<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/26/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>गुन्हेगारी - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/26/rss</link>
                <description>गुन्हेगारी RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मंठा : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून  कारवाई करण्यात आली.<br />धाडीदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16965/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0128.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मंठा : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून  कारवाई करण्यात आली.<br />धाडीदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू नष्ट करण्यात आली.याप्रकरणी अविनाश भगवान गायकवाड राहणार मंठा बीके कॉर्नर इंदिरानगर विनायक नारायण इंगोले राहणार मंठा या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>ही कारवाई पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, फौजदार संतोष माळगे, विठ्ठल केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी आनंद ढवळे, मंगेश चौरे, सतीश आमटे, शिवानंद काळुसे, संतोष बनकर, मुंजा कोलगणे, जगन्नाथ सुक्रे आणि महिला पोलीस कर्मचारी सुला मरकड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.<br />मंठा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16965/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16965/crime</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 20:40:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0128.jpg"                         length="1473156"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रकांत पतरंगे </p>
<p>गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी येथे प्रेमसंबंधाच्या आडून एका तरुणाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी करण्यात आली आणि मागणी पूर्ण न झाल्याने त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.</p>
<p>प्रेमसंबंधातून सुरू झाला कट</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीसोबत काही काळ प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी त्या तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाचा प्रवेश झाला आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच परिस्थितीचा फायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थी करण्याचा बहाणा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16922/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260404-wa0004.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रकांत पतरंगे </p>
<p>गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी येथे प्रेमसंबंधाच्या आडून एका तरुणाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी करण्यात आली आणि मागणी पूर्ण न झाल्याने त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.</p>
<p>प्रेमसंबंधातून सुरू झाला कट</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीसोबत काही काळ प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी त्या तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाचा प्रवेश झाला आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच परिस्थितीचा फायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थी करण्याचा बहाणा करत पीडित तरुणाला जाळ्यात ओढण्याचा कट रचला.</p>
<p>चॅट व्हायरल करण्याची धमकी; लाखोंची उकळपट्टी</p>
<p>“तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे. ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करू,” अशी धमकी देत आरोपींनी पीडित तरुणावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने तरुणाने त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. या पद्धतीने आरोपींनी आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.</p>
<p>आणखी १५ लाखांची मागणी</p>
<p>लाखो रुपये मिळूनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी पीडित तरुणाकडे आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत दबाव वाढवला. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.</p>
<p>अडवून मारहाण; जबरदस्तीने कीटकनाशक पाजले</p>
<p>दि. १३ मार्च २०२६ रोजी पीडित तरुण ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्यानंतर त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर शेतीमध्ये वापरले जाणारे कीटकनाशक जबरदस्तीने पाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. विष पाजल्यानंतर तो बेशुद्ध पडताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.</p>
<p>आत्महत्येचा बनाव करण्याचा प्रयत्न</p>
<p>या गुन्ह्याचे स्वरूप लपवण्यासाठी आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले आहे. पीडिताच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो पाठवून प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.</p>
<p>नागपूरमध्ये उपचार; मृत्यूशी झुंज</p>
<p>विषप्राशनामुळे तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ३ एप्रिल रोजी त्याला शुद्ध आली. त्यानंतर त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. या खुलाशामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले.</p>
<p>तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा</p>
<p>पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.<br />पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने इतर कुणालाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढले आहे का याचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.</p>
<p>‘हनी ट्रॅप’चे वाढते प्रकार चिंतेचा विषय<br />दरम्यान, सोशल मीडिया आणि मोबाईल चॅटिंगच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16922/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16922/crime</guid>
