<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/203/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>बॉलिवूड - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/203/rss</link>
                <description>बॉलिवूड RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>मुन्नाभाई एमबीबीएस’ने नशीब पालटले...!</title>
                                    <description><![CDATA[<p style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p style="text-align:justify;">माणसाला जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर यश मिळेल आणि त्याचे नशीब कधी फळफळेल हे कोणालाही ठाऊक नसते. अशाच एका अभिनेत्याने वयाच्या ३२ व्या वर्षी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले आणि दहा वर्षांनी म्हणजे वयाच्या ४२ व्या वर्षी त्याला एक प्रायोगिक चित्रपट मिळाला. तो चित्रपट एका प्रख्यात निर्माता-दिग्दर्शकाने पाहिला काय आणि त्या कलावंताचे जीवनच बदलून गेले. त्या निर्मात्याने कराराच्या रकमेचा धनादेश (चेक) त्या कलावंताच्या हातात ठेवून आपल्या आगामी चित्रपटासाठी करारबद्ध केले. गंमतीची बाब अशी की त्यावेळी त्या चित्रपटाची ना कथा तयार होती ना त्याची काही रूपरेषा आखण्यात आली होती !</p>
<p style="text-align:justify;">  </p>
<p style="text-align:justify;">या कलावंताचे नाव बोमन इराणी ! मुंबईतील एका पारशी कुटुंबात २ डिसेंबर,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/10109/bollywood"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-11/img-20231120-wa0009.jpg" alt=""></a><br /><p style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p style="text-align:justify;">माणसाला जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर यश मिळेल आणि त्याचे नशीब कधी फळफळेल हे कोणालाही ठाऊक नसते. अशाच एका अभिनेत्याने वयाच्या ३२ व्या वर्षी नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले आणि दहा वर्षांनी म्हणजे वयाच्या ४२ व्या वर्षी त्याला एक प्रायोगिक चित्रपट मिळाला. तो चित्रपट एका प्रख्यात निर्माता-दिग्दर्शकाने पाहिला काय आणि त्या कलावंताचे जीवनच बदलून गेले. त्या निर्मात्याने कराराच्या रकमेचा धनादेश (चेक) त्या कलावंताच्या हातात ठेवून आपल्या आगामी चित्रपटासाठी करारबद्ध केले. गंमतीची बाब अशी की त्यावेळी त्या चित्रपटाची ना कथा तयार होती ना त्याची काही रूपरेषा आखण्यात आली होती !</p>
<p style="text-align:justify;"> </p>
<p style="text-align:justify;">या कलावंताचे नाव बोमन इराणी ! मुंबईतील एका पारशी कुटुंबात २ डिसेंबर, १९५९ या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म होण्यापूर्वी सहा महिने त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. पतिनिधनानंतर परिश्रम घेऊन छोट्या बोमनचे पालनपोषण करणा-या बोमन यांच्या आईलाही चित्रपटांची आवड होती. बरेच माता-पिता आपली मुले चित्रपटामुळे बिघडू नयेत म्हणून त्यांना चित्रपटापासून दूरच ठेवतात. पण बोमन यांची आई त्यांना विचारावयाची की तू शाळेचा गृहपाठ केला आहेस की नाही ? हो, केला आहे असे बोमन यांनी म्हणताच आई त्यांना सांगायची, की चित्रपटगृहात फार चांगला चित्रपट लागला आहे. जा तू पाहून ये. त्यात शिकण्यासारखे बरेच काही आहे. तो चित्रपट पाहून तू खूप काही शिकशील. बोमन म्हणतात, जेव्हा मी माझ्या आईच्या उदरात होतो आणि जेव्हा केव्हा ती चित्रपट पाहावयास जाई तेव्हा मीही तिच्यासमवेत तो चित्रपट पाहात असे. माझ्यात   चित्रपटाबद्दलचे बेसुमार आकर्षण मी मोठा झाल्यावर निर्माण झालेले नसून मी आईच्या उदरात असल्यापासूनचेच आहे, यावर मी ठाम आहे. आमचे वेफरचे दुकान आई सांभाळत असे. मोठा झाल्यावर मी त्या दुकानात जेव्हा जेव्हा बसत असे तेव्हाही चित्रपट मला आकर्षित करीत असे. त्यावेळी त्या चित्रपटगृहात दाखविला जाणारा चित्रपट मी एकदा-दोनदा नव्हे तर पुन्हा पुन्हा पाहात असे. आजच्या काळात कोणतीही आई आपल्या मुलांना अशा प्रकारे चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहन देत असेल असे मला वाटत नाही.</p>
<p style="text-align:justify;"> </p>
<p style="text-align:justify;">दिवस सरत होते आणि अचानक एके दिवशी बोमन यांच्या आईची प्रकृती बिघडली. त्या आजारी पडल्यामुळे बोमन यांना सहा महिने दुकानात बसावे लागले आणि अखेर दुकान सांभाळण्याची जबाबदारीच त्यांच्यावर येऊन पडली. जवळजवळ बारा वर्षे त्यांनी दुकानदारी केली. वयाच्या ३२ वर्षांपर्यंत दुकानदारी केलेल्या बोमन यांनी नंतर एक साधा कॅमेरा खरेदी केला. छायाचित्रे काढण्याची लहान मोठी कामे करणाऱ्या बोमन यांना अशीही अर्थप्राप्ती होऊ लागली. ते आपली  छायाचित्रकला जोपासत असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नृत्य दिग्दर्शक शियामक डावर यांनी त्यांचा रंगभूमीशी संबंध जोडून दिला.</p>
