची यंत्रणा जुळवाजुळव करून उभी करण्यास विलंब होतो आणि पुन्हा वेळ निघून गेल्याने निर्णय बासनात गुंडाळून ठेवावा लागतो. निर्णय झाला, यंत्रणा उभारली, प्रयोग झाले तरी राज्यात कृत्रिम पावसाचे बहुतांश प्रयोग फसलेले आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर काही ठिकाणी पाऊस झालाच तर तो नैसर्गिक की कृत्रिम याबाबत शास्त्रज्ञांतच वाद होतात.</p>
<p>कृत्रिम पाऊस म्हणजे काय :- <br />पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान,वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते.<br />अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस.<br />ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते.</p>
<p>एखादा सूक्ष्म कण हा पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिम रित्या घडवून आणावी लागते.<br />त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषून्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला की बाष्प पावसाचे थेंब म्हणून खाली पडते.</p>
<p>एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात. चीन येथे ओलम्पिक पूर्वी तर रशिया तही असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार फार मोठा असतो. तिथेसुद्धा सोडियम आयोडाईडचे ‘कण’ फवारले की गारांची संख्या वाढते, पण त्यांचा आकार कमी होऊ शकतो</p>
<p>कृत्रिम पाऊस खर्चिक बाब :- <br />कृत्रिम पाऊस खर्चिक बाब आहे,यासाठी विमाने वैगरे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो,उष्ण ढगात 14 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे थेंब नसतात, अशावेळी ढगामध्ये सोडिअम क्लोराईड किंवा मिठाच्या 4 ते 11 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराची पावडर फवारली जाते. मिठाला पाण्याचं आकर्षण असल्यामुळे हे कण ढगात पसरतात.</p>
<p>कृत्रिम पाऊस  30 % यशस्वी होते :-<br />जगभरात कृत्रिम पावसाचे खूप सारे प्रयोग झाले आहेत त्यापैकी केवळ 30 टक्के ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विचार करून मगच हा निर्णय घ्यायचा असतो. कृत्रिम पावसाचं शास्त्र अजूनही पूर्णपणे विकसित होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अगदी अगतिकता असेल, तरच कृत्रिम पावसाचा प्रयोग करायला हवा</p>
<p>चिन देश कृत्रिम पाऊस पाडण्यात यशस्वी :- <br />1959 मध्ये, क्लाउड सीडिंग कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र सत्तेद्वारे अस्तित्वात होते व्यंगचित्रकाराला प्रेरणा आणि मुक्तता.जनरल इलेक्ट्रिक काम करणारे रसायन, व्हिटीन्सेंट शेफर, या पहिल्या वापरासाठी अस्तित्वात होते. ते आम्हांला लक्षात ठेवा की, त्यांच्या संरक्षणकरीता त्यांच्या सिरसवादाला जन्म, चक्रीविरोधक शस्त्रास्त्रे या संशोधकाचा विस्तार करण्यासाठी जनरल इलेक्ट्रिक सह सेना सामील होते.ढगांच्या खालच्या थरार सिल्व्हर आयोडून बीजन तंत्राचा वापर करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.मात्र चीनचा कृत्रिम पाऊस पडण्याचा  फर्मूला जगाला दिलेला नाही.</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9096/stories</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9096/stories</guid>
                <pubDate>Mon, 04 Sep 2023 14:04:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-09/picsart_23-09-04_13-58-32-826.jpg"                         length="170678"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी का काढावी?...जाणून घ्या </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>मुंबई :एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.</p>
<p>असा अपघात कोणाच्याही आयुष्यतील दुर्दैवी घटना असू शकते .कारण अपघाताच्या स्वरूपानुसार खालील तीन गोष्टी संभवतात.१. अपघातात होणारा दुर्दैवी मृत्यू२. अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व अथवा अंशत: अपंगत्व येऊ शकते३. अपघातामुळे अपंगत्व जरी आले नाही तरी काही काळ हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी राहावे लागतेया तिन्ही कारणाने सबंधित व्यक्ती किंवा कुटुंबीय यांना मोठ्या आर्थिक समस्येस तोंड द्यावे लागते प्रसंगी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/8917/stories"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-08/arthasakshar-personal-accident-insurance.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>मुंबई :एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.</p>
<p>असा अपघात कोणाच्याही आयुष्यतील दुर्दैवी घटना असू शकते .कारण अपघाताच्या स्वरूपानुसार खालील तीन गोष्टी संभवतात.१. अपघातात होणारा दुर्दैवी मृत्यू२. अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व अथवा अंशत: अपंगत्व येऊ शकते३. अपघातामुळे अपंगत्व जरी आले नाही तरी काही काळ हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी राहावे लागतेया तिन्ही कारणाने सबंधित व्यक्ती किंवा कुटुंबीय यांना मोठ्या आर्थिक समस्येस तोंड द्यावे लागते प्रसंगी कर्ज घ्यावे लागते किंवा काही चीज वस्तू नाईलाजाने विकाव्या लागतात, किंवा अन्य कुठल्या महत्वाच्या कारणासाठी बाजूस ठेवलेली शिल्लक वापरावी लागते, परिणामी ज्या उद्देशाने रक्कम शिल्लक ठेवलेली असते त्याची पूर्तता करता येत नाही. यावर मात अपघात विमा पॉलिसी घेऊन सहजगत्या करता येते . मात्र या पॉलिसीबाबत अजूनही जनसामान्यांना फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. या पॉलिसीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणेआहेत.</p>
<p>आपल्याला अपघात होऊ नये असे प्रत्येकास वाटते व त्या दृष्टीने आपण काळजी सुद्धा घेत असतो असे असले तरी कधी आपल्या चुकीने तर कधी दुसऱ्याच्या चुकीने तर कधी नैसर्गिक आपत्तीने तर कधी घातपाताने अपघातात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतात प्रतिदिनी सुमारे १२०० अपघात होत असतात. सुमारे १.५ लाख लोक प्रतिवर्षी या अपघातामुळे मृत्युमुखी पडत असतात.</p>
<p>१.साधारणपणे रु. २० ते २५ लाखाचे इन्शुरन्स कव्हर कंपनी देऊ करते. काही थोड्या कंपन्या रु. १ कोटी पर्यंतचे कव्हर देऊ करतात .</p>
<p>२. रु.२० लाखाच्या कव्हरसाठी सुमारे रु.१५०० ते २००० इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. प्रीमियमची रक्कम व पॉलिसीतील अटी इन्शुरन्स कंपनीनुसार कमी अधिक असू शकतात.३.पॉलिसी सर्वसाधारणपणे एक वर्षाच्या कालावधी साठी दिली जाते मात्र आता काही इन्शुरन्स कंपन्या ३ ते ५ वर्षमुदतीची पॉलिसी देऊ करत आहेत.४. पॉलिसी देताना वैद्यकीय तपासणी केली जात नाही.५.वैयक्तिक अपघाती विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व, अल्पकालीन अकार्यक्षमता आदी गोष्टींसाठी विमा कवच लाभते. पूर्वी साहसी खेळ किंवा त्यास्वरूपाच्या गोष्टी व्यक्तिगत अपघात विम्यातून वगळण्यात आल्या होत्या. आता मात्र, साहसी खेळांदरम्यान अपघात झाल्यास त्यासाठीही अपघात विमा छत्र उपलब्ध आहे.६.अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाच्या नॉमिनीस कव्हरची संपूर्ण रक्कम दिली जाते.तर जर पॉलिसी धारकास अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व आले (उदा:दोन्ही डोळे , दोन्ही हात, दोन्ही पाय निकामी झाले असतील ) तर पॉलिसीधारकास पॉलिसी कव्हरची संपूर्ण रक्कम दिली जाते. जर पॉलिसीधारकास अपघातामुळे अंशत: अपंगत्व आले (उदा:एक हात, एक डोळा , एक पाय , किंवा हाताची बोटे किंवा अंधुक दृष्टी ) तर अपंगत्वाचे प्रमाण जितके % असेल त्या प्रमाणात पॉलिसीधारकास क्लेमची रक्कम दिली जाते व हे % सिव्हील सर्जन किंवा तत्सम वैद्यकीय अधिकाऱ्याने तसे प्रमाणपत्र द्यावे लागते. उदा: कव्हरची रक्कम रु.१० लाख आहे व अपंगत्व ४०% इतके असेल तर पॉलिसीधारकास रु. ४ लाख क्लेम पोटी मिळतील.</p>
<p>७. जर पॉलिसीधारकास अपघात्तात झालेल्या दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आले नसेल मात्र उपचारासाठी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार असेल तर अशा वेळी जास्तीतजास्त रु.५०० प्रतिदिनी हॉस्पिटल मधील कालावधी किंवा जास्तीतजास्त १०४ दिवस या दोन्हीतील कमी असणाऱ्या कालावधी साठी दिले जातात.थोडक्यात असे म्हणता येईल कि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसीबरोबरच वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेणे निश्चितच हितावह असते, यामुळे अपघात टाळता येणे जरी शक्य नसले तरी त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी करता येणे शक्य होते. म्हणून आजच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेणे अगदी आवश्यक आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/8917/stories</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/8917/stories</guid>
                <pubDate>Fri, 11 Aug 2023 13:32:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-08/arthasakshar-personal-accident-insurance.jpg"                         length="48045"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चला फिरायला अजिंठयाला... श्रावण सौंदर्य बहरलं !</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  </p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0039.jpg" alt="IMG-20220806-WA0039" /><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0032.jpg" alt="IMG-20220806-WA0032" /><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0032.jpg" alt="IMG-20220806-WA0032" /><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0034.jpg" alt="IMG-20220806-WA0034" />आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सुधीर कोर्टीकर,मो.नं.९७६५५५३३१२,जुई बी-६ , अपार्टमेंट, तिरुपती पार्क , गुरु साहनी नगर , एन-४ सिडको , औरंगाबाद</p>
<p>  </p>
<p>गेल्या वर्षभरापासून सारी पर्यटन स्थळाची द्वारे बंद होती. यंदा ती उघडली गेलेली आहेत. पावसाने श्रावण मासाची सुरुवात छान केलेली आहे त्यामुळे औरंगाबाद परिसरातील सर्व पर्यटन स्थळे  श्रावणात बहरुन आलेली आहेत. औरंगाबाद मध्ये नित्यनेमाने हजारो पर्यटक येतात. मराठवाड्याचं थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखलं जाणार म्हैसमाळ... खुलताबादचा प्रसिध्द  किल्ला... वेरूळच्या लेण्या आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर.. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची गडी.. २१ गणेश पीठांपैकी १७ पीठ श्री लक्षविनायक गणपती.. म्हैसमाळची गिरीजादेवी ..जवळचेच  बालाजीचे खूप सुंदर मंदिर.. बीबी का</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5611/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-08/img-20220806-wa0037.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> </p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0039.jpg" alt="IMG-20220806-WA0039"></img><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0032.jpg" alt="IMG-20220806-WA0032"></img><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0032.jpg" alt="IMG-20220806-WA0032"></img><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0034.jpg" alt="IMG-20220806-WA0034"></img><iframe title="YouTube video player" src="https://www.youtube.com/embed/-HyMt2ewm_s" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen=""></iframe>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सुधीर कोर्टीकर,मो.नं.९७६५५५३३१२,जुई बी-६ , अपार्टमेंट, तिरुपती पार्क , गुरु साहनी नगर , एन-४ सिडको , औरंगाबाद</p>
<p> </p>
<p>गेल्या वर्षभरापासून सारी पर्यटन स्थळाची द्वारे बंद होती. यंदा ती उघडली गेलेली आहेत. पावसाने श्रावण मासाची सुरुवात छान केलेली आहे त्यामुळे औरंगाबाद परिसरातील सर्व पर्यटन स्थळे  श्रावणात बहरुन आलेली आहेत. औरंगाबाद मध्ये नित्यनेमाने हजारो पर्यटक येतात. मराठवाड्याचं थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखलं जाणार म्हैसमाळ... खुलताबादचा प्रसिध्द  किल्ला... वेरूळच्या लेण्या आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर.. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची गडी.. २१ गणेश पीठांपैकी १७ पीठ श्री लक्षविनायक गणपती.. म्हैसमाळची गिरीजादेवी ..जवळचेच  बालाजीचे खूप सुंदर मंदिर.. बीबी का मकबरा.. पानचक्की.. अशी एक ना दोन औरंगाबाद जवळील अगणित पर्यटन स्थळांचे श्रावण महिन्यामध्ये याठिकाणचे निसर्ग सौंदर्य बहरुन आलेलं आहे... </p>