                <pubDate>Sat, 04 Apr 2026 20:50:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260404-wa0004.jpg"                         length="24147"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिमार्ट परिसरात रात्री दिड वाजण्याच्या सुमारास दोन गुन्हेगारांच्या टोळीत जून्या वादातून टोळी युद्ध भडकले असून तलवारीने व खंजीराने एकमेकांवर वार करुन तीन जण ठार झाले आहेत. दरम्यान एका गुन्हेगारांचा शासकीय रुग्णालयात खुन करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळाला विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. </p>
<p>नांदेड शहरातील गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नांदेड शहरातील डि मार्ट परिसरात असलेल्या एका एका सिनेमागृहात अर्जितसिंग व त्यांचे काही मित्र सिनेमा पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16916/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/video_preview_0000.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिमार्ट परिसरात रात्री दिड वाजण्याच्या सुमारास दोन गुन्हेगारांच्या टोळीत जून्या वादातून टोळी युद्ध भडकले असून तलवारीने व खंजीराने एकमेकांवर वार करुन तीन जण ठार झाले आहेत. दरम्यान एका गुन्हेगारांचा शासकीय रुग्णालयात खुन करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळाला विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. </p>
<p>नांदेड शहरातील गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नांदेड शहरातील डि मार्ट परिसरात असलेल्या एका एका सिनेमागृहात अर्जितसिंग व त्यांचे काही मित्र सिनेमा पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी महमंद आरबाज, सय्यद अवेज यांनी पाळत ठेऊन रात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर तलवार व खंजीराने सपासप वार करुन अर्जितसिंग यांचा खुन केला तर या वादात अर्जितसिंग सोबत असलेल्या मित्रांनी केलेल्या हल्ल्यात सय्यद अवेज यांचा खुन झाला तर महमंद आरबाज हा गंभीर जखमी झाला. सदरील घटना ही भाग्यनगर पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी मोहम्मद अरबाज यास वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील मारामारीची घटना अर्जितसिंग यांच्या भावाला समजताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन जखमी महंमद अरबाज यांच्यावर शासकीय रुग्णालयात हल्ला केला या हल्ल्यात जखमी महंमद अरबाज यांचा खुन करण्यात आला आहे. <br />सदरील प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी दोन्ही टोळीतील अनेकांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाला विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, पोलिस निरीक्षक तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली आहे. भाग्यनगर पोलिसांनी सदर प्रकरणांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलिस पथके तयार केली असून अनेकांना अटक केली आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या आरोपी विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड शहरातील डि मार्ट परिसरात घडलेल्या घटनेत साईलाला टोळी व सय्यद अवेज व अरबाज टोळीतील गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मयत अर्जितसिंग व महंमद अरबाज यांच्यात वाद झाला होता. त्या वादातून ही रक्तरंजित लढाई झाली आहे. सदरील घटनेमुळे नांदेड हदरले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16916/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16916/crime</guid>
                <pubDate>Sat, 04 Apr 2026 12:07:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/video_preview_0000.jpg"                         length="35327"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>महेश गायकवाड </p>
<p>सोलापूर : अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  आणि बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना सोलापूर येथील एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पत्नीचा प्रियकर सतत त्रास देऊन समाजात तुमची बदनामी करतो असे म्हणत असल्यामुळे पाटील दांपत्याने आत्महत्येचे टोकाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.</p>
<p>​सोलापूर शहरातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित दाम्पत्याने एका व्यक्तीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपले स्वतःचे आयुष्य संपवण्याचा अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला. सोमनाथ धानोप्पा पाटील आणि</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16766/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-03/img-20260301-wa0149.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>महेश गायकवाड </p>
<p>सोलापूर : अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  आणि बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना सोलापूर येथील एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पत्नीचा प्रियकर सतत त्रास देऊन समाजात तुमची बदनामी करतो असे म्हणत असल्यामुळे पाटील दांपत्याने आत्महत्येचे टोकाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.</p>
<p>​सोलापूर शहरातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित दाम्पत्याने एका व्यक्तीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपले स्वतःचे आयुष्य संपवण्याचा अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला. सोमनाथ धानोप्पा पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील अशी या घटनेत आपला जीव गमावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. हे दोघेही सोलापूर परिसरामध्ये स्थायिक होते आणि स्वतःचा किराणा मालाचा व्यवसाय चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्याला दोन लहान मुले देखील आहेत. त्यांच्या या अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.<br />​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या दोघा पती-पत्नीने काहीतरी घातक द्रव्य सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा या दोघांच्याही प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला, तेव्हा घरात असलेल्या त्यांच्या लहान मुलांनी घाबरून जाऊन ही गंभीर बाब तातडीने त्यांचे काका नवनाथ पाटील यांच्या लक्षात आणून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नवनाथ पाटील यांनी त्वरित त्यांना वैद्यकीय मदतीसाठी हलवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, अत्यंत दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आणि कोणतेही उपचार मिळण्याआधीच सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या दोघांचीही प्राणज्योत मालवली होती.</p>