<p>औरंगाबाद शहरापासून १०५ किलोमीटर अंतरावर असणारे हे अजिंठा गाव आणि त्या ठिकाणी असणारी संपूर्ण जगातील प्रसिद्ध असली अजिंठ्याची लेणी वाघुर नदीच्या काठावर ही वसलेली आहे .या नदीच्या काठावर अजंठा लेणीचा आकार बघितला तर एखाद्या घोड्याच्या नालाच्या सारखा असावा अशा आकारात ही लेणी वसलेली आहे ..</p>
<p>श्रावणमासात अजिंठा लेणीच्या परिसराला तर निसर्ग देवतेचा परिसस्पर्श झालेला आहे. साऱ्या डोंगरांच्यावर जणू हिरवेगार गालिचे पसरलेले आहेत. डोंगरावरुन खळखळतं येणारे झरे... पाहून असे वाटतं जणू त्या डोंगरावरुन दूधाच्या कासंड्याच ओतलेल्या आहेत की काय.. अशा हिरव्यागार बहरलेल्या डोंगरातून फिरताना होणारा आनंद विलक्षणच असतो. मध्येच पक्षांचा किलबिलाट तर कधी कोकिळेचा स्वर कानावर येतो नी मनं सुखावून जाते.टपटप करत पानावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब... वाऱ्यांच्या झुळके बरोबर अंगावर येणारे पाण्याचे थंडगार तुषार... अजिंठा लेण्या जवळील सप्तकुंडाचा तो धबधबा तर डोळ्यांचे पारणे फिटेल इतका मनमोहक.. विलोभनीय असाच आहे... सारंच आनंददायी नी सुखावून टाकणारं. समोरच्या डोंगरावर इंद्रधनुषानी आकाशात बांधलेलं ते तोरण पाहून मनं आनंदून गेल्यास नवल ते काय...असं अलौकिक निसर्ग सौंदर्य न्याहाळत येतो तो पिंपळदरी जवळील व्हू पॉइंटवर आपणं येतो..या ठिकाणी तुरळक गर्दी पर्यटकांची असते. घोड्याच्या नालाच्या आकाराचे हे अजिंठा लेणी चे दर्शन किती विलोभनीयं असते हे शब्दांमधून सांगता येत नाही.या व्ह्यू पॉइंट वरुन खाली पायवाटेवरून उतरताना श्रावणातील बहरलेले निसर्ग सौंदर्य पाहून मनं सुखावून जातं... तृप्त होऊन जाते...</p>
<p>आमच्या भटका तांडाचे सर्वेसर्वा श्रीकांत उमरीकर तसेच आमच्या धमाल ट्रेकर्सचे रविंद्र बिंदू यांनी आमच्या ग्रुपला बाजूला घेऊन अजिंठा लेणी विषयी माहिती देण्यास सुरुवात केली... आमच्या सहलीचे सहल संयोजक आकाश ढुमणे हे तर सहलबस पासून नास्ता चहा कॉफी नी उत्तम भोजनाचीही व्यवस्था नेहमीच करतात.त्यामुळे श्रीकांत उमरीकर.. आकाश ढुमणे..रविंद्र बिंदू यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझे शब्दही अपुरे आहेत असंच मला नेहमीच वाटतं हेच खरं...</p>
<p>या संपूर्ण डोंगरावर २६ गुफांमध्ये ही लेणी बांधली गेलेली आहे.संपूर्ण लेण्या प्रामुख्याने बौद्ध लेण्या आहेत.दोन टप्यात या लेण्या बांधल्या गेलेल्या आहेत.पहिल्या टप्यात सातवाहन राजवटीच्या काळात तर दुसऱ्या टप्प्यात वाकाटक राजवटीच्या काळात बांधलेल्या आहेत.युनेस्कोनी अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.</p>
<p>अजिंठा लेण्यांना १८१९ साली घोडदळातील एक ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी जंगलात आलेला होता त्यावेळी अचानक त्याच्या नजरेला या अजिंठा गुंफां दिसल्या .त्यानंतर त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगून गुंफाकडे जाण्यासाठी रस्ता बनवून घेतला.अजिंठा लेण्यांमध्ये भगवान गौतम बुद्धांचे जीवन.. गौतम बुद्धांची शिकवण अलौकिक पेंटिंग मधून त्याची उकल केलेली आहे.लेण्यातील नयनरम्य विलोभनीय पेंटिंग पाहून आपणं भारावून जातो.</p>
<p>त्या काळातही भारतीय संस्कृती किती विकसित होती हेच या प्रत्येक पेंटिंग मधून... प्रत्येक शिल्पातून दिसून येते.त्याकालखंडातील स्त्रियांनी परिधान केलेली आभुषणे..त्यांची सुंदर वस्त्रप्रवरणे... मनमोहक केशरचना आजच्या आधुनिक काळातील महिलांनाही नक्कीच भुरळ पाडतील इतक्या मनमोहक आहेत. अजिंठा.. वेरुळ.. आणि जवळची सर्व पर्यटन स्थळे असंख्य वेळा पाहिलेली आहेत.</p>
<p>औरंगबाद मधिल एका मोठ्या दैनिकानी सिटी वॉकच्या प्रत्येक महिन्याला दाखविण्याचे आयोजन केले होते.औरंगाबादच्या इतिहास तज्ञ डॉ.प्रा.दुलारी कुरेशी नी त्यांचे मिस्टर सर्व इतिहास प्रेमींनां प्रत्येक लेणीतिल दालनाचे महत्व खूप सुंदर विषद करुन सांगत असतं. मुगलं..मराठ्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा करीत असतं. अजिंठा लेण्यांमधील स्त्रियांच्या विषयी विश्लेषण करून सांगतांना डॉ.दुलेरी कुरेशी म्हणाल्या.मुघल ..मराठा काळातील स्त्रियां किती सुंदर.. संपन्न होत्या ते अजिंठ्याच्या पेंटिंग मधून लक्षात येते.त्या स्त्रियां किती नखरेल होत्या ते पहा... गळ्यातील दागदागिने.. कर्णफुले..झुमके.. त्यांच्या हेअर स्टाईल तर पहा तुम्ही आज फॅशन म्हणून मिरवता...पणं कित्येक वर्षांपूर्वीच्या स्त्रियां किती फॅशनेबल होत्या ते या अजिंठा गुंफां मधिल पेंटिंग मधून लक्षात येते....</p>
<p>अजिंठा लेण्यांमध्ये एकूण ३० लेण्या आहेत.त्यामध्ये २४ बौद्ध विहार आहेत तर ५ हिंदूची मंदिरे आहेत.या गुंफामध्ये १ , २ ,४ ,१६ , १७ या नंबरच्या गुंफा सर्वात सुंदर गुंफा आहेत. साधारणपणे इंग्रजी यु आकारातील मोठ्या खडकांवर  या ३० गुंफा खोदण्यात आलेल्या आहेत.त्यांची उंची ही साधारणता ७६ मीटर इतकी उंच आहे.यावरुन त्यांची भव्यता आपणास सहजतेने लक्षात येते. अजिंठा लेण्यांचा इतिहास आपण समजुन घेतला तर त्या कालखंडात या संपूर्ण लेण्यांचा वापर बौद्ध मठ म्हणून केला जात असे.या गुंफा मध्ये एकांतात बौद्ध विद्यार्थी आणि बौद्ध भिक्षू यांना बौद्ध धर्माची दीक्षा..शिकवण दिली जातं असे.निसर्गाच्या सान्निध्यात.. एकांतात बौद्ध विद्यार्थी.. भिक्षू आपल्या धर्मांच्या विषयीचे चिंतन मनन किती सुंदर रितीने करीत असतील हे या गुंफांच्या रचनेवरून दिसून येते.</p>
<p>अजिंठा लेण्यांमध्ये चैत्य गृहात सुंदर चित्रे रेखाटली आहेत तसेच या लेण्यांमध्ये अतीशय सुंदर छतांवरुनही अलौकिक नक्षीकाम कलाकुसर केलेली आहे.तर या चैत्य गृहात मोठ्या खिडक्या देखील आपणांस दिसून येतात. पहिल्या उत्खननात सापडलेल्या लेण्या दख्खन , कोंडदेव , पितळखोरा , या सर्व लेण्या नाशिक येथे सापडलेल्या लेण्या सारख्या आहेत. या लेण्या बनविण्याचा दुसरा टप्पा हा चौथ्या शतकात सुरू झालेला होता जो वाकाटकांच्या राजवटीत बांधला गेला.दुसऱ्या टप्यात बांधल्या गेलेल्या गुंफा सर्वात सुंदर नी अत्यंत कलात्मक कौशल्यपूर्ण आहेत.शिवाय या गुफांमध्ये अतिशय सुंदर अलौकिक सौंदर्याची अनुभूती देणारी चित्रे रेखाटली गेलेली आहेत.जी आजच्या चित्रकारांना ही भुरळ पाडतील इतकी अप्रतिम आहेत हे बाकी खरं...</p>
<p>अजिंठा लेण्यांचे इतकं विलोभनीय सौंदर्य पाहून आपणं नक्कीच भारावून जातो..मग आपल्या मनात देखील आपणास पहावयास कधी यायचं असा विचार नक्कीच आला असेल तर...</p>
<p>साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी अजिंठा लेण्यांमध्ये येण्यासाठी चांगला आहे बरका...कारण औरंगाबाद शहरातील तापमान त्याकाळातील थंड असते.अजिंठ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतं असतो नी उन्हाळ्यात ४० डिग्री पेक्षा तपमान असते.</p>
<p>वर्षभर खुल्या असणाऱ्या या अजिंठा गुंफां प्रत्येक सोमवारी बंद असतात हे लक्षात घेऊन येण्याची आखणी करायला हवी.अजिंठा लेण्यांना आपण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेट देऊ शकता.</p>
<p>अजिंठा लेण्यांना भेट देण्याकरता आपणं औरंगाबादहून १०५ किलोमीटर अंतरावरील अजिंठ्याला  बसनी..कारनी  अजिंठालेणी पर्यंत जाऊ शकता..किवां जळगाव मधूनही रोड मार्गे अजिंठ्याला येऊ शकता.</p>
<p>मग काय कधी येताय अजिंठा..वेरुळ पाहण्यासाठी.आज श्रावणमासात लेण्यांजवळील निसर्ग सौंदर्य नयनरम्य असं बहरलेलं आहे...हाच निसर्ग आपणांस सारख्या रसिकांची आतूरतेनी वाट पाहत आहे...हो ना...!</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5611/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5611/mah</guid>
                <pubDate>Sat, 06 Aug 2022 14:36:10 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-08/img-20220806-wa0037.jpg"                         length="258559"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वाघाच्या अधिवासाचा विस्तार आवश्यक</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>वाघाच्या संरक्षणासाठी आखलेले प्रकल्प देशात सर्वत्र पसरले आहेत. या प्रकल्पांच्या साहाय्याने पहिल्या दोन दशकात जवळजवळ 4 हजार 400 पर्यंत वाघांची संख्या पोहचली होती. मग यात आणखी का घट झाली? कारण त्यांच्या अधिवासाचा विस्तार करण्यात आला नाही. फक्त तामिळनाडूमध्ये वाघ संरक्षणाखालील क्षेत्र सुमारे 3400 चौरस किलोमीटरने विस्तारले आहे. आता एकूण 73 हजार 765.57  चौरस किलोमीटर आहे. वाघांच्या संख्येत वृद्धी झाल्यावर ते त्यांना भटकंतीकरिता आवश्यक अशा भूमीच्या शोधात जवळपास असणाऱ्या वनात आसऱ्यासाठी बाहेर पडतात. हा महत्त्वाचा भाग असतानाच आणि  ग्लोबल वार्मिंग हे संकट असतानाच स्थानिक पातळीवर दुसरेच संकट उपस्थित झाले आहे. </p>
<p>सर्रासपणे होणारी वाघांची शिकार आणि इतर कारणांमुळे गेल्या आठ</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5482/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/tiger_03.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>वाघाच्या संरक्षणासाठी आखलेले प्रकल्प देशात सर्वत्र पसरले आहेत. या प्रकल्पांच्या साहाय्याने पहिल्या दोन दशकात जवळजवळ 4 हजार 400 पर्यंत वाघांची संख्या पोहचली होती. मग यात आणखी का घट झाली? कारण त्यांच्या अधिवासाचा विस्तार करण्यात आला नाही. फक्त तामिळनाडूमध्ये वाघ संरक्षणाखालील क्षेत्र सुमारे 3400 चौरस किलोमीटरने विस्तारले आहे. आता एकूण 73 हजार 765.57  चौरस किलोमीटर आहे. वाघांच्या संख्येत वृद्धी झाल्यावर ते त्यांना भटकंतीकरिता आवश्यक अशा भूमीच्या शोधात जवळपास असणाऱ्या वनात आसऱ्यासाठी बाहेर पडतात. हा महत्त्वाचा भाग असतानाच आणि  ग्लोबल वार्मिंग हे संकट असतानाच स्थानिक पातळीवर दुसरेच संकट उपस्थित झाले आहे. </p>
<p>सर्रासपणे होणारी वाघांची शिकार आणि इतर कारणांमुळे गेल्या आठ वर्षात देशात जवळपास 750 वाघांचा बळी गेला आहे. मात्र असे असले तरी गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2 हजार 226 वरून वाघांची संख्या 2 हजार 976 इतकी झाली आहे. ही माहिती राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे (एनटीसीए) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे.  2010 ते 2020 या दहा वर्षांत किती वाघ दगावले,याची माहिती या माहितीच्या अधिकार कायद्याच्या आधारावर विचारण्यात आली होती. विशेष म्हणजे या विभागाकडे फक्त आठ वर्षांचीच माहिती उपलब्ध झाली आहे. यावरून आपण वन्यप्राण्यांच्या संवर्धनावरून किती निष्काळजी आहोत, हेच दिसून येते. या आठ वर्षात वाघांची संख्या वाढल्याच्या संख्येवरून आनंदही व्यक्त केला जात आहे. पण यामुळे आपण फार मोठी मजल मारलेली नाही. मागील शतकाचा विचार केला तर आपण  मोठ्या संख्येने वाघ गमावलो आहोत, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे.  </p>
<p>जगाचा विचार करता गेल्या सात वर्षांमध्ये वाघांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. याबाबत थोडीफार भारत, नेपाळमध्ये  स्थिती चांगली आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही, असा निष्कर्ष इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने केलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे. 2015 साली जगभरात 3200 वाघ होते. तो आकडा आता 4200 वर गेला आहे. जगातील 76 टक्के वाघ दक्षिण आशियामध्ये आढळून येतात. भारत व नेपाळमध्ये वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. रशियामध्ये वाघांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही. </p>
<p>जगभरात शंभर वर्षापूर्वी वाघांची संख्या 1 लाख होती. ती आता 4200 इतकी आहे. अफगाणिस्तान, अझरबेंजान, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्थान, तुर्कस्थान, पाकिस्तात यासहित अनेक देशातूत वाघांचे अस्तित्व संपले आहे. वाघाच्या घटत्या सख्येबाबत चर्चा करण्यासाठी 2010 साली रशियामध्ये जागतिक वाघ परिषद झाली होती, 2022 पर्यंत जगभरात वाघाचा आकडा 6 हजारांवर नेण्याचे लक्ष्य या परिषदेत ठरविण्यात आले होते. मात्र हे लक्ष्य अजूनही पूर्ण झालेले नाही. यंदाच्या वर्षी दुसरी जागतिक वाघ परिषद होणार आहे. त्यात वाघांची सख्या वाढविण्याबाबत आणखी उपाययोजनांवर चर्चा होईल. </p>
<p>19 व्या शतकात भारतात 70 टक्के जंगले होती. साहजिकच वन्यप्राण्यांची संख्याही अधिक होती. आपल्या राज्यकर्त्यांना येथे सर्वत्र दिसणाऱ्या जैवविविधतेबद्दल कुतूहल असणे स्वाभाविक होते. म्हणूनच अशा प्राण्यांची शिकार करून त्यांची कातडी घरी परत जाताना सोबत घेऊन जाण्यात त्यांना मुर्दूमुकी गाजवल्याचा आनंद वाटे. तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांची नक्कल करण्यात आपल्याकडच्या राजे-महाराजांना एक प्रकारचा आनंद वाटे. सन 1900 च्या सुमारास आपल्या देशात जवळपास 50 हजारच्या आसपास वाघ होते. मात्र ब्रिटिश राज्यकर्ते आणि राजे-महाराजे यांच्या शिकार करण्याच्या चढाओढीत असंख्य वन्यप्राण्यांची कत्तल झाली. 1972 सालापर्यंत अवघे 1800 वाघ उरले. वाघांची इतक्या कमी संख्येवर आल्यावर देशाला जाग आली. नशीब म्हणायचे, देशाला जाग आली नाहीतर चित्ता जसा नामशेष झाला तशी अवस्था वाघाची झाली असती.  वाघ नामशेष होत चालला आहे, याची जाग आल्यावर मग त्याला वाचवण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्यात आले. जंगलचा राजा वाचवण्यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली.  </p>
<p>अलीकडे वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचा बडेजाव केला जात आहे. परंतु या शतकाच्या सुरुवातीच्या वाघांच्या संख्येचा विचार केल्यास आताची संख्या खरं तर लाज आणणारीच आहे. 50  हजाराच्या आसपास असणारी वाघांची संख्या आज फक्त 2 हजार 976 इतकीच राहिली आहे. सन 1951 मध्ये 36 कोटी असलेल्या भारताची लोकसंख्या 135 कोटींवर गेली आहे. त्या तुलनेत मग वाघांची संख्या वाढायला हवी होती, पण ती आणखी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणजे आज ग्लोबल वॉर्मिंगसारख्या भयानक संकटाला आपण सामोरे जात आहोत. </p>
<p>वाघाच्या संरक्षणासाठी आखलेले प्रकल्प देशात सर्वत्र पसरले आहेत. या प्रकल्पांच्या साहाय्याने पहिल्या दोन दशकात जवळजवळ 4 हजार 400 पर्यंत वाघांची संख्या पोहचली होती. मग यात आणखी का घट झाली? कारण त्यांच्या अधिवासाचा विस्तार करण्यात आला नाही. फक्त तामिळनाडूमध्ये वाघ संरक्षणाखालील क्षेत्र सुमारे 3400 चौरस किलोमीटरने विस्तारले आहे. आता एकूण 73 हजार 765.57  चौरस किलोमीटर आहे. वाघांच्या संख्येत वृद्धी झाल्यावर ते त्यांना भटकंतीकरिता आवश्यक अशा भूमीच्या शोधात जवळपास असणाऱ्या वनात आसऱ्यासाठी बाहेर पडतात. हा महत्त्वाचा भाग असतानाच आणि  ग्लोबल वार्मिंग हे संकट असतानाच स्थानिक पातळीवर दुसरेच संकट उपस्थित झाले आहे. माणसाने वन्यप्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण केल्याने वन्य प्राणीदेखील माणसांच्या वस्तीवर चाल करून येत आहेत. यामुळे माणूस आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. </p>
<p>अर्थात माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातला संघर्ष आजचा नवा नसल्याचेही आपल्या लक्षात येते. वास्तविक हा प्रश्न फक्त आपलाच नाहीतर जगाचा आहे. या संघर्षाला इतिहास असल्याचा पुरावा आपल्याला हडप्पा, मोहोंजोडदो येथील उत्खननात आढळला आहे. तेथील एका चित्रात माणूस झाडावर चढलेला असून त्या झाडाखाली एक वाघ उभा आहे. याचा अर्थ हा संघर्ष नवा नाही,परंतु आज त्याची तीव्रता जास्त असल्याचे दिसते. भारतात 'प्रोजेक्ट टायगर' राबवण्यात आला, मात्र पहिल्या दोन दशकांत वाढलेल्या वाघांच्या संख्येला पूरक असे वातावरण निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो. याच काळात मग वाघाच्या अवयवांची तस्करी वाढली. चीनसारख्या देशांकडून वाघांच्या अवयवांसाठी मागणी वाढू लागली आणि त्यांची शिकार होऊ लागली. कारण नखापासून कातडी आणि दात अशा अवयवांसाठी लाखो डॉलर मोजले जाऊ लागले. त्यामुळे पुन्हा वाघांच्या अस्तित्वाला घरघर लागू लागली. पैशांसाठी लोक वाघाला षडयंत्र रचून मारू लागले. गाई-गुरांची शिकार कुठे झाली आहे, याची कल्पना स्थानिकांना असायची. ते तेथे जाऊन विष पेरून यायचे व ते खायला आलेला वाघ आयताच हाती लागायचा, हे इथे एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे.</p>
<p>याच काळात व्याघ्र पर्यटन अनियंत्रित झाले. वाघाच्या अधिवास परिसरात हॉटेल्स वाढली. वाघ दाखवण्याच्या अटीवर पर्यटकांकडून पैसा उकळला जाऊ लागला. तसा वाघ दाखवण्यासाठी वाघाच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी यंत्रणा उभी राहिली. व्याघ्र संवर्धनाचे कायदे झाले मात्र वाघांची शिकार करणाऱ्या लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण फारच अत्यल्प राहिले. कायद्याची अंमलबजावणी प्रभावी झाली नाही. यात राजकारण, पैसा घुसला. आज परिस्थिती नियंत्रणात असली तरी फार हुरळून जायचे काही कारण नाही. अजूनही वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांच्या अधिवासाचा विस्तार होणे आवश्यक आहे,पण त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. येत्या काळात मध्य भारतातील आठ राज्यांमध्ये तब्बल 399 विकास प्रकल्प आकारास येणार आहेत. यामध्ये रस्ते, सिंचन प्रकल्प आणि रेल्वे प्रकल्प यांचा समावेश आहे. त्याचा परिणाम वाघांच्या अधिवासावर होणार आहे, या उलट माणूस जंगल तोडून तिथे अतिक्रमण करत आहे. त्यामुळे वाघासारखे वन्यप्राणी मनुष्यवस्तीत शिरत आहेत. ववन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/machindra-anapure.jpg" alt="machindra anapure"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                            <category>लेख</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5482/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5482/lekh</guid>
                <pubDate>Fri, 29 Jul 2022 14:50:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/tiger_03.jpg"                         length="235843"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>।। वाघ : पर्यटकांचे आकर्षण ।।</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>हज्जारो पर्यटक अभयारण्यात भेटी देत असतात. निरनिराळे, प्राणी, पशू, पक्षी ते बघतात. पण त्यांच खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक "व्याघ्रदिन" साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंटपीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून घोषित करण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात जवळजवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो. तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजाराचे जवळपास  सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजारावर इतकी खाली आली आहे. </p>
<p>वाघ आणि माणूस यांच्यातला संघर्ष हा काय नवीन नाही. त्यामुळे वनविभागासमोर हा संघर्ष रोखण्यासाठी मोठे आव्हान असते. बऱ्याच</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5481/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/dilip.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>हज्जारो पर्यटक अभयारण्यात भेटी देत असतात. निरनिराळे, प्राणी, पशू, पक्षी ते बघतात. पण त्यांच खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक "व्याघ्रदिन" साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंटपीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून घोषित करण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात जवळजवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो. तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजाराचे जवळपास  सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजारावर इतकी खाली आली आहे. </p>
<p>वाघ आणि माणूस यांच्यातला संघर्ष हा काय नवीन नाही. त्यामुळे वनविभागासमोर हा संघर्ष रोखण्यासाठी मोठे आव्हान असते. बऱ्याच वेळा वाघाच्या हल्ल्यात अनेक माणसांचे बळी जातात याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड  आणि त्यामुळेच त्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे वाघाला संचार मार्गासाठी दाट जंगलाची आवश्यकता असते. पर्यायाने त्याचा जंगलाचा अधिवास कमी झाल्याने नकळत तो मानवी वस्तीकडे वळतो. मुद्दाम माणसांवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नसतो असे म्हणायला हरकत नाही.</p>
<p>९६/९७ टक्के वाघाची शिकार झाल्याने,नैसर्गिक मृत्यू आल्याने तिन ते चार टक्के म्हणजे ४०००/चे -जवळजवळ वाघ शिल्लक आहेत. या पैकी २२००/२३०० वाघ एकट्या भारतात आहेत. वाघाचे सरासरी आयुष्य साधारणपणे १४ ते १६-१७ वर्षाचेच असते.काही वाघ २०/२२ वर्षी मृत्यू झाल्याची नोंद आहे.  भारतातल्या वाघाची लांबी साधारणपणे साडे आठ ते ११ फूट असल्याचे आणि वजन दिड ते पावणे दोन क्विंटल असल्याचे सांगितले जाते.वाघ ताशी ६५ ते ७० कि.मि.वेगाने पळू शकतो.हत्ती सोडून ईतर प्राण्यांची शिकार तो करतो. भारतात असलेला वाघ हा रा्यल बेंगाल टायगर म्हणून ओळखला जातो. </p>
<p>आपला देश हा जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश आहे.आणि म्हणूनच भारतासाठी या दिवसाचे विशेष महत्व आहे. वाघाची संख्या जास्त असल्याने  भारत ही शेवटची आशा आहे असे म्हणतात. भारतात वाघाला वाचवण्या साठी प्रयत्न होत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे.</p>
<p>देशात ३९ व्याघ्रप्रकल्प आहेत.महाराष्ट्रात नागपूर विभागातील व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहेत,असा पाहणी निष्कर्ष असल्यामुळे, नागपूर ही जागतिक दृष्टीने वाघांची राजधानी संबोधण्यात येते.</p>
<p>चोरट्या शिकारी,आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे,ह्याच कारणांमुळे वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळेच ही वाघाची डरकाळी लुप्त होते की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे. वाघाच अस्तित्व धोक्यात आल आहे.अन्नासाठी जवळच्या वस्त्यावर वाघ हल्ले करु लागले. अशा परिस्थिती वाघ आणि माणसाचे संबंध बिघडलेचे जाणवते. वाढत्या शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल साधला जाणे साठी नियोजनबद्ध उपाययोजना आणि आवासाची आखणी होणे आवश्यक आहे.नाही तर हा संघर्ष सुरूच रहाणार आहे.परिस्थिती चिघळण्या आधिच शासकीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती म्हणून दखल घेणे आवश्यक वाटते. स्वयंसेवी संस्था, जनजागृती साठी कार्यक्रम करत असतातच.</p>
<p>वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जंगलात वाघ असणे म्हणजे संमृध्द जंगलाच प्रतिक आहे.महाराष्ट्रात ही संख्या २०१९ दोनहजार एकोणविस अखेर  ३१२ च्या जवळपास आहे.</p>
<p>व्याघ्रदिन साजरा करत असताना या वाघाचे अस्तित्व कायम रहावे, वाघाची डरकाळी जंगलात ऐकू यावी या साठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.</p>
<p>केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रलयाचे माहिती नुसार २०१२ ते २०१७ याकाळात ४५ टक्के वाघांचा मृत्यू अनैसर्गिक रित्या झाला.यात शिकार केलेल्या  वाघाची संख्या २२ टक्के होती.</p>
<p>२०१४ च्या गणणे नुसार देशात वाघांची संख्या २२२६ होती. तर जगभरात ३८९० वाघाची संख्या नोंद आहे.२०१८ साली ती.....महाराष्ट्रात ३०३ च्या जवळपास असल्याचे आकडेवारीत दिसते.</p>
<p>महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प- मेळघाट अमरावती-४२, ताडोबा-अंधारी चंद्रपूर व असंरक्षित क्षेत्र -१०८ , पेंच नागपूर -३२ , संह्याद्री-३, नवेगाव-नागझिरा गोंदिया जिल्हा-७, बोर-वर्धा जिल्हा ४,टिपेश्वर पांढरकवडा अभयारण्य -६, अशी वाघाची संख्या आहे.विदर्भातच ही संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात ३१२ च्या जवळपास वाघांची नोंद वनविभागा कडे असल्याची माहिती वन मंत्री  यांनी विधानपरिषदेत  दिली होती.  त्यातीत २१२ वाघ असून,१०० बछडे असल्याची माहिती आहे. देशात चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. वाघाची संख्या मागील तुलनेत वाढली आहे. </p>
<p>वाघाचे मृत्यू चे कारण बघितली तर -शिकारी, विद्युत प्रवाहा धक्का,दोन वाघातला अधिवास संघर्ष यात वाघ मृत्यू पावले आहेत.</p>
<p>२०१६ सालात -१०० वाघांचा मृत्यू झाला.</p>
<p>२०१७ सालात -९८. वाघांचा मृत्यू झाला. तर</p>
<p>२०१८ सालात -१०० -वाघांचा मृत्यू झाला आहे.तसेच गेल्या सात/आठ वर्षात मानव व वन्यप्राणी संघर्षात जवळपास पाचशेचे पेक्षा अधिक बळी गेले आहेेेत. विदर्भात ह्याचा फटका जास्त बसला आहे.वाघाची संख्या वाढत असलीतरी अशा  कारणांमुळे  वाघ-आणी माणसातला संघर्ष वाढला आहे...तरीही वाघानं शिवाय जंगल नाही.</p>