<p>​या दुःखद घटनेमागचे नेमके कारण काय असावे, याचा शोध घेत असताना पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून आली. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या या चिठ्ठीमुळे प्रकरणाचा मोठा उलगडा झाला. या चिठ्ठीमध्ये विजयपूर येथे राहणाऱ्या अभिषेक कोरे या व्यक्तीच्या नावाचा अत्यंत स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला होता. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, विजयपूरचा रहिवासी असलेला अभिषेक कोरे हा श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याच्या याच एकतर्फी भावनेतून तो वारंवार श्रीदेवी यांना फोन करून तसेच त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना मोठा मानसिक त्रास देत होता. एवढेच नव्हे तर, समाजात पाटील कुटुंबाची बदनामी करण्याची भीतीही अभिषेक कोरे याच्याकडून सातत्याने दाखवली जात होती.<br />​अभिषेक कोरे याच्याकडून होणारा हा सततचा मानसिक छळ आणि समाजातील बदनामीची टांगती तलवार यामुळे सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघेही पती-पत्नी कमालीच्या तणावाखाली वावरत होते. या सततच्या जाचातून कोणताही मार्ग न सापडल्याने अखेर या पाटील दाम्पत्याने अत्यंत निराशेच्या भरात आपले जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. ​या घटनेची माहिती मिळताच सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील माहितीच्या आणि नावाच्या पुराव्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत विजयपूर येथून संशयित अभिषेक कोरे याला आपल्या ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची रीतसर नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस आता या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16766/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16766/crime</guid>
                <pubDate>Sun, 01 Mar 2026 20:29:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-03/img-20260301-wa0149.jpg"                         length="93395"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>धाराशिव : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईट उपक्षेत्रांतर्गत मौजे पाखरुड शिवारात अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सुमारे ८ लाख ७७ हजार रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.</p>
<p>गुप्त माहितीवरून रचला सापळा<br />पाखरुड शिवारात अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण आणि धोंडिबा चव्हाण या तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अंमली पदार्थ असलेल्या 'अफू'ची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीलायक माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) श्री.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16764/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-03/img-20260228-wa0076.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>धाराशिव : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईट उपक्षेत्रांतर्गत मौजे पाखरुड शिवारात अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सुमारे ८ लाख ७७ हजार रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.</p>
<p>गुप्त माहितीवरून रचला सापळा<br />पाखरुड शिवारात अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण आणि धोंडिबा चव्हाण या तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अंमली पदार्थ असलेल्या 'अफू'ची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीलायक माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.</p>
<p>मोठ्या फौजफाट्यासह धाडसी कारवाई<br />पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, घोडके, आणि पोलीस उपनिरीक्षक भाळे यांच्यासह अंमलदार बोरकर, मलंगनेर, लाटे, खैरे, खारगे, मिसाळ, कोरडे, आणि चौघुले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत पारदर्शकता राखण्यासाठी शासकीय पंच, कार्यकारी दंडाधिकारी, वजन मापे संचालक, व्हिडिओग्राफर आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते.<br />जप्त केलेला मुद्देमाल:<br />छाप्यादरम्यान खालीलप्रमाणे अफूची झाडे जप्त करण्यात आली:<br /> * अशोक चव्हाण (गट क्र. ८): ३६ किलो अफूची झाडे (किंमत ₹५,४०,०००/-)<br /> * राजेंद्र चव्हाण (गट क्र. १२): १८ किलो अफूची झाडे (किंमत ₹२,७०,०००/-)<br /> * धोंडिबा चव्हाण: ४.५ किलो अफूची झाडे (किंमत ₹६७,०००/-)<br />जागेवरच पंचनामा आणि अटकेची कारवाई<br />फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत सर्व मालाचे वजन करून, व्हिडिओ चित्रीकरणासह कायदेशीर जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाशी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16764/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16764/crime</guid>
                <pubDate>Sun, 01 Mar 2026 08:01:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-03/img-20260228-wa0076.jpg"                         length="150846"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना केंद्र प्रमुखास रंगेहाथ अटक</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>लोहा : दैनंदिन लाचखोरीच्या घटना घडताना आणि लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याच्या असंख्य घटना घडत असताना लाचखोरीचे प्रकार कांहीं संपत नसल्याचे पुन्हा एकदा लोह्यातील शिक्षण विभागातील घटनेवरून समोर आले आहे. दि. १६ रोजी सकाळी अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.</p>