<p>असा हा जंगलाचा राजा, जंगलाचा श्वास आहे, ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक, आभयारण्याला भेटी देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाच दर्शन व्हाव ही अपेक्षा ठेऊन असतात.अनेक जंगली प्राणी दिसतात.पण वाघ दिसत नाही तो पर्यंत त्याची ट्रिप-पर्यटन पूर्ण होत नाही. त्याच कारणांमुळे पर्यटक आपला मुक्काम वाढवतात. गेल्या काही वर्षाची आकडेवारी बघितली तर, वाघ संपण्याची भिती निर्माण झाली आहे. कारण वाघ संपला, नाहीसा झाला तर त्याची निर्मिती मानवाचे हाती नाही.</p>
<p>दरवर्षी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त हेच आवाहन केले जाते. आपण एक दिवसा पुरता तो दिवस साजरा करतो,मग त्याचा विसर पडतो. वाघ ही जंगल संपत्ती आहे.तिची जपणूक व्हायला हवी.अनेक देशांची आर्थिक घडी ह्या वन-जंगल संपत्ती वर बसली आहे.तेव्हा वाघानं सह ह्या वन संपत्तीचे रक्षण होणे,करणे हे आपल सगळ्यांच कर्तव्य आहे.वाघानं शिवाय जंगलाची पूर्णता नाही. वाघाची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे आज जवळपास साडेतीनशे पेक्षा वाघ महाराष्ट्रात आहे आणि त्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहे. २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्याचा उद्देश हाच कि वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करुन जनजागृती करणे. जेणेकरून वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढणार नाही. त्यामुळेच वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून राहणार आहे आणि जंगलात वाघाची डरकाळी सतत ऐकू येणार आहे.</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/dilip.jpg" alt="dilip"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                            <category>लेख</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5481/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5481/lekh</guid>
                <pubDate>Fri, 29 Jul 2022 14:49:03 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/dilip.jpg"                         length="64404"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मीनाकुमारी : एक शोकांतिका</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो अजूनही तसाच आहे, गाव मात्र बदलेलं आहे. कब्रस्थानाला लागून शासकीय विश्रामगृह आहे, निझामकालीन भव्य अशी वास्तू आहे. सांगितलं जातं की इथे मीनाकुमारी अधूनमधून राहायला येत असत. या परिसरात कमालीची शांतता आहे. इथं मन खूप रमतं. लेखनासाठी खूप सुंदर जागा आहे. म्हणूनच बहुतेक मीनाकुमारीला ही जागा आवडत असावी, आयुष्याच्या उत्तराधार्थ त्या एकाकी पडल्या होत्या आणि लेखणीशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5480/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/minakumari.jpeg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो अजूनही तसाच आहे, गाव मात्र बदलेलं आहे. कब्रस्थानाला लागून शासकीय विश्रामगृह आहे, निझामकालीन भव्य अशी वास्तू आहे. सांगितलं जातं की इथे मीनाकुमारी अधूनमधून राहायला येत असत. या परिसरात कमालीची शांतता आहे. इथं मन खूप रमतं. लेखनासाठी खूप सुंदर जागा आहे. म्हणूनच बहुतेक मीनाकुमारीला ही जागा आवडत असावी, आयुष्याच्या उत्तराधार्थ त्या एकाकी पडल्या होत्या आणि लेखणीशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती. मी बरेच दिवस झाले यावर लिहावं म्हणत होतो पण वेळ मिळत नव्हता, पण १ ऑगस्ट मीनाकुमारीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द व्यक्त होत आहे.</p>
<p>चंदेरी दुनियेत प्रसिध्दीच्या शिखरावर असताना अवघ्या ३९ वर्षी जगाचा निरोप घ्यावा, ते ही अशा करुण अवस्थेत, हे मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. रील लाईफमध्ये आयुष्यभर त्यांनी ट्रजेडी क्वीनच्या भूमिका केल्या आणि रिअल लाईफ मध्येही ट्रजेडी क्वीन म्हणूनच जगल्या. म्हणून मीनाकुमारीला 'ट्रजेडी क्वीन' ही म्हंटलं जातं. इथं मला ऱ्होन्डा ब्रिनी यांच्या 'द सिक्रेट' मधली 'लॉ ऑफ अट्रक्शन' चा  सिद्धांत आठवतो.</p>
<p>बालपण</p>
<p>मीनाकुमारी ह्या रवींद्रनाथ टागोर कुटुंबातील होत्या, हे फार कमी लोकांना माहिती असेल. रवींद्रनाथ टागोर यांची भावजय ह्या बालविधवा होत्या. त्यांनी बालविधवा प्रथेस कडवा विरोध करून इसाई धर्म स्वीकारला आणि मेरठ येथे प्यारेलाल यांच्याशी विवाह केला. त्यांना प्रभावती नावाची गुणी मुलगी झाली. तिचा आवाज खूप गोड होता म्हणून तिने मुंबई गाठले तिथे तिची भेट संगीतकार अलिबक्षशी झाली. नंतर विवाहात रूपांतर झाले आणि प्रभावतीची इकबाल बानो झाली. या जोडप्याला तीन मुली झाल्या. पहिली खुर्शीद लग्नानंतर पाकिस्तानात गेली. दुसरी मधू हास्य कलाकार 'महेमुद' ची पत्नी आणि सगळ्यात लहान महजबी म्हणजेच मीनाकुमारी.</p>
<p>'अलिबक्ष'ची परिस्थिती कामं नसल्याने खूपच दयनीय होती.  ज्या दिवशी काम त्याच दिवशी पोटाला मिळायचं. दोन मुली नंतर तिसरी मुलगी असह्य होती म्हणून 'महजबी' ला 'मीनाकुमारी' ला अनाथ आश्रमात टाकावं लागलं पण कुठं तरी ममता जागृत झाली आणि परत तिला घरी आणण्यात आलं. घरची परिस्थिती खूपच वाईट होती. अली बक्ष आणि इकबाल बानो दोघे ही कामाकरिता बाहेर पडायचे. 'महजबी' ची शिक्षणात आवड होती पण घरच्या दरिद्रीमुळे तिन्ही मुलींनाही बाल कलाकार म्हणून कामाला लावले.  त्यामुळे सगळेच कामासाठी बाहेर पडल्याने स्वयंपाक एकदाच बनायचा कारण घरी येण्याची कुठलीच वेळ नियोजित नव्हती. त्यामुळे शिळ्या जेवणाची सवय नंतर आवड 'मीना कुमारी' ला  शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर, ठेचा आणि कांदा ती आवडीने खायची. घरच्या हालक्याच्या परिस्थिती मुळे घरात रोजच भांडणे व्हायची. त्यामुळे मीनाकुमारी मध्ये लहानपणापासूनच एकाकीपणा आला होता ती खडे गोळा करायची आणि ती खड्याशी गप्पा मारायची आणि ही सवय तिची शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर आणि एकांता मधले खडे. अवघ्या चौथ्या वर्षी 'महजबी' ला पोटासाठी कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं. तो चित्रपट होता विजय भट्ट दिग्दर्शित ' लेदर फेस' ( १९३९ ) या चित्रपटाच्या वेळी 'महजबी'चं वय फक्त चार वर्षे होतं. या चित्रपटासाठी 'महजबी' ला २५ रुपये भेटले होते आणि घरची चूल पेटली होती. आठव्या आणि नवव्या वर्षी तिला 'एक ही भूल' 'पूजा' चित्रपट भेटला. बाल कलाकार म्हणून भरपूर कामे मिळू लागली.  'महजबी' आवाज ही गोड होता यातून ही  तिला पैसे मिळाय लागले आणि घर चालायला लागले आता 'महजबी' बाल वयातच घर चालविणारी मशीन बनली होती. 'महजबी' मुळे घरात प्रसन्नता अली होती. 'महजबी' पैसा कमविणारी मशीन बनली होती, शिकलेली मशीन जास्त पैसा कामावेल म्हणून अली बक्ष ने 'महजबी' ला हिंदी, इंग्लिश आणि उर्दू ची शिकवणी लावली. टीचर घरी येऊन शिकवायचे. अशा वेळातच 'महजबी' च्या आई चं निधन झालं, हा खूप मोठा धक्का 'महजबी' ला होता. नवव्या वर्षी सर्व प्रथम संगीतकार अनिल बिस्वास यांनी 'महजबी' ला गायनाची संधी दिली 'बहेन' (१९४१ ) चित्रपटात. पुढे 'पिया घर आजा' चित्रपटात सगळेच 'मीनाकुमारी'नी गायली. १४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरु झाला.</p>
<p>प्रेम आणि विवाह</p>
<p>१४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरू झाला. मीनाकुमारीच्या अभिनयाची प्रशंसा व्हायची पण चित्रपट थर्ड ग्रेडचे असायचे. ह्या काळात होमी वाडिया च्या 'लक्ष्मी नारायण' पौराणिक चित्रपटात 'लक्ष्मी' ची भूमिका मिळाली. या चित्रपटामुळे ओळीने 'हनुमान पाताल विजय', 'गणेश महिती' असे पौराणिक चित्रपट मिळाले आणि मीनाकुमारीला लोकप्रियता मिळाली. होमी वाडीया सोबतच्या शेवटच्या चित्रपटात ' अल्लादिन का चिराग' ( १९५२ ) साठी मीनाकुमारीला मिळाले होते, दहा हजार रुपये. त्या पैशातून आलिशान सेकंड हँड कार खरेदी केली आणि ड्रायव्हिंग ही शिकली.</p>
<p>याच काळात देविका राणी सोबत हिट चित्रपट देणारे अशोक कुमार यांनी 'तमाशा' चित्रपटासाठी  मीनाकुमारी ला वेगळ्या प्रकारची भूमिका दिली. हा चित्रपट तर चालला नाही पण या चित्रपटाच्या सेट वर मीनाकुमारीच्या 'सपनाचा राजकुमार' 'कमाल अमरोही' शी भेट झाली. चित्रपट 'पुकार' च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर आगामी फिल्मसाठी मीनाकुमारीला त्यांनी पसंद केलं होतं पण ते काही जुळून आलं नव्हतं, पण मीना कमाल अमरोहीच्या प्रेमात पडली. त्यावेळी मीनाकुमारी फक्त आठ वर्षाची होती. कमाल अमरोहीचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार होतं तसेच त्याकाळातले सर्वात महागडे दिग्दर्शक होते. 'महल' चित्रपटासाठी त्यांनी त्याकाळी सर्वात जास्त एक लाख रुपये घेतले होते. सांगितलं जातं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा होऊन 'मधुबाला' ने सुद्धा स्वतः हुन लग्नाचं प्रपोजल दिलं होतं. मीनाकुमारी वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्या प्रेमात होती. घरात कमाल अमरोहीचे असंख्य फोटो मीनाकुमारी लावलेले होते. 'तमाशा' चित्रपटाच्या सेटवर दहा वर्षांनी मीनाकुमारीची कमाल अमरोही ची भेट झाली होती. दहा वर्षांपूर्वी मीना बाल तर आता ती तरुण होती. कमाल अमरोही मीनाकुमारी पेक्षा १५ वर्षांनी मोठे व विवाहित होते.</p>
<p>'मीनाकुमारी' ला अमरोही सोबत काम करण्याची आणि भेटायची इच्छा खूप असायची. ती मनातल्या मनात  अमरोही वर खूप प्रेम करायच्या. एकेदिवशी अचानक कमाल अमरोहीने सेक्रेटरी बाकर अली जवळ 'अनारकली' चित्रपटाचा प्रसाव पाठविला होता, हा प्रस्ताव ऐकून मीनाकुमारी खूप खुश झाली. 'अनारकली' चे निर्माते मखनलाल मीनाकुमारी ला तीन हजार देऊ इच्छित होते. मागची फिल्म 'अल्लादिन का चिराग' ला मीनाला दहा हजार मिळाले होते. त्यामुळे मिनाचे वडील अली बक्ष या प्रस्तावास तयार नव्हते शेवटी अमरोहीने मध्यस्थी करून पंधरा हजार रुपये ठरविले. यावेळेस अमरोही च्या मनात मिनाबद्दल  प्रेम नव्हतं. मीनाकुमारीचं एकतर्फी प्रेम होतं. 'अनारकली' साठी लोकशन पाहण्यासाठी अमरोही आग्र्याला गेले. इकडे मीनाकुमारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला गेली होती, परतीच्या वेळी तिच्या मोटारीला मोठा अपघात झाला आणि तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही बातमी वृत्तपत्रात अमरोही यांनी वाचली त्यावेळी 'अनारकली' च्या लोकेशन साठी आलेल्या दिल्लीच्या हॉटेलमध्ये होते. ते तातडीने पुण्याला मीनाकुमारीला भेटायला पुण्याला आले. यावेळी मीनाकुमारीला खूप आनंद झाला. चार महिने हॉस्पिटलमध्ये होती. रोज दोघांच्या भेटी व्हायला लागल्या आता अमरोही ही मीनाच्या प्रेमात पडले होते. पण इकडे अनारकली चित्रपट डब्ब्यात गेला असला तरी याच काळात मीनाकुमारी ला 'बैजू बावरा (१९५३) व फुटपाथ (१९५३) हे ब्लॉकबस्टर मिळाले आणि मीना लोकप्रियेतेच्या शिखरावर पोहचली. इकडं अमरोही आणि मीना ने लग्न करायचं ठरवलं होतं पण अडचण मीनाचे वडील अली बक्ष होते कारण मीना सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. त्यामुळे ते विरोध करणारे होते. तरीही या दोघांनी लपून लग्न केलं आणि काही नाही झाले अशा पद्धतीने घरी आपआपल्या घरी राहिले. मीनाने विचार केला की दोन लाख आले की वडिलांना द्यावं आणि लग्नाबद्दल सांगावं पण त्याआधीच तिच्या वडिलांना कळलं आणि मीनाला अमरोहीला तलाक दे म्हणून तकादा लावला. अमरोही सोबत काम करण्यास मज्जाव केला आणि ज्यादिवशी तू अमरोही सोबत काम करशील त्यादिवशी माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील, अस अली बक्ष नी सुनावलं पण मिनाकडून हे शक्य नाही झाले आणि ते घर मिनासाठी बंद झाले. अमरोही नी पालिहिल ला घर घेतलं आणि दोघे सुखाने राहू लागले.</p>
<p>चित्रपट प्रवास व एक गुणी अभिनेत्री</p>
<p>बैजू बावरा व  नंतर फुटपाथ नंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 'बैजू बावरा' (१९५३) ला पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. लागलीच दुसऱ्या वर्षी ही  'परिणिता' साठी मीनाकुमारी ने फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. कमाल अमरोही ने दोघांच्या प्रेमकहाणी वर 'दायरा' चित्रपट निर्माण केला तो ही सुपर हिट ठरला. </p>
<p>आपल्या ३४ वर्षाच्या रजतपटीय आयुष्यात अभिनय सम्राट अशोककुमार पासून ते 'मेरे अपने' विनोद खन्ना पर्यंत कितीतरी अभिनेत्याशी जुगलबंदी तिला खेळावी लागली. पण मीनाकुमारी कुठेच कमी पडली नाही. मीनाकुमारीला आव्हानात्मक भूमिका मिळत गेल्या करण ती पेलविण्याची ताकत तिच्यात होती. म्हणून ती अजोड होती. मीनाकुमारीने अभिनयाचे कधीही अभिनयाची ट्रेनिंग घेतली नाही. ती स्वतः च अभिनयाची विद्यापीठ होती. 'साहेब बिवी और गुलाम' तिच्यातला 'अभिनय साम्राज्ञी' समोर आणते. अभिनयाचे सर्व आव्हाने तिने स्वीकारले. संवाद फेकीत ती अजोड होती. तिचे संवाद लेखकाच्या आत्म्याशी समरस व्हायची. तिचे डोळे कारुण्याचे गुलाम होते. निर्मलतेचे धनी होते. या डोळ्यांनी कधी ग्लिसरीन चा उपयोग ही केला नाही. अशी ही प्रगल्भ अभिनेत्री. भूमिकेच्या अंतरंगात शिरून तिचे सर्व पैलू पडद्यावर सादर करण्याची करण्याची क्षमता तिच्यात होती. क्षमते बरोबरच काही शिकण्याची ही तिची वृत्ती होती. मीनाकुमारीच्या अभिनयाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तिचा पेहराव बोलत नसे, भूमिकेत शिरताना तिच्या सर्वांगावर परिणाम दिसत असे.</p>
<p>मीनाकुमारीला तिच्या छोट्याशा कारकिर्दीत चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाली आहेत. तिचा ' साहिब, बिवी और गुलाम' हा चित्रपट बर्लिन फेस्टिव्हल मध्ये नामांकित झाला होता. मीनाकुमारीने एकूण ९१ चित्रपटात भूमिका केल्या. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ चित्रपटात तिच्याबरोबर अशोक कुमार मुख्य भूमिकेत होता. ७ चित्रपटात धर्मेंद्र बरोबर. राज कुमार, राजकपूर, दिलीपकुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना अशा दिगग्ज कलाकारांसोबत काम केलेलं आहे नव्हे उलट या दिगग्ज अभिनेत्री सोबत या कलाकारांनी काम केलेलं आहे.</p>
<p>मीनाकुमारी परीस होती, ज्याला ही तिने स्पर्श केलं ते सोनं झालं. धर्मेंद्रला मोठं बनविण्यात तिचा मोठा हात आहे. तिचे को -स्टार तिच्या प्रभावाने मोठी व्हायची. महेमुदला ही तिनेच हात दिला नाहीतर महेमुदचे 'पेइंग गेस्ट' असलेले अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा आज या ठिकाणी कदाचित नसते. कारण या दोघांना ब्रेक महेमुदने दिला होता.</p>
<p>वैवाहिक जीवन</p>
<p>तीन -चार वर्षांच्या सुखी संसारानंतर या सुखी संसाराला ग्रहण लागायला चालू झाले. एकिकडे चित्रपट हिट वर हिट होत असताना रिअल लाईफचा चित्रपट फ्लॉप होत होता. तिचे चित्रपट जरी हिट होत असले तरी ती सुखी नव्हती. अमरोही आणि तिचे खटके उडायला लागले होते. या नात्यात दुरावा येण्याचं कारण सांगितलं जातं की,  मीनाकुमारीची आपल्या को - स्टारशी जवळीक. दुसरं कारण अमरोहीचा पझेसिव्हनेसपणा. असं ही सांगितलं जातं की कमाल अमरोही बाबतीत तिचे को - स्टार मिसगाईड करायचे आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचे. यामुळे कमाल अमरोहीने तिच्यावर काही बंधने आणली. तीन अटी तिच्यावर लादल्या गेल्या म्हणजे आता अटीवर त्यांचा संसार चालू होता. त्या तीन अटी अशा होत्या. </p>
<p>१. मीनाकुमारीने बरोबर संध्याकाळी साडे सहा वाजता घरी यावे आणि दोघे एकमेकांना वेळ द्यावा.</p>
<p>२. आपल्या मेकअप रूम मध्ये आपल्या को - स्टारला किंवा इतर कुणालाही प्रवेश करू देता कामा नये. सांगितले जाते की यासाठी अमरोही ने पाळतीवर आपली माणसं ही ठेवली होती. या काळात मीनाकुमारीची गुलजार शी जवळीक वाढली होती आणि गुलजार आणि मीनाकुमारी मेकअप रूम मध्ये तासनतास बसायचे. म्हणून ही अट.</p>
<p>३. कुठं जायचं असेल तर आपल्याच गाडीतुन जायचं, दुसऱ्याच्या गाडीत बसायचं नाही. सांगितलं जातं की मीनाकुमारीने एकदा आपली गाडी असतानाही प्रदीप कुमारच्या गाडीत प्रवास केला होता.</p>
<p>एकीकडे मीनाकुमारी यशाच्या शिखरावर राज्य करीत होती तर एकीकडे तिची मानसिक घुसमट चालू होती. आणि ह्या अमरोहीच्या अटी तिला पाळणं जड झालं आणि वाद वाढतंच गेला. सांगितलं जात तिचे को - स्टार, मित्र किंवा नातेवाईक ह्या दोघांची समजूत न काढता उलट आगीत तेल ओतण्याचे काम केलं. जेव्हा कायमच घर सोडून मीनाकुमारी आपले जिजा महेमुद कडे आली तेव्हा अमरोही मीनाकुमारीची समजूत काढण्यासाठी घरी होते खरंतर महेमुद नी मीनाकुमारीची समजूत काढून अमरोही सोबत पाठवायला हवे होते पण त्यांनी तसं नाही केला कारण मीनाकुमारी ही परीस होती तिची सर्वानाच गरज होती. पण स्वतः मीनाकुमारीचं वाटोळं होत गेलं. त्यामुळे मीनाकुमारी कमाल अमरोही पासून दूर दूर होत गेली. सांगितलं जातं पाकिजा मध्ये आधी धर्मेंद्र होता पण धर्मेंद्रशी मीनाकुमारीशी जवळीक पाहून अमरोहीने धर्मेंद्रला पाकिजातून काढून टाकले आणि त्याचा परिणाम असा झाला की पाकिजा बंद पडला नंतर सुनील दत्तच्या हस्तक्षेपामुळे पाकिजाचे शूटिंग परत चालू झाले पण मीनाकुमारी व्यवस्थित सहकार्य करीत नव्हती. १९५४ ला सुरू केलेले पाकिजाचे शूटिंग १९७२ ला पूर्ण झाले.  आणि रिलीज झाला. पाकिजा हा चित्रपट कमाल अमरोही आणि मीनाकुमारीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट मीनाकुमारीला पाहण्याची खूप इच्छा होती, चित्रपट रिलीज होऊनही ती पाकिजा चित्रपट पाहू शकली नाही कारण ती हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी होती आणि तीन महिन्यांतच ती जगाला निरोप दिला.</p>
<p>अनेक कलाकारांशी संबंध</p>
<p>मीनाकुमारीचे तिच्या अनेक सहकलाकारशी नेहमी नाव जोडलं गेलं. अशोक कुमार, भारतभूषण, दिलीप कुमार, धर्मेंद्र, गुलजार. गुलजार सोबतचा एक किस्सा प्रचंड गाजला होता. कमाल अमरोहीने मीना कुमारी वर बऱ्याच अटी ठेवल्या होत्या. त्यातली एक अट म्हणजे मीनाकुमारीच्या मेकअप रूम मध्ये पुरुष कलाकारास बंदी होती. पण गुलजार आणि मीनाकुमारी तासान तास मेकअप रूम मध्ये बसायचे. बाकर ने कमाल अमरोहीला ही बातमी दिली. तेंव्हा गुलजार ला सेट वरच  मारण्याचा प्लॅन झाला पण गुलजार त्यातून निसटले.</p>
<p>माणूसकीची मीनाकुमारी</p>
<p>एक माणूस म्हणून मीनाकुमारी ग्रेटच होती. अमरोहीशी लग्न होताच तिने अमरोही च्या पत्नीला व त्यांच्या मुलांना आपलंसं केलं. होतं. मीनाकुमारीला लहान मुले खूप आवडायची. चित्रपटात लहान मुलांना मारायचा सीन असला की मारल्यानंतर ती त्यांना मायेने जवळ घ्यायची आणि रडायची तिने कुणाकडून काही घेतले नाहीत, देतच राहिली. अमरोही पासून वेगळं जरी राहत असली तरी अमरोही च्या पाहुण्यांचा मान सन्मान करीत असे.अमरोही पासून वेगळं झाल्यापासून ती दारूच्या आहारी खूप गेली होती. सांगितलं जातं की धर्मेंद्र सोबतचं प्रेमभंग झाल्याने ती खूपच अल्कोहोलिक होती. अमरोही नंतर धर्मेंद्र आपल्याला आधार देईल असं मीनाकुमारीला वाटलं होतं. सांगितलं जातं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ती धर्मेंद्रला पत्र पाठवायची की एकदा मला भेट पण धर्मेंद्र कडून तिला प्रतिसाद मिळाला नाही. मीनाकुमारीची आर्थिक परिस्थिती खूपच हालक्याची झाली होती. दारू साठी सुध्दा पैसा नसायचा. सांगितलं जातं की शेवटच्या क्षणी ती रात्र न दिवस  दारूच्या नशेत राहायची. तिचे नोकर तिला तिच्या दारू मध्ये देशी टाकून द्यायचे तरी तिला भान नसायचं, नोकर तिच्या शरीराशी खेळायचे पण तिला कसलं भान नाही असायचं. तिला जेव्हा कळलं की आपण आता जिवंत राहू शकत नाही तेंव्हा मुमताज कडून तीन लाख उसने घेतल्याची परतफेड म्हणून जुहूचा बंगला मुमताजला मरण्यापूर्वी  देऊन टाकला, कुणाचं कर्ज अंगावर घेऊन नाही गेली. तिच्या अंतविधी साठी पैसे नव्हते तेव्हा एका निर्मात्याकडे तिचा पैसा होता, त्या निर्मात्याने तो पैसा देऊ केला मग तिची अंतविधी झाली. अशाप्रकारे या अभिनय साम्राज्ञीचा ३१ मार्च १९७२ ला अंत झाला.</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/minakumari_01.jpeg" alt="Minakumari_01"></img><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/suresh-shirshikar.jpg" alt="suresh shirshikar"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मनोरंजन</category>
                                            <category>Stories</category>
                                            <category>लेख</category>
                                            <category>बॉलिवूड</category>
                                            <category>अभिनेत्री</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5480/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5480/lekh</guid>
                <pubDate>Fri, 29 Jul 2022 14:46:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/minakumari.jpeg"                         length="235440"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&quot;महाआघाडी सरकारचे भवितव्य ठरवणारी राज्यसभेची निवडणूक&quot;</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>  </p>
<p>प्रकाश महागांवकर, पुणे</p>
<p>सहा राज्यसभा जागांची निवडणूक दहा जूनला आहे. आणि लगेच वीस जूनला विधान परिषदेवर पाठवायच्या  जागांची निवडणूक आहे. </p>
<p>राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. ते कायम राहतील असे आत्ता तरी वाटत आहे. फॉर्म मागे घेण्यासाठी ची आजची दुपारी तीन वाजे पर्यंत ची वेळ आहे. </p>
<p>भाजपाचे महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार या पैकी कोण माघार घेतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. </p>
<p>परंतू शेवटच्या क्षणी भाजपा उध्दव ठाकरेंना त्यांचेवर केलेल्या उपकाराची जाणिव करून देईल असे वाटते. </p>
<p>महा विकास आघाडीचे सरकार, उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सोनियाजींचे आदेशाने राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन, राजकारणातील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4242/politics"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-06/spdm.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p> </p>
<p>प्रकाश महागांवकर, पुणे</p>
<p>सहा राज्यसभा जागांची निवडणूक दहा जूनला आहे. आणि लगेच वीस जूनला विधान परिषदेवर पाठवायच्या  जागांची निवडणूक आहे. </p>
<p>राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. ते कायम राहतील असे आत्ता तरी वाटत आहे. फॉर्म मागे घेण्यासाठी ची आजची दुपारी तीन वाजे पर्यंत ची वेळ आहे. </p>
<p>भाजपाचे महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार या पैकी कोण माघार घेतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. </p>
<p>परंतू शेवटच्या क्षणी भाजपा उध्दव ठाकरेंना त्यांचेवर केलेल्या उपकाराची जाणिव करून देईल असे वाटते. </p>
<p>महा विकास आघाडीचे सरकार, उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सोनियाजींचे आदेशाने राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन, राजकारणातील लबाड्यांचा अतिरेक करून, जनमताच्या स्पष्ट कौला विरोधात जाऊन, अभद्र आघाडी करून, स्थापन केलेले सरकार आहे. </p>
<p>त्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी सर्व जातीभेद, धर्मभेद, नाती गोती, बाजूला सारून काम करणारे प्रामाणिक सरकार निवडण्यासाठी स्पष्ट मतदान केले होते.</p>
<p>शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढल्या मुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मतदान करण्याचे उद्देशानेच मतदान झाले. </p>
<p>युती असल्यामुळे जिथे भाजपचा उमेदवार नव्हता तिथे मित्रपक्षाला मते दिली. </p>
<p>केवळ त्या मुळे शिवसेनेला 56 आमदारांची बेगमी मिळाली. </p>
<p>त्या लाटेत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणे स्वतंत्र लढली असती तर शिवसेनेचे फार तर दहा आमदार निवडून आले असते, असा तो कौल होता. </p>
<p>परंतू संभाजीराजे छत्रपती यांना जसे तोंडघशी पाडून शिवसेनेने स्वतः तर शब्द फिरवलाच  पण त्याच बरोबर शरद पवार साहेबांनाही शब्द फिरवायला भाग पाडले. दोन वर्षापूर्वी फौजीया खान ला निवडूण आणण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देऊन. </p>
<p>तसेच सहा महिन्यात उध्दव ठाकरेंना निवडून येणे गरजेचे असताना, </p>
<p>कोविड 19 मुळे निवडणूका घेणे अवघड असताना, उध्दव ठाकरेंच्या विनंतीला मान देवून त्यावेळी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी समजूतदार पणा दाखवत निवडणूक होऊ दिली आणि तीही तडजोड करून बिनविरोध. </p>
<p>आता जर त्या भाजपच्या सर्वोच्च नेत्याने उध्दव ठाकरेंना एक उमेदवार मागे घ्या, शक्यतो संजय राऊत, तर उध्दव ठाकरे काय करतील ? </p>
<p>अशा वेळी भाजप तीन आणि महाआघाडीचे तिघांचे प्रत्येकी एक प्रमाणे तीन बिनविरोध निवडून येतील. </p>