<p>  शिस्त, प्रामाणिकपणाचे धडे शिकविणाऱ्या गुरुजींच्या कार्यालयात जर लाचखोरीच्या घटना घडत असतील तर नव्या पिढीने शिक्षण ते काय घ्यायचे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने खाजगी कामानिमित ४६ दिवसांच्या अर्जित रजेसाठी दि. ९</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16723/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-02/bribe-1.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>लोहा : दैनंदिन लाचखोरीच्या घटना घडताना आणि लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याच्या असंख्य घटना घडत असताना लाचखोरीचे प्रकार कांहीं संपत नसल्याचे पुन्हा एकदा लोह्यातील शिक्षण विभागातील घटनेवरून समोर आले आहे. दि. १६ रोजी सकाळी अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.</p>
<p> शिस्त, प्रामाणिकपणाचे धडे शिकविणाऱ्या गुरुजींच्या कार्यालयात जर लाचखोरीच्या घटना घडत असतील तर नव्या पिढीने शिक्षण ते काय घ्यायचे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने खाजगी कामानिमित ४६ दिवसांच्या अर्जित रजेसाठी दि. ९ रोजी लोहा पंचायत समिती अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला होता. शिक्षण विभागातील आस्थापना विभागात लिपिकाचे काम तसेच गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांचे कार्यालयीन काम पाहणारे केंद्रप्रमुख दिगांबर रामचंद्र शिंदे यांनी तक्रारदारास अर्जित रजा मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. दि. १३ रोजी तक्रारदार यांना आरोपी शिंदे यांनी भेटून तुमची अर्जित रजा मंजूर करायची असेल तर मला दोन-तीन हजार रुपये देऊन टाका असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रादारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला असता सदर विभागाने दि. १६ रोजी रचून सापळा लावला. केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी स्वतःसाठी ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ मिळून आले. आरोपीची अंगझडती घेतली असता झडतीत एक मोबाईल व नगदी २ हजार ७०० रुपये मिळून आले. याप्रकरणी ला. प्र. वि. चे पोलिस निरीक्षक श्रीमती अनिता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर शिंदे यांच्याविरुद्ध लोहा पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती अर्चना करपुडे करत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16723/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16723/crime</guid>
                <pubDate>Mon, 16 Feb 2026 18:13:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-02/bribe-1.jpg"                         length="80591"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>एसीबीच्या जाळ्यात फसला सहायक महसूल अधिकारी </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>गोंदिया : देवरी तहसील कार्यालय तील सहायक महसूल अधिकाऱ्याला गोंदिया एसीबीच्या टीमने पंधराशे रुपयाची लाज घेताना अटक केली आहे हे कार्यवाही 13 फेब्रुवारी 2026 रोजी केली अटक झालेल्या आरोपीचे नाव सहाय्यक महसूल अधिकारी संदेश बोरकर असे आहे. तक्रारदार हे 49 वर्षाचे असून सरकारतर्फे<br />फिर्यादी  उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक, लाप्रवी हे आहेत तर  आरोपीचे नाव संदेश नैनदास बोरकर वय 39 वर्ष पद सहायक महसूल अधिकारी प्रस्तुतकार 01, तहसील कार्यालय देवरी  तालुका देवरी जिल्हा गोंदिया (वर्ग 3) असे आहे </p>
<p>  सविस्तर वृत्त असे की  तक्रारदार राहत असलेल्या देवरी येथील सर्वे नंबर 309/ 1/ ब मधील सोसायटी मध्ये ओपन स्पेस</p>
<p> <br />रजिस्टर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16713/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-02/acb-trap-2.webp" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>गोंदिया : देवरी तहसील कार्यालय तील सहायक महसूल अधिकाऱ्याला गोंदिया एसीबीच्या टीमने पंधराशे रुपयाची लाज घेताना अटक केली आहे हे कार्यवाही 13 फेब्रुवारी 2026 रोजी केली अटक झालेल्या आरोपीचे नाव सहाय्यक महसूल अधिकारी संदेश बोरकर असे आहे. तक्रारदार हे 49 वर्षाचे असून सरकारतर्फे<br />फिर्यादी  उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक, लाप्रवी हे आहेत तर  आरोपीचे नाव संदेश नैनदास बोरकर वय 39 वर्ष पद सहायक महसूल अधिकारी प्रस्तुतकार 01, तहसील कार्यालय देवरी  तालुका देवरी जिल्हा गोंदिया (वर्ग 3) असे आहे </p>
<p> सविस्तर वृत्त असे की  तक्रारदार राहत असलेल्या देवरी येथील सर्वे नंबर 309/ 1/ ब मधील सोसायटी मध्ये ओपन स्पेस असून सदर ओपन स्पेसवर, सार्वजनिक गणेश व साई बहुउद्देशीय संस्था देवरी यांनी अवैद्य बांधकाम केले असून सदर बांधकामावर कारवाई करून काढण्यासाठी तक्रारदार व इतर लोकांनी नगरपंचायत देवरी,  मंडळ अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सुद्धा कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे, तक्रारदार व इतर लोकांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट पिटीशन दाखल केले होते. सदर रिट पिटीशन मध्ये माननीय न्यायालयाने योग्य कार्यवाही करणे बाबत मुख्य अधिकारी नगरपंचायत देवरी यांना आदेश दिले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी देवरी यांना पत्र लिहून माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करण्याबाबत  पत्र दिले असता, उपविभागीय अधिकारी देवरी यांनी तहसीलदार देवरी यांना सदर प्रकरणात सविस्तर चौकशी/ तपासणी करून आवेदकास परस्पर कळविण्याबाबत व वस्तुनिष्ठ अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत होते. दिनांक 12.फेब्रुवारी.2026 रोजी तक्रारदार हे तहसील कार्यालय देवरी येथे सादर अर्ज बाबत चौकशी करण्यासाठी गेले असता तेथील लिपिक श्री बोरकर यांना भेटून, अर्ज चौकशी अहवाल तयार झाला किंवा नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुमच्या बाजूने अहवाल तयार करून देण्यासाठी 2000/-रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तसेच 13. फेब्रुवारी 2026 रोजी आलोसे श्री बोरकर यांनी तक्रारदार यांना फोन करून बोलाऊन सायंकाळी 2000 रुपये घेऊन या  असे सांगितले. तक्रारदार यांना ती लाच देण्याची  इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 13.फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे येऊन आलोसे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती.सदर तक्रारीवरून दिनांक 13. फेब्रुवारी 2026 रोजी  सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह देवरी येथे जाऊन तक्रारदार यांना पंचासह तहसील कार्यालय देवरी येथे आलोसे यांचेकडे पाठवून  लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता,  आलोसे यांनी तक्रारदार यांचे बाजूने अहवाल तयार करून पाठवण्यासाठी तडजोडी अंती 1500/- रुपये लाचेची मागणी  करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. दिनांक 13.फेब्रुवारी . 2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून  तक्रारदार यांचे बाजूने चौकशी अहवाल तयार करून पाठवण्यासाठी  तक्रारदार यांचे कडून 1500/ रुपये लाच रक्कम स्वीकारून गैरफायदा घेतला आहे.</p>