<p>संजय पवार नवखा आणि सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना माघार घ्यायला भाग पाडणे सोपे आहे परंतू तो सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याचा अपमान ठरेल. </p>
<p>जनमानसातील कोणत्याच कप्यात संजय राऊतांना  स्थान नाही. केवळ आघाडीचे निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली म्हणून त्यांना पहील्या पसंतीचा उमेदवार करणे संजय पवार वर आन्याय करणारे ठरणार आहे, </p>
<p>आणि माघार न घेता निवडणूक लढवली तर  शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. </p>
<p>कारण फक्त दहा मते भाजपला लागणार आहेत. ती मते सहयोगी पक्ष, सहयोगी अपक्ष आणि ईतर छोटे पक्ष भरून काढतील. उलट शिवसेनेला जवळपास एकोणवीस वीस मते लागणार आहेत. </p>
<p>त्यात आरोपपत्रे दाखल झालेली असल्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाला मज्जाव केला तर गणिते अजून बिघडतील.</p>
<p>अशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांचा मान राखून संजय राऊत या बेभरोशी, बेलगाम बडबड्या  करप्ट उमेदवाराला माघार घ्यायला लाऊन मावळ्यांचा यथोचित मान राखणे शिवसेनेच्या भवितव्यासाठी</p>
<p>चांगले ठरेल. </p>
<p>नाहीतर सच्चा आणि कट्टर बाळासाहेबांच्या मावळ्यांनी आयुष्यभर फक्त सतरंज्याच  उचलाव्यात असा मेसेज जाईल. तोंड चोपडे आणि जनतेत काडीची किंमत नसणारे, नेत्यांचे चमचेच निवडून येतात असा  मेसेज सामान्य कार्यकर्त्यांना जाईल. </p>
<p>त्यामुळे हट्ट सोडावा, दुराग्रह गुंडाळून ठेवावा आणि कठोर निर्णय घेऊन संजय राऊतांना बसवावे आणि शिवसेनेची गेलेली पत थोडी तरी सावरावी, ही उध्दवजींना उत्तम संधी आहे. </p>
<p>शिवाय ठाकरे कुटूंबाला अडचणीत आणणाऱ्या बोलघेवड्या, भ्रष्ट माणसाला धडा शिकवल्याचे  पूण्य उध्दवजींना मिळेल. </p>
<p>महाडीक हे मुरब्बी राजकारणी असून धनशक्तिचे मालक आहेत. </p>
<p>कुस्त्यांचे डावपेच माहीत असणारे पैलवान आहेत. जिद्द व पाठबळ आहे आणि हीच उत्तम संधी पण आहे निवडून येण्याची. </p>
<p>शिवाय एकदा राज्यसभेवर निवडून आले की विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण झोकून प्रचार पण करता येईल आणि सतेज पाटलांची गूर्मी पण शमवता येईल. </p>
<p>छत्रपती शाहू महाराजांनी मात्र अनावश्यक वेळी छत्रपती संभाजी राजेंच्या विरोधात बोलून, आणि भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून घरातले मतभेद अकारण चव्हाट्यावर आणले, आणि छत्रपती असूनही जातीयवादी विचारसरणी उघड केली. </p>
<p>असो, ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे. </p>
<p>मी लिहीत असतांनाच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत असे कळाले आणि आजच संध्याकाळी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी महाआघाडीची संयुक्त बैठक घेऊन आपले आघाडीचे चारही उमेदवार कसे निवडून आणायचे यावर विचारविनिमय करून आपले डावपेच आखण्यासाठी बैठक बोलावली आहे. </p>
<p>माझ्या मते ही चुरशीची निवडणूक म्हणजे दोन्ही बाजूंना आपली शक्ती आजमावण्याची एक संधी आहे. </p>
<p>यात भाजपा उमेदवाराचा पराभव झाला तर मात्र फडणवीस यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. </p>
<p>जर तीनही उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आणले तर पक्षांतर्गत विरोधक म्हणजे पंकजाताई मुंढे, विनोद तावडे यांची बोलती बंद होईल आणि त्यांना दोघांनाही भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत राहावे लागेल. </p>
<p>जर यदाकदाचित भाजपचा तीसरा उमेदवार आला,  आणि शिवसेनेचे दोन्ही तसेच कॉंग्रेस चे लादलेले सुमार उमेदवार इम्रान (खान)  प्रतापगढी  यापैकी कोण पराभूत होईल हे पाहावे लागेल. </p>
<p>भाजपने शिवसेनेला व्यवस्थित कात्रीत पकडले आहे. </p>
<p>संजय पवार हरले तर पक्षात प्रचंड नाराजी होईल. </p>
<p>शिवसेनेत उठाव होईल. आणि इम्रान प्रतापगढी हरले तर सोनियाजी  असहाय होतील. त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मते न दिल्याने आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करणे अवघड जाईल. सरकार कोसळेल. </p>
<p>संजय पवार हरले तरी सरकार धोक्यात येणार आहे. </p>
<p>भाजपचा प्रस्ताव ऐकायला हवा होता. राज्यसभेची  एक जादा जागा देऊन विधान परिषद ची एक आमदारकी वाढवून घेणेच झाकल्या मुठी सारखे झाले असते. </p>
<p>आता भाजप सर्व प्रकारचु पूर्ण ताकद  लावून मुन्ना महाडीक यांना निवडून आणणारच.</p>
<p>जर इम्रान प्रतापगढी यांना पक्षादेश शिरसावंद्य माणून कॉंग्रेस च्या सर्व 44 आमदारांनी मते दिली तर संजय राऊतांचा गेम व्हावा. बिचाऱ्या संजय पवार चा नव्हे. </p>
<p>कारण मनीध्यानी नसताना त्यांना गाजर दाखवण्यात आले आहे. संजय राऊत यांनी स्वतःच  आपणा स्वतःला एक क्रमांकाचा उमेदवार ठरवून संजय पवारला द्वितीय दर्जा दिला आहे. आता पक्षप्रमुख म्हणून उध्दवजी ठाकरे यांनी निवडून येण्याची जबाबदारी संजय राऊतांवर टाकून पक्षाचे पहीली 42 मते संजय पवारला द्यावीत आणि शिल्लक सेनेचे अधिक राष्ट्रवादीचे मतांसह इतर पक्षांची व अपक्षांची मते मिळवून निवडून येऊन दाखवावे असे आदेशच संजय राऊत यांना द्यावेत. </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>संपादकीय</category>
                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4242/politics</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4242/politics</guid>
                <pubDate>Fri, 03 Jun 2022 17:44:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/spdm.jpg"                         length="90792"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लाल बावटा शेतमजूर युनियनचे कलेक्टर कार्यालयावर धरणे आंदोलन</title>
                                    <description><![CDATA[भुमीहीनांना जमीन, मजूरांना किमान वेतन,पूरेशे राशन, वृध्दापकाळात पेन्शन, मुलांना मोफत शिक्षण आदी मागण्यांकडे वेधले लक्ष.]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3904/lalbavta-strike"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/img-20220520-wa0019.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्युज </strong></p>
<p style="text-align:left;">औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते ४ पर्यंत धरणे आंदोलन झाले. भुमीहीनांना जमीन, मजूरांना किमान वेतन, पूरेशे राशन, वृध्दापकाळात पेन्शन, मुलांना मोफत शिक्षण, निराधारांना नियमित अनुदान आदी मागण्यांकडे आजच्या आंदोलनाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.</p>
<p> </p>
<p>तुर्काबाद खराडी,कदीम टाकळी,  वावना,निधोना,वाहेगाव,वडोद बाजार,वाळूज,आंबेलोहळ,आळंद,शेरुडी,पाडळी,सिल्लोड आदी गंगापूर, फुलंब्री,सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील सुमारे २५ गावातील भूमीहीन,गायरानधारक,बेघर,रोहयो मजूर यात सहभागी झाले होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.गव्हाणे यांना लाल बावटा शेतमजूर युनियनचे २० जणांचे शिष्टमंडळ भेटले व विविध मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा केली.</p>
<p>आजच्या आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर युनियनचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती, जिल्हा सचिव तथा राज्य सहसचिव कॉ.गणेश कसबे, कॉ.शेख नूर,कॉ.गयाबाई सोनवणे,कॉ.मोबीन बेग, कॉ.विठ्ठल त्रिभुवन,कॉ.हरिभाऊ हाटकर, कॉ.इंदुमती केवट, कॉ.बशीर खान आदींनी केले. शेतमजूर पंचायतचे साथी सुभाष लोमटे,लाल निशाण पक्षाचे कॉ.भीमराव बनसोड, भाकपचे जिल्हा सचिव कॉ.अशफाक सलामी, हॉकर्स, कंत्राटी कामगार व रिक्षा युनियनचे नेते कॉ.अभय टाकसाळ,आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे विकास गायकवाड आदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. </p>
<p> त्र्यंबक चौथमल,बबन बोराडे, कैलास थोरात,शाबेरा फैय्याज, रामनाथ काळे, अशोक बत्तीशे,शोभाबाई आव्हाड,नंदु तोडकर, धोंडीराम खोतकर, परमेश्वर बत्तीशे,चंद्रभान काळे, अशोक बत्तीशे,संजय वाघ, भगवान वाघ,कॉ.सलीम,रुखमण बाई श्रिखंडे,कानबाई जाधव, शशिकला तिकटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे ७० -७५ जण आजच्या धरणे आंदोलनात उपस्थित होते. येत्या १३ जून रोजी मुंबई येथे मंत्रालयात लाल बावटा शेतमजूर युनियनचे २५ जणांचे शिष्टमंडळ संबंधित मंत्र्यांना भेटून खालील मागण्या संदर्भात चर्चा करणार आहे.तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी २६ जून रोजी बीड येथे राज्यव्यापी गावरान व वनजमीन हक्क परिषदही लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने होणार आहे.आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्यांचा समावेश आहे.</p>
<p>*<strong>मागण्या</strong>*</p>
<p>(१) गायरान जमीन धारकांच्या नावे जमीनीचे पट्टे करण्यात यावेत.(२) अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासनाने पूर्वी ठरवलेली १४ एप्रिल १९९० ही तारीख दुरूस्त करून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करावीत(३) सरकारी ,गायरान जमीनीवरील अतिक्रमित धारकांची अतिक्रमणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत नियमित करावीत(४) रोजगार हमी मजूरांना ६००/- रूपये किमान वेतन देण्यात यावे.(५) केरळ ,तामिळ नाडू राज्यांप्रमाणे शेतमजूरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.(६) शेतमजूरांसाठीचा केंद्रीय कायदा केंद्र सरकारने करावा.(७) श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान अदा करावे.दरमहा ५ तारखेच्या आत अनुदान देण्यात यावे व दरमहा किमान २००० अर्थसहाय्य देण्यात यावे.(८) गरजू निराधारांना दाखल्याची अट रद्द करावी.लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात यावी.(७) गरजू बेघरांच्या घरकुलांची सर्व प्रकरणे मंजूर करावी.(८) घरकुलासाठी ५ लाख रूपयांचे अनुदान देण्यात यावे.(९) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बंद करण्यात आलेले पोर्टल त्वरित सुरू करावे.(१०) शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा किमान २०००/- रूपये पेन्शन देण्यात यावे.(११) शेतमजूर, ग्रामीण कष्टकऱ्यांच्या मुलांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यावे. (१२) मध्यान्ह भोजन योजनेवरील खर्चात कपात करू नये व याचे अनुदान वाढवण्यात यावे (१३) प्राथमिक आरोग्य केंद्रे व उप केंद्रात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध कराव्यात.(१४) सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करावी.(१५) विकास कामासाठी अतिक्रमितधारकांच्या घेतलेल्या जमीनीचा योग्य मोबदला देण्यात यावा.(१६) सिंचन‌ विहिरीच्या कुशल व अकुशल कामाचा मोबदला त्वरित देण्यात यावा.महुमणी रोपवाटिकेच्या कामाचा थकीत मोबदला त्वरित द्यावा.(१७) कष्टकरी,दलित, गरीब मंडप व्यावसायिक, बॅंड वाजवणारे इ. कष्टकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे.(१८) जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामाचे थकीत वेतन त्वरित अदा करावे.(१९) मनरेगाचे अनुदान वाढवण्यात यावे.(२०) सतत वाढत जाणाऱ्या महागाईस आळा घाला.शेतमजूर,रोहयो मजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांचे जगणे सुसह्य करा.</p>
<p>बैठकीच्या प्रारंभी शेतमजूर युनियनचे दिवंगत नेते कॉ.मनोहर टाकसाळ व किसान सभेचे दिवंगत नेते कॉ.नामदेव गावडे यांना श्रध्दांजली ‌वाहण्यात आली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3904/lalbavta-strike</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3904/lalbavta-strike</guid>
                <pubDate>Fri, 20 May 2022 19:23:55 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/img-20220520-wa0019.jpg"                         length="404111"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अंबऋषी संस्थानला 'ब' दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करा</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong> <br /><strong>  संदीप मानकर</strong></p>
<p><br />अजिंठा : नैसर्गिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील श्री. अंबऋषी संस्थानला 'ब' दर्जा देण्यासह येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आले आहे. शासनास तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. आमसरी येथील देवस्थान व परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.     </p>