<p> आरोपीच्या अंगझडतीत 1000/रुपये मिळून आले  ते त्यांना वेळीच परत करण्यात आले आहेत. आरोपी यांच्या ताब्यात poco कंपनीचा किमती 5000 रु. चा 1 मोबाईल, 1500/- रुपये लाच रक्कम, गुण्यासंदर्भाने कागदपत्र, आरोपी सोबत व्हाट्सअप वरून केलेली चॅटिंगची स्क्रीन शॉट,  ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून <br />रजिस्टर न, कलम पोस्टे. देवरी जिल्हा गोंदिया  येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यांनी रचला यशस्वी सापळा अधिकारी* उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वी. गोंदियापर्यवेक्षण अधिकारी उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वी. गोंदियातपास अधिकारी श्री अरविंद राऊत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया</p>
<p>यांनी केली कारवाई </p>
<p>पथक-संयुक्त पोलीस निरीक्षक उमाकांत उगले व अरविंद राऊत , सहायक फौजदार चंद्रकांत करपे , पोलीस हवलदार संजय बोहरे, मंगेश काहालकर , पोलीस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, मनापोशी  संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक पोलीस हवालदार सोमेश इंदुरकर</p>
<p> यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई : <br />मा.डॉ.श्री दिगंबर प्रधान<br />पोलीस अधीक्षक*  ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर, <br />मा.श्रीमती माधुरी बाविस्कर मॅडम*,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.<br />मा.श्री.विजय माहुलकर* अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नागपूर</p>
<p>लाचेची येथे करा तक्रार </p>
<p>गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील ठिकाणी संपर्क साधावा.<br />अँटी करप्शन ब्युरो, गोंदिया <br />1) उमाकांत उगले<br />,पोलीस निरीक्षक<br />मो.क्र. *9664959090<br />2) अरविंद राऊत पोलीस निरीक्षक 8275298475 <br />3)व्हाट्सएप क्रमांक- 9209041064 <br />4)दूरध्वनी क्रमांक- 07182-251203</p>
<p>5)टोल फ्री क्रमांक-1064<br />वर संपर्क साधावा.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16713/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16713/crime</guid>
                <pubDate>Sat, 14 Feb 2026 08:18:02 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-02/acb-trap-2.webp"                         length="60219"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>जनार्दन चव्हाण</p>
<p>निफाड : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाकडून तीन लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आला आहे.खंडु संपत गव्हाणे (वय २८, आर.सी.एफ. फोर्स सिक्युरिटी गार्ड, शाखा अहमदनगर, सध्या रा.देवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. विलास निवृत्ती भालेराव (रा.पिप्री, ता.येवला), ममता किरण पगारे (रा.ब्रिजलाल नगर, कोपरगाव) आणि चांदणी मोहन कदम (रा.गांधीनगर, कोपरगाव) या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस “आम्ही तुझे लग्न चांदणी हिच्याशी लावून देतो” असे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16688/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-02/img_20260202_180659.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>जनार्दन चव्हाण</p>
<p>निफाड : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाकडून तीन लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आला आहे.खंडु संपत गव्हाणे (वय २८, आर.सी.एफ. फोर्स सिक्युरिटी गार्ड, शाखा अहमदनगर, सध्या रा.देवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. विलास निवृत्ती भालेराव (रा.पिप्री, ता.येवला), ममता किरण पगारे (रा.ब्रिजलाल नगर, कोपरगाव) आणि चांदणी मोहन कदम (रा.गांधीनगर, कोपरगाव) या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस “आम्ही तुझे लग्न चांदणी हिच्याशी लावून देतो” असे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर आरोपींनी खोटी नोटरी तयार करून आरोपी चांदणी हिला फिर्यादीसोबत देवगाव येथे पाठवले व लग्न झाल्याचा बनाव केला. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही कायदेशीर लग्न न होता फिर्यादीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स.पो.नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16688/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16688/crime</guid>
                <pubDate>Mon, 02 Feb 2026 18:11:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-02/img_20260202_180659.jpg"                         length="216802"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नैसर्गिक अनुदान घोटाळा, 1.30 कोटींचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे अटकेत</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>राजेंद्र मोताळे</p>
<p>अंबड प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अनुदानात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सुमारे 1.30 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तलाठी प्रवीण भाऊसाहेब सिनगारे (वय 36, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाने विविध जी.आर. काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यात अनुदान याद्या अपलोड करण्याचे काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाभार्थ्यांच्या नावावर जमा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16518/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-12/img-20251213-wa0080.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>राजेंद्र मोताळे</p>