<p>आमसरी ता. सिल्लोड येथील श्री. अंबऋषी संस्थान येथे भाविकांची संख्या वाढावी तसेच येथील स्थानिकांना रोजगार व व्यवसायाला चालना मिळावी यासह येथे मूलभूत व पायाभूत</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3896/abdul-sattar"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/whatsapp-image-2022-05-20-at-3.02.59-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong> <br /><strong> संदीप मानकर</strong></p>
<p><br />अजिंठा : नैसर्गिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील श्री. अंबऋषी संस्थानला 'ब' दर्जा देण्यासह येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आले आहे. शासनास तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. आमसरी येथील देवस्थान व परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.     </p>
<p>आमसरी ता. सिल्लोड येथील श्री. अंबऋषी संस्थान येथे भाविकांची संख्या वाढावी तसेच येथील स्थानिकांना रोजगार व व्यवसायाला चालना मिळावी यासह येथे मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करून विकास कामे हाती घेण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरील निर्देश दिले.<br /><br /> बैठकीस श्री.अंबऋषी संस्थांनचे पिठाधिश महंत कृष्णगिरी महाराज,  उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय सोनवणे, सिल्लोड शाखा अभियंता श्री. चाटे, फर्दापूर शाखा अभियंता धर्मराज दराडे, सोयगाव शाखा अभियंता नितीन राठोड, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सडक योजनेचे उपविभागीय अभियंता उमेश लिंभारे, कनिष्ठ अभियंता मंगेश डापके, जलसंपदा विभागाचे उप कार्यकारी अभियंता मिलिंद नाकाडे, सोयगाव शाखा अभियंता अक्षय सौदे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका आरोग्य अधिकारी नासेर पठाण,  जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता यतीन कोठावळे, सोयगाव शाखा अभियंता रोशन महाजन, सिल्लोड शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक मोदिराज, अजिंठा पोलीस स्टेशनचे एपीआय अजित विसपुते, वीज वितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता सचिन बन्सोडे, भास्कर कोळे, सहायक अभियंता दीपक साखळे, अजिंठा वनपालक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे, सिल्लोड वनपालक्षेत्र अधिकारी संजय भिसे, शेषराव तांबे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दिगंबर रायबोले, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे उप अभियंता सुभाष महाजन, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पांडुरंग चौधरी आदीं अधिकाऱ्यांसह माजी  पं. स. सभापती रेखा किशोर जगताप, पं. स.सदस्य शेख सलीम, माजी जि.प. सदस्य भिका वाघ, आमसरी सरपंच वंदना विष्णू दांडगे, राजू बाबा काळे, सुधाकर काळे, कंत्राटदार अशोक देशमुख, धोत्रा येथील जीवनसिंग जाधव, साहेबराव दांडगे, पानवदोड सरपंच गजानन पन्हाळे, पानवदोड बु उपसरपंच प्रमोद दौड, संदीप इंगळे, श्रावण इंगळे, ज्ञानेश्वर जाधव, राजू जाधव, देवराव पाडळे, सीताराम जाधव, मोहन ढोले आदींसह शिवना, आमसरी, वाघेरा, मांदणी व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>Stories</category>
                                            <category>आध्यात्म</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3896/abdul-sattar</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3896/abdul-sattar</guid>
                <pubDate>Fri, 20 May 2022 15:37:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/whatsapp-image-2022-05-20-at-3.02.59-pm.jpeg"                         length="139344"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बारा किलोमीटर च्या रस्त्यावर बारा हजार खड्डे..!</title>
                                    <description><![CDATA[कन्नड-चिखलठान रस्त्यावर मरणयातना; रस्ता रोको, आंदोलन करून ही परिस्थिति "जैसे थी वैसी है"]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3794/kannad-road-story"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/img-20220516-wa0033.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>सय्यद आरेफ़</p>
<p> कन्नड तालुक्यात महामार्गाचे काम जलद गतिने करून रस्ते चका-चक करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात बाय-पास हाइवे चे काम आता आंतिम टप्यात राहिल्याचे दिसत आहे, ज्या प्रमाणे महामार्गाचे काम शुरू त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोल नाके सुद्धा बनविन्यात आले आहे,आणि तिथुन सक्तीने टोल वसूली सुरु असल्याने माहिती समोर आली आहे, एकी कड़े शासन न होणारे काम तड़का फडकी ने करीत आहे, ते पन कोटया वधिचे काम, मात्र ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यालाच का घर-घर लागली आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे, कन्नड-चिखलठाण रसत्याची अत्यंत चाळनी झाली असून येणाऱ्या जाणाऱ्याना तारेवर्ची करसत करावी लागत आहे, कन्नड चिखलठाण या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे वाहने कृती होत असून वाहन धारकांना पाठ मनक्याच्या आजारा समोर जावे लागत आहे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागात जाणीवपूर्वक वृक्ष दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे चिखलठाण ते कन्नड या रस्त्याची दुरवस्था मुळे पंचक्रोशीतील गावांचा विकास खुंटला असल्याची स्थिती सत्य समोर येत आहे संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदारांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांना मरण यातना भोगायला लागत आहे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे चिखलठाण,भोकनगांव, दाभाडी बहीरगाव, कुंजखेड़ा, हिवरखेडा ठाकुरवाडी नींडोंगरी,वडाळी घूसरतांडा, तिसगाव ,या गावातील नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे संतप्त नागरिकांनी चार वेळा नाक्यावर रास्ता रोको केला तरीदेखील प्रशासन याची काहीच दखल घेतलेली नाही वेळेपुरते आंदोलकांना दिलासा देऊन देऊन वेळ काढला जात आहे, मात्र या रस्त्याचा प्रश्‍न कोणी सोडायला तयार नाही,</p>
<p> कन्नड तालुक्यातील चिखलठाण या रस्त्याला तब्बल दहा वर्षे झाले आहे ,त्याच्यामध्ये ज्या वेळेस मोर्चे आंदोलन केले जाते.त्याच वेळी संबंधित विभाग ,थातुरमातुर डागडुजी करून वेळ काढून घेतात, मात्र या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करून समस्या मिटवयाला कोन्ही तयार नाही, उदासीन लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे, या सर्व प्रकारातील रस्त्याची तुलना करता गुणवत्तेच्या संदर्भात या रस्त्याचा स्पर्धा करू शकेल असा एकही रस्ता तालुक्यात अजिबात दिसणार नाही, हे ही नेमकी कोणाची अपयश? येथे कार्यरत असलेले विविध प्रशासकीय अधिकारी येथील लोकप्रतिनिधींना जुमानत नाही का? येथील रस्ते अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे कुरने बनले आहे, भूतकाळात हे वारंवार सिद्ध झाले आहे रस्ते बांधकामाचे निकषांचे पालन केले जात नाही, याकडे कोणाचे लक्ष नाही बहुतांशी रस्त्याची बाजू पट्टी नाही, साइड पंखे वेवस्थित भरले नही ज्या ठिकाणी नवीन काम केले आहे तिथे रस्ता फुटायला सुरवात झाली आहे. वारंवार मागणी करून ही रसत्याचे काम मार्गी लागत नसल्याने सम्बंधित विभागा बद्दल नागरिक रोष ची भावना व्यक्त करीत आहे,</p>
<p> </p>
<p>*लोकप्रतिनिधि निवडणुका पुरते येता आणी मोठे आश्वासन देऊन गायब होता...*</p>
<p>चिकलठान परिसरातील लोकांना कन्नड तालुका हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण तिथं तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, बँका, तसेच मुलांचे शाळेचे शिक्षण, उच्चशिक्षण, यासाठी ग्रामीण लोकांना कन्नड जावेच लागते. मात्र दररोज येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहिल्याने दररोज येणारे जाणारे प्रवासांचे काय हाल होत असेल? हे आम्हालाच माहित असा प्रश्‍न ग्रामीण उपस्थित करत आहे, कन्नड तालुक्यातील कन्नड तालुक्यात शहरा सोबत प्रत्येक ठिकाणी मोठमोठे महामार्ग निघालेल्या आहे, मात्र ग्रामीण रस्त्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार, चिखलठान गावाची लोकसंख्या मोठी असल्याने इथे सर्वच प्रकाराचे नेते मंडळी, लोकप्रतिनिधि येतात सभा घेतात मोठ मोठाले आश्वास देऊन गायब होतात, या रसत्या बाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कड़े रसत्या बाबत निवेदन देऊन कैफियत मांडली होति, मागील काहि वर्षा पासून रसत्याची दयानीय दुरवस्था झाली असून याकडे कोंन्हीच लक्ष द्याला तयार नसल्यामुळे नागरिक संबंधित विभागाच्या विरोधात रोष व्यक्त करत आहे,</p>
<p> </p>
<p>*प्रतिक्रिया*</p>
<p>तालुक्यातिल चिखलठान हा गाव उद्योग धंदया सोबत आधुनिक शेती करून प्रगतिशील शेतकरीचे प्रमाण अधिकच आहे, येथे दूधाचा व्यवसाय प्रगतिपथावर सुरु आहे,तसेच या ठिकाणी शेतकरयांचे माल घेण्याची दूर दुरुन व्यापारी वर्ग येतात, मात्र मागील काहि वर्षा पासून कन्नड चिखलठान रसत्याची व्यवस्था अधिक बिकट होत चाल्ल्याने रसत्या अभावी व्यापारी वर्ग येणे टालू राहिले, अनेकांना या रसत्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, सम्बंधित विभागाने आमचा धिर चा फायदा उचलु नये व तातडीने या रसत्याचे काम सुरु करावे</p>
<p>- युवराज चव्हाण माजी सरपंच चिखलठाण</p>
<p> </p>
<p>रसत्यानमुळे अनेकांना मंनक्याचे,कम्बरेचे,पोटाचे आजार जडले आहे,या रसत्याचा सर्वात जास्त त्रास वयोवृद्ध लोकांना होतो, कन्नड जाण्याची रसत्याची अवस्था बघून इच्छाच होत नाही,परिसरात मोठे दवाखाने नसल्याने गरोदर मातेचि तर जास्तच होल होत आहे, अनेकांनी तर खराब रसत्या मुळे कन्नड येथील दवाखान्यात नेत असतांना रसत्याटच दम सोडले आहे, रसत्या अभावी नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत लवकरात लवकर या रसत्याचे काम सुरु करावे नस्ता उपोषण करण्यात येईल,</p>
<p>-शिवप्रभु ज्ञाने, सामाजिक कार्यकर्ते चिखलठाण</p>
<p>कन्नड तालुक्यातील चिखलठान परिसरात रसत्याची अशी दयानीय व्यवस्था झाली आहे एखादा तरी पाऊस पडली की रसत्याला तलावाचे स्वरूप येता,यावरून कळते की रसत्याची व्यवस्था कशी असेल..</p>
<p> </p>
<p>छाया : सय्यद आरेफ़</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                            <category>Stories</category>
                                            <category>हटके</category>
                                            <category>पावसाळा</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3794/kannad-road-story</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3794/kannad-road-story</guid>
                <pubDate>Mon, 16 May 2022 13:30:54 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/img-20220516-wa0033.jpg"                         length="151542"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र &amp;#8216;वनिता बोराडे&amp;#8217;</title>
                                    <description><![CDATA[राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी-शक्ती’पुरस्कार प्रदान ! वन्यजीव संवर्धन चळवळ उभारली !तीस वर्षांत ५१ हजार सापांना जीवनदान! प्रा.बाळासाहेब बोराडे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’या उक्तीप्रमाणे महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव संवर्धन मोहीम हाती घेतली.वयाच्या दहाव्या वर्षांपासून सापांशी मैत्री केली.मागील तीस वर्षांत एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.पर्यावरण हेच प्राणसंजीवनआहे. मानवजातीचे हित त्यात सामावले आहे.वनिता बोराडे म्हणतात, वन्यजीव, नैसर्गिक… Continue reading आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र ‘वनिता बोराडे’