<p>अंबड प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अनुदानात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सुमारे 1.30 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तलाठी प्रवीण भाऊसाहेब सिनगारे (वय 36, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाने विविध जी.आर. काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यात अनुदान याद्या अपलोड करण्याचे काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाभार्थ्यांच्या नावावर जमा झालेली अनुदानाची रक्कम परस्पर परत घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.</p>
<p>या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली. समितीच्या अहवालानुसार 240 गावांमध्ये सुमारे ₹24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा शासकीय अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 453/2025 अन्वये विविध कलमे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.<br />या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, जालना यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखा, जालना करीत आहे. यापूर्वी या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, चार महिन्यांपासून मोबाईल व ठिकाणे बदलत पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी प्रवीण सिनगारे धाराशिव जिल्ह्यात सापडल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासह आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व प्रभारी उपअधीक्षक श्री. सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16518/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16518/crime</guid>
                <pubDate>Sat, 13 Dec 2025 13:46:41 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-12/img-20251213-wa0080.jpg"                         length="143309"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुण्यातील कोट्यवधींच्या धाडसी घरफोडी नंतर मोहिदेपूर येथील सहा तरुणींना पोलिसांनी घेतले ताब्यात..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>सागर झनके </p>
<p>जळगाव जा : पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील गल्ली नंबर पाच मधील ऋतुराज सोसायटीमधील  विजय वैद्य नामक एका सोने-चांदी व्यापारी विजय वैद्य यांचा "अजय"  नामक ३२ क्रमांकाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याचा   एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून ह्या व्हिडिओमध्ये बंगल्या मधून चोरी करून बाहेर पडणाऱ्या काही मुली दिसतात.... ह्या मुली जळगाव (जामोद) तालुक्यातील नाथजोगी समाजाचे वास्तव्य असलेल्या मोहिदीपूर येथील असून ह्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मोहिदीपूर येथे येऊन पुढील तपासासाठी ह्या मुलींना ताब्यात घेतले आहे.</p>
<p>वृत्तांत असा की पुणे येथील अजय नामक बंगल्यामध्ये काही दिवसापूर्वी डकैती, घरफोडी झाली आहे. सोने,चांदीचे व्यापारी असलेल्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16459/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-11/img_20251124_100301.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>सागर झनके </p>
<p>जळगाव जा : पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील गल्ली नंबर पाच मधील ऋतुराज सोसायटीमधील  विजय वैद्य नामक एका सोने-चांदी व्यापारी विजय वैद्य यांचा "अजय"  नामक ३२ क्रमांकाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याचा   एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून ह्या व्हिडिओमध्ये बंगल्या मधून चोरी करून बाहेर पडणाऱ्या काही मुली दिसतात.... ह्या मुली जळगाव (जामोद) तालुक्यातील नाथजोगी समाजाचे वास्तव्य असलेल्या मोहिदीपूर येथील असून ह्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मोहिदीपूर येथे येऊन पुढील तपासासाठी ह्या मुलींना ताब्यात घेतले आहे.</p>
<p>वृत्तांत असा की पुणे येथील अजय नामक बंगल्यामध्ये काही दिवसापूर्वी डकैती, घरफोडी झाली आहे. सोने,चांदीचे व्यापारी असलेल्या व्यक्तीचा हा बंगला आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरी करणाऱ्या मुली घर फोडून पळून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर ह्या सहा मुली मोहिदेपूर या आपल्या मूळ गावी आल्या. येथून त्यांनी आपल्याजवळील सोने-चांदीचा काही ऐवज खामगाव, नांदुरा, मलकापूर परिसरातील सराफा बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. कोट्यानवधीचा हा ऐवज अल्प किमतीत ते विकायला तयार झाले. हा सुगावा पोलिसांपर्यंत पोहोचला. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेचा व्हिडिओ ह्या आधारे पुणे पोलिसांनी जळगाव (जामोद) तालुका गाठून जळगाव जामोद पोलिसांच्या मदतीने ह्या मुलींना अटक केली आहे. </p>
<p>आईना सुखदेव सोळुंके (वय अंदाजे २६),<br />मीना रवी सोळंके (वय अंदाजे २५),<br />सुनिता पिंटू सोळंके (वय अंदाजे ३०),<br />हिना शेषराव शिंदे( वय अंदाजे १८),<br />बत्ती गणपत शिंदे( वय अंदाजे २५),<br />पूजा कृष्णा सोळंके (वय २५),<br />असे सहा जणींची नावे आहेत. यातील सुनिता पिंटू सोळंके ही अपंग असल्याचे कळते. चार महिला विवाहित असून दोन अविवाहित आहेत.<br /><br />पोलीस तपासासाठी मुलींना ताब्यात घेतले: पोलीस निरीक्षक नितीन पाटील. पुणे येथील डकैती प्रकरणी मोहिदीपूर येथील मूळ रहिवासी सहा मुलींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला जळगाव (जामोद) चे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दुजोरा दिला आहे. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पुणे पोलीस मोहिदेपूरला आले असता पो.हे.कॉ. तय्यब अली  सय्यद हे सुद्धा मोहिदीपूर येथे पुणे पोलिसांच्या सोबत होते. सर्व सहा मुलींना पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुणे येथे त्यांची रवानगी करण्यात आल्याचे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.</p>
<p><br />हे कृत्य काळीमा फासणारे:<br />मोहीदेपूर येथील नाथजोगी समाज हा संपूर्ण राज्यभर पोट भरण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी देवादीकांचे सोंग धारण करून भिक्षा मागत असते. भिक्षा मागने हाच त्यांचा पिढीत व्यवसाय आहे. अशाच भिक्षा मागण्याच्या प्रकारात नागपूर येथील जरीपटका परिसरात संतप्त जमावाच्या हल्ल्यात एक तपापूर्वी मोहिदेपूर येथील चार युवक प्राणास मुकले होते. भंगार, प्लास्टिकच्या बाटल्या वेचणे, लोखंडी भंगार वेचणे असा धंदा करता करता ह्या मुलींनी माणुसकीची परिशीमा सोडली.<br /> ह्या सहा मुलींनी केलेले हे कृत्य मोहिदेपुर च्या नावाला काळिमा फासणारे आहे. ह्या घटनेमुळे गावाची आणि नाथजोगी समाजाची फार मोठी बदनामी झाली आहे. असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर नाथ जोगी समाजातील सुशिक्षित युवकाने दैनिक आधुनिक केसरी शी बोलताना मांडले आहे.<br />झटपट श्रीमंत होण्याच्या या अफलातून संकल्पनेमुळे नाथजोगी समाजातील युवा वर्गावर सुद्धा ह्या घटनेचा दूरगामी परीणाम होणार आहे. पुनश्च या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दोषी व्यक्तींना शासन झालेच पाहिजे असे सुद्धा संबंधित युवकाने सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16459/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16459/crime</guid>
                <pubDate>Mon, 24 Nov 2025 10:08:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-11/img_20251124_100301.jpg"                         length="177842"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>१२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>महेश गायकवाड </p>
<p>सोलापूर : जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकानेच १२ वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी गुरुवारी (ता. १३) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. धनाजी सोपान इंगळे (वय ४८, ता. मोहोळ) असे त्याचे नाव आहे.१४ एप्रिल २०२३ रोजी पीडिता शाळेत गेल्यावर तिला शिकविणारे शिक्षक धनाजी इंगळे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पीडितेला वर्गात थांबवून घेतले व इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबायला सांगितले. त्यावेळी वर्गातच शिक्षकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. शाळेशेजारील शेतकऱ्याने ते पाहिले आणि त्यांना शिक्षकाचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे दोन-तीन दिवसांपासून त्या शिक्षकावर त्यांनी लक्ष ठेवले. १५ एप्रिल २०२३</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16426/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-11/img_20251115_211245.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>महेश गायकवाड </p>
<p>सोलापूर : जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकानेच १२ वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी गुरुवारी (ता. १३) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. धनाजी सोपान इंगळे (वय ४८, ता. मोहोळ) असे त्याचे नाव आहे.१४ एप्रिल २०२३ रोजी पीडिता शाळेत गेल्यावर तिला शिकविणारे शिक्षक धनाजी इंगळे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पीडितेला वर्गात थांबवून घेतले व इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबायला सांगितले. त्यावेळी वर्गातच शिक्षकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. शाळेशेजारील शेतकऱ्याने ते पाहिले आणि त्यांना शिक्षकाचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे दोन-तीन दिवसांपासून त्या शिक्षकावर त्यांनी लक्ष ठेवले. १५ एप्रिल २०२३ रोजी भावाच्या मदतीने त्या शेतकऱ्याने वर्गात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्या दिवशीची घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. ते चित्रीकरण घेऊन मुख्याध्यापकासमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून शेतकऱ्याने कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष कबूल करावे, असे स्पष्ट केले. त्यावेळी कोणीही समोर आले नाही.</p>
<p>परंतु, त्याचे चित्रीकरण माझ्याकडे असल्याचे म्हटल्यावर इंगळे याने स्वतःहून 'चूक झाली मला माफ करा' अशी विनवणी केली. मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर त्या शिक्षकाने तीन-चार मुलींसमवेत असे कृत्य केल्याची बाब समोर आली. त्यातील एका पालकाने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी तपास केला होता.</p>
<p>चित्रिकरणातील पीडिता समोर आलीच नाही, तरीही...</p>
<p>आरोपीच्या दहशतीमुळे व मुलींच्या भविष्याचा विचार करून चित्रीकरणात दिसणारी पीडिता व अन्य दोघी, त्यांचे पालक जबाबावेळी आलेच नाहीत. उलट त्यांनी व पीडितेचच्या पालकांनी 'आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही' असे लिहून दिले. दुसऱ्या पीडितेचे पालकही मुलीचे भविष्य वाटोळे होईल म्हणून तक्रार देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु, पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.</p>
<p>शेतकऱ्याने शाळेत गुपचूप CCTV कॅमेरा लावला, होता म्हणून ही घटना उघडकीस आली होती. अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी हा निकाल दिला असून एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या शिक्षकाचं बिंग फुटलं आहे.</p>
<p>न्यायालयाने शेतकरी आणि डॉक्टरांच्या साक्षी ग्राह्य धरून हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील एका शाळेत धनाजी सोपान इंगळे हा 48 वर्षीय शिक्षक शिकवत होता. तो वर्गात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करत होता. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या शिक्षकावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. शाळेच्या बाजूला शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिक्षकाचं वर्तन संशयास्पद वाटलं. त्याने दोन-तीन दिवस शिक्षकावर पाळत ठेवली. 15 एप्रिल 2023 रोजी, शेतकऱ्याने आपल्या भावाच्या मदतीने वर्गात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं कैद झालं आहे.</p>
<p>शेतकऱ्याने हे सीसीटीव्ही फुटेज मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि काही पालकांना दाखवले. फुटेज पाहून शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघडकीस आलं. शेतकऱ्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उल्लेख करताच, धनाजी इंगळेने स्वतःहून चूक कबूल केली आणि माफी मागितली. मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर, त्यांनी शिक्षकाने तीन-चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं.</p>