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/2288/-e0-a4-86-e0-a4-a7-e0-a5-81-e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-95--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a5-87-e0-a4-b6-e0-a4-b2--e0-a4-9c-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-a4"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-03/img-20220319-wa0195-1.jpg" alt=""></a><br /><p> राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी-शक्ती’पुरस्कार प्रदान !</p>    <p>वन्यजीव संवर्धन चळवळ उभारली !तीस वर्षांत ५१ हजार सापांना जीवनदान!</p>    <p>प्रा.बाळासाहेब बोराडे</p>    <img width="666" height="1002" src="https://www.adhunikkesari.com/media/2022-03/img-20220319-wa0195.jpg" alt="" class="wp-image-6842"></img>    <img width="426" height="640" src="https://www.adhunikkesari.com/media/2022-03/img-20220319-wa0191.jpg" alt="" class="wp-image-6841"></img>    <p>‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’या उक्तीप्रमाणे महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव संवर्धन मोहीम हाती घेतली.वयाच्या दहाव्या वर्षांपासून सापांशी मैत्री केली.मागील तीस वर्षांत एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.पर्यावरण हेच प्राणसंजीवनआहे. मानवजातीचे हित त्यात सामावले आहे.वनिता बोराडे म्हणतात, वन्यजीव, नैसर्गिक संपदा ही आपली राष्ट्रीय संपत्ती.तिचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य. सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीवांचे संगोपन,संवर्धन, संरक्षण आणि प्रबोधन या चतु:सूत्रीचा वापर केला. शाळा, महाविद्यालय,सामाजिक संस्था, शासन या माध्यमातून जनजागृती केली.त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’पुरस्कार, राष्ट्रीय सेवा सन्मान, गिनीज बुक,एशिया बुक,लिम्का बुक,इंडिया बुक,महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् यासारख्या संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतली.नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा नामांकन.आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी संघटनांनी जगातील पहिली सर्पमित्र महिला म्हणून घोषणा केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आठ मार्च २०२२रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते’नारी-शक्ती’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा हा सन्मान सकल नारी जातीचा सन्मान आहे.</p>    <hr class="wp-block-separator" />    <p>आपण नुसते सापाचे नाव ऐकले तरी आपल्या अंगावर काटा येतो.रस्त्यावरून जातांना अचानक भला मोठा साप दिसला की भंबेरी उडते.भल्या भल्याना घाम फूटतो. कधीकधी तर काडी किंवा दोरीलाही साप समजून घाबरतो. रात्री स्वप्नात साप आला की दचकून खडबडून जागे होतो. आपण नेहमीच सापांच्या दहशदीखाली वावरत असतो. सापाबद्दलचे अज्ञान,अंधश्रद्धा आणि गैरसमज हे त्यांचे महत्वाचे कारण.भीतीपोटी लोक घाबरून स्वतः मरतात आणि सापालाही मारतात.परंतु या बाबतीत महाराष्ट्रातील कर्तबगार व साहसी कृषिकन्या,महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी मानवी जीवनातील पर्यावरणाचे महत्व जाणून वन्यजीवांचे संरक्षण, संगोपन,संवर्धन व प्रबोधन या चतुःसूत्रीच्या माध्यमातून साप वाचवण्याचा निर्धार केला. सामाजिक संस्था,शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालयातुन जनजागृती केली.तीस वर्षात एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.जल,जन,जंगल,जमीन, आणि जनावर यांना वाचवण्याची मनाशी खूणगाठ बांधली.जगातील पहिली सर्पमित्र महिला होण्याचा मान त्यांना मिळवला.आठ मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी शक्ती’पुरस्कार प्रदान करण्यात आला.</p>    <p>बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ही सर्पमित्र वनिता बोराडे यांची कर्मभूमी.सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म. बालपण ग्रामीण भागात गेले.’कृषिकन्या’असल्याकारणाने शेतीशी जवळून संबंध आला.बालपणी निसर्गातील दुर्गम भागात भ्रमंती. आदिवासी बालमित्रांकडून पशु-पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी जाणून घेतले. झाडावर चढणे,डोंगररांगा सर करणे,विहिरी, नदी-नाले, डोहात पोहणे,झाडांचा डिंक,मधाचे पोगिळंकृत गोळा करणे हे त्यांचेआवडीचे खेळ.त्यामुळे बालवयातच पर्यावरणाचे बाळकडू मिळत गेले.त्यातूनच वन्यजीव व साप या विषयी अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. मधमाशा,पशु-पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी यांना जीवनदान दिल्याचा आनंद गगनात मावेनासा होई.आंतरातम्याला समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.परिसरात गोंड,आदिवासी,भिल्ल,बंजारा समाजांची लोकवस्ती असायची.ही सर्व मंडळी शेतात काम करण्यासाठी यायची.बालसवंगड्या बरोबर रममाण होऊन त्यांच्या सहवासातून आदिवासी कला,जीवन पध्दती, चालीरीती,रूढी परंपरा,कलामहोत्सव,निसर्ग सौंदर्य यांचा त्यांना जवळून परिचय झाला.प्राणिमात्रांवर जीव जडत गेला.निसर्ग सानिध्यातुन वन्यजीव व सापाविषयी काम करण्याची प्रेरणा मिळत गेली.</p>    <p>सर्पमित्र वनिता बोराडे यांना वयाच्या दहाव्या वर्षांपासून साप पकडण्याचा छंद लागला.सुट्टीच्या दिवसात शेतात सफर असायची.मच्छिमार मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकायचे.माशाबरोबर सापही जाळ्यात अडकायचे. मच्छिमार मासे बाजूला काढून साप परत पाण्यात सोडून द्यायचे.त्यावेळी त्यांच्या बालमनात अनेक प्रश्न निर्माण होत असत. या लोकांना साप कसे चावत नाहीत,त्यांना भीती वाटत नसेल का,ते सापाला कसे हाताळतात यासारखे प्रश्न मनात रेंगाळत.नंतर त्यांनी प्रत्यक्ष सापांना हाताळे.त्यातून त्यांना सापाबद्दलचे स्पर्शज्ञान होत गेले.हळूहळू सापाबद्दलची भीती आणि गैरसमज मनातुन कायमचे निघून गेले.पर्यावरण हे प्राण संजीवन या ब्रीदवाक्या प्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून निस्वार्थी भावनेतून वन्यजीव व सापांची सेवा केली. सापाविषयीचे गैरसमज दूर करून समाजात प्रबोधन घडवून आणले.मागील तीस वर्षांपासून खेडोपाडी, रानोरानी, डोंगरदऱ्या, नदी-नाले,विहिरी, तलाव,छतावर कितीतर अवघड ठिकाणी बिळात लपून बसलेले साप पकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी व नोंदणी करून पकडलेल्या सापांना वनविभागातील पोलिसांच्या उपस्थित जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले जाते.यामुळे साप आणि लोकांचे जीवन वाचण्यास मदत होते.मधमाशा,पशुपक्षी, सरपटणारे प्राणी यांना जीवनदान मिळाल्याचा आनंद होतो.मनाला समाधान मिळते.वनिताताई सांगतात माझ्या कुटुंबातील सदस्य आई-बाबा भाऊ यांनी कधीही कोणत्याच प्रकारचा सापाला स्पर्श केला नाही.पकडणे तर दूरच. घरात अध्यात्मिक वातावरण असल्या कारणाने मांसाहार वर्ज्य असे.लग्नानंतर सासरीही असेच भेटले त्यामुळे मांसाहार करण्याचा विशेष उरला नाही.साप,शेती, शेतकरी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मी गेल्या तीस वर्षापासून वन्यजीव संरक्षण संवर्धन करण्यासाठी चळवळ सुरू केली आहे.त्याचे फलित म्हणजे आजपर्यंत हजारो साप आणि लोकांचे प्राण वाचवले. सापाविषयी चे गैरसमज दूर करून शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रबोधन केले.यातूनच समाजामध्ये पर्यावरणा बद्दलची सद्भावना वाढीस लागल्याचे म्हटले आहे.</p>    <p>भारतामध्ये अज्ञान अंधश्रद्धामुळे लोकं सापांची हत्या करतात.आपली संस्कृती मात्र भूतदयेला महत्त्व देते. पशु, पक्षी,प्राणी यांना संरक्षण देऊन प्राणीमात्रांविषयी सदभावना निर्माण करण्याची शिकवण संस्कृती देते.मी या चळवळीतून वन्य जीवनाचे रक्षण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला.पर्यावरण प्राण संजीवनीआहे.वन्यजीव,साप ही आपली राष्ट्रीय संपत्ती.त्यांचे संगोपन,संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीस वर्षापासून मी काम करत आहे या कार्याला समाजानेही भरभरून प्रतिसाद मिळाला.मागील तीस<br />वर्षात एक्कावन्न हजारापेक्षा जास्त सापांना जीवनदान दिले. याकामी पती डी. भास्कर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सामाजिक कार्यास प्रोत्साहन दिले.रात्री-अपरात्री शेतकऱ्यांचे फोन आले की लोकांच्या मदतीला धावून जावे लागते.बोराडे परिवाराने साप तसेच इतर वन्यजीव वाचवण्याचा मोहीम हाती घेतली आहे सुरवातीच्या काळात लोकांना त्यांच्या सामाजिक कार्यावर विश्वास बसत नव्हता.अज्ञान,अंधश्रद्धेपोटी लोकं त्यांना जडीबुटीवाली,जादुटोनावाली म्हणायचे.चुकीच्या अफवा पसरावयाचे सापांच्या बदल्यात या बाईला काही आर्थिक लाभ मिळत असेल असा गैरअर्थ लावत असत. त्यांनी लोकांच्या टीकेला गांभीर्याने घेतले नाही.कुठलाही वाद न घालता कामावर पूर्ण निष्ठेने लक्ष केंद्रित केले.आज तीच माणसं या कार्याकडे आदराने पाहत आहे. समाजाने त्यांचे सेवाकार्य समजून घेतले व सहकार्यही केले.</p>    <p>वनिता बोराडे यांच्या सामाजिक कार्याची दखल राज्य,राष्ट्र, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यातआली.त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा नामांकन, मिशन इंटरनॅशनल जागतिक शांतता परिषदेच्या त्या सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय मल्टी टॅलेंट पुल मिशनचे सदस्य, इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मंगळअभियानांतर्गत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहावर पर्यावरणीय वन्यजीव सामाजिक कार्यकर्ता म्हणून सन्मान करण्यात आला.भारतीय डाक पोस्टल सेवेद्वारे त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले. महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, जागतिक राज्यघटना आणि संसदीय संघाकडून आजिवन सदस्यत्व,गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्,, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्,इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, यासारख्या जागतिक संस्थांनी वनिता बोराडे यांना सर्परक्षक,सर्पतज्ञ आणि सर्पमित्र म्हणून घोषित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सेवा सन्मान-२०२१’या पुरस्काराने सन्मानित.भारत सरकारच्या२०२१च्या पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन.८ मार्च २०२२ रोजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती’या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.</p>    <p>वन्यजीव,साप शेतकऱ्यांचे मित्र;समाजाने त्यांचे रक्षण करावे.</p>    <p>भारतामध्ये सापांच्या बावन्न जाती असून त्यापैकी फक्त बारा जाती विषारी तर चाळीस बिनविषारी आहेत.म्हणजे भारतातील नव्वद टक्के साप बिनविषारी आहेत.स्वतः हुन कोणता साप हल्ला करत नाही.साप डख धरतोअसे म्हणणे चुकीचे,निराधार आहे.सापं अंधार,गारवा, बीळ आशा सुरक्षित ठिकाणी लपून बसतात. भारतात शासकीय रुग्णालयात सर्पदंश प्रति-विष लस मोफत उपलब्ध आहे.त्यामुळे बाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होते.भितीचे काहीच कारण नाही.अंधश्रद्धा,गैरसमज दूर होऊन सापाचे संवर्धन,संरक्षण आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.साप घुशी,उंदरांचा नाश करतो.पीकांचे संरक्षण करतो.त्यामुळे साप शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे. पर्यावरण हे प्राण संजीवी आहे.म्हणून युवकांनी वन्यजीव, पर्यावरण संवर्धनास हातभार लावला पाहिजे.</p>    <p></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>Stories</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/2288/-e0-a4-86-e0-a4-a7-e0-a5-81-e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-95--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a5-87-e0-a4-b6-e0-a4-b2--e0-a4-9c-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-a4</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/2288/-e0-a4-86-e0-a4-a7-e0-a5-81-e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-95--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a5-87-e0-a4-b6-e0-a4-b2--e0-a4-9c-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-a4</guid>
                <pubDate>Mon, 21 Mar 2022 02:04:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-03/img-20220319-wa0195-1.jpg"                         length="120654"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        