<p>दरम्यान, याप्रकरणी एका पालकाने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाच्या दहशतीमुळे आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे पालक जबाबासाठी कोर्टात आले नाहीत. त्यांनी 'आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही' असे लिहून दिले. तरीही, पोलिसांनी धीर देऊन गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.</p>
<p>खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी, दुसरी पीडिता, शेतकरी आणि शेतकऱ्याचा भाऊ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी शिक्षकाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि 50 हजारांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले असून या प्रकरणात सरकारतर्फे अॅड. शीतल डोके यांनी काम पाहिलं.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16426/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16426/crime</guid>
                <pubDate>Sat, 15 Nov 2025 21:17:51 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-11/img_20251115_211245.jpg"                         length="187664"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘  </title>
                                    <description><![CDATA[<p>महेश गायकवाड</p>
<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>सोलापूर :: लोकांस कितीही सांगा एकत नाहीत आणि फसतात अलीकडेच डिजिटल अरेस्ट बद्धल स्वतः देशाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई साहेब यांनी ही भाष्य केले होते तरीही सायबर गुन्हेगारी देशात मोठ्या प्रमाणात पसरली आणि घट्ट पाय रोवून असल्याचे सोलापुरात घडलेल्या डिजिटल अरेस्ट मुळे सिद्ध झाले आहे.कितीही सांगा, आम्ही फसणारच! असा बाणा लोकांनी केला असावा सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. </p>
<p>डिजिटल ॲरेस्ट’ करून हा गंडा घालण्यात आला आहे यांमुळे त्याची, पत्नीही घाबरली अन्‌ डिजिटल अरेस्ट चे गुपित उघडकीस आले आहे.बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16420/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-11/img-20251114-wa0095.jpg" alt=""></a><br /><p>महेश गायकवाड</p>
<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>सोलापूर :: लोकांस कितीही सांगा एकत नाहीत आणि फसतात अलीकडेच डिजिटल अरेस्ट बद्धल स्वतः देशाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई साहेब यांनी ही भाष्य केले होते तरीही सायबर गुन्हेगारी देशात मोठ्या प्रमाणात पसरली आणि घट्ट पाय रोवून असल्याचे सोलापुरात घडलेल्या डिजिटल अरेस्ट मुळे सिद्ध झाले आहे.कितीही सांगा, आम्ही फसणारच! असा बाणा लोकांनी केला असावा सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. </p>
<p>डिजिटल ॲरेस्ट’ करून हा गंडा घालण्यात आला आहे यांमुळे त्याची, पत्नीही घाबरली अन्‌ डिजिटल अरेस्ट चे गुपित उघडकीस आले आहे.बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.</p>
<p> बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.</p>
<p><br />मागच्या महिन्यात अनोळखी क्रमांकावर भुतडा यांना एक कॉल आला. नरेश गोयल हा खूप मोठा फ्रॉडर असून त्याच्या खात्यातून तुमच्या बॅंक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. तुमच्या सीमकार्डवरून समोरील व्यक्तीलाही पैसे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तुम्हाला ईडी, सीबीआय व पोलिसांची नोटीस आली असून आता कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखविली. त्याचवेळी ‘या गुन्ह्याचा तपास होईपर्यंत आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय’ असे सांगून त्यांना व्हिडिओ कॉल करून बसवून ठेवले.</p>
<p>भुतडा यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचा फोन येत असल्याने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला. अटकेच्या भीतीने ७ ते ९ ऑक्टोबर या तीन दिवसांत भुतडा यांच्याकडून सायबर गुन्हेगारांनी ४१ लाख रुपये घेतले. सायबर गुन्हेगारांनी समोरील पाच बॅंक खात्यात ते पैसे ट्रान्स्फर केले. घाबरलेल्या ६९ वर्षीय व्यापाऱ्याने तीन दिवसांत त्यांनी स्वत:च्या कमाईची संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांना पाठवून दिली. बदनामी होईल म्हणून पोलिसांतही ते गेले नाहीत. २० दिवसांनी त्यांनी मित्र, नातेवाईकांचा सल्ला घेऊन सायबर पोलिसांकडे धाव घेतली. लखनौ, राजस्थान, पश्चिम बंगाल येथील ती बॅंक खाती असल्याची बाब समोर आली आहे. त्यातील एका खात्यात सध्या अवघे सात हजार रुपये आहेत. सोलापूर शहर सायबर पोलिस आता गुन्ह्याचा तपास करीत आहेत.</p>
<p>डिजिटल अरेस्ट पोलिस कधीही करत नाहीत</p>
<p>पोलिस ज्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची गरज आहे, त्यावेळी प्रत्यक्षात जाऊन त्याला अटक करतात. डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही गोष्ट पोलिसांमध्ये नाही. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल अरेस्ट करण्यासंदर्भात कोणीही बोलले तर थेट पोलिसांमध्ये जावे. घाई, अर्धवट ज्ञान (अज्ञान) व आमिष, या तीन गोष्टीतूनच सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे प्रत्येकांनी त्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे कोणाचीही फसवणूक होणार नाही.</p>
<p>- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर</p>
<p>व्यापाऱ्याची पत्नीही घाबरली अन्‌...</p>
<p>समोरील व्यक्तीने पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगून भुतडा यांना अटकेची भीती घातली होती. त्यांच्या पत्नीला ही बाब समजली, त्यावेळी पोलिस घरी येऊन मारहाण करतील, अटक करतील म्हणून त्याही घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी समोरील व्यक्ती जसे म्हणतोय तसे करायला पतीला काळजीपोटी सांगितले होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16420/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16420/crime</guid>
                <pubDate>Fri, 14 Nov 2025 14:19:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-11/img-20251114-wa0095.jpg"                         length="63351"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        