<p style="text-align:justify;"> </p>
<p style="text-align:justify;">काळ असाच पुढे सरकत असताना वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना `लेट्स टाँक मिली’ हा प्रायोगिक चित्रपट मिळाला. त्याचे संपूर्ण चित्रीकरण अवघ्या आठ दिवसांत झाले होते. प्रयोगाखातर केवळ आठ दिवसांत चित्रित झालेला `लेट्स टाँक’ हा चित्रपट तयार करून तसाच ठेवून देण्यात आला. हा चित्रपट चित्रपटगृहांमधे प्रदर्शित करण्यात येणार नव्हता. तयार करून ठेवून दिलेला हा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विधु विनोद चोपडा यांनी जेव्हा पाहिला तेव्हा त्यांना तो अतिशय आवडला आणि त्यातील बोमन इराणी यांचा अभिनय पाहून ते प्रभावित झाले.</p>
<p style="text-align:justify;"> </p>
<p style="text-align:justify;">चित्रपट पाहिल्यावर बोमन यांना विधु चोपडा म्हणाले, तुम्ही तर चित्रपटांमधे काम केले पाहिजे. हा घ्या २ लाख रुपयांचा धनादेश (चेक) ! धनादेश हातात घेऊन बोमन यांनी त्यांना विचारले, की कोणत्या चित्रपटासाठी ? विधु चोपडा त्यांना म्हणाले, की सध्या तरी माझ्या हाती कोणताही चित्रपट नाही. यावर बोमन यांनी आश्चर्याने विचारले, `मग हा धनादेश कशासाठी ?’ बोमन यांच्या या प्रश्नाला विधु चोपडा यांनी हसत हसत उत्तर दिले. ते म्हणाले, हा धनादेश देण्याचे कारण असे, की पुढील वर्षी डिसेंबरमधे मी चित्रपट बनवेन की नाही हे या क्षणी तरी मला ठाऊक नाही ; परंतु मी तुम्हाला आतापासूनच डिसेंबरसाठी नोंदवून (बुक) ठेवतो आहे. तेव्हा बोमन यांनी विचारले, की आतापासून कशासाठी ? यावर विधु चोपडा म्हणाले, `लेट्स टाँक’ हा चित्रपट काहीही करून प्रदर्शित करू. जेव्हा तो प्रदर्शित होईल आणि लोक तुमचा अभिनय पाहतील तेव्हा प्रत्येक जण म्हणेल, की हा अभिनेता मला हवा. त्यावेळी तुम्ही मला तारखा देणार नाही म्हणून मी आजच तुम्हाला करारबद्ध करतोय.</p>
<p style="text-align:justify;"> </p>
<p style="text-align:justify;">बरोबर सहा महिने उलटल्यावर विधु विनोद चोपडा यांनी बोमन इराणी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सांगितले, की माझ्याकडे एक चित्रपट आला आहे. बोमन यांनी विचारले, की कोणता चित्रपट ? चोपडा म्हणाले, ‘मुन्नाभाई एमबीबीएस !’ बोमन यांना चित्रपटाचे हे नाव काहीसे विचित्र वाटले. शेवटी   डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट चित्रपटगृहांमधे  झळकला. एका वर्षाच्या अखेरीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नव्या वर्षात बोमन इराणी यांचे जीवनच बदलून टाकले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/10109/bollywood</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/10109/bollywood</guid>
                <pubDate>Mon, 20 Nov 2023 12:30:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-11/img-20231120-wa0009.jpg"                         length="49227"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राजकुमार राव ने पटकावला ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई: सुप्रसिद्ध सिने अभिनेता राजकुमार राव हा एक अष्टपैलुत्व असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो, यांचबरोबर  कथाकथनाच्या सीमा ओलांडण्याच्या त्याची सवय ही कायम त्याला विविध भूमिका करायला लावतात. अलीकडेच या राष्ट्रीय आयकॉनने "गन्स अँड गुलाब्स" या वेब सिरीज आणि "मोनिका, ओ माय डार्लिंग" या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">राजकुमार राव याची वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची  क्षमता ही कायम उल्लेखनीय ठरली.  "गन्स अँड गुलाब्स" मधील एक करिश्माई मेकॅनिकमधून गुंड बनलेल्या पाना टिपूची भूमिका आणि "मोनिका ओ माय डार्लिंग" मधील रोबोटिक्स तज्ञ</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9629/bollywood"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-10/img-20231030-wa0015.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई: सुप्रसिद्ध सिने अभिनेता राजकुमार राव हा एक अष्टपैलुत्व असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो, यांचबरोबर  कथाकथनाच्या सीमा ओलांडण्याच्या त्याची सवय ही कायम त्याला विविध भूमिका करायला लावतात. अलीकडेच या राष्ट्रीय आयकॉनने "गन्स अँड गुलाब्स" या वेब सिरीज आणि "मोनिका, ओ माय डार्लिंग" या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">राजकुमार राव याची वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची  क्षमता ही कायम उल्लेखनीय ठरली.  "गन्स अँड गुलाब्स" मधील एक करिश्माई मेकॅनिकमधून गुंड बनलेल्या पाना टिपूची भूमिका आणि "मोनिका ओ माय डार्लिंग" मधील रोबोटिक्स तज्ञ म्हणून त्याच्या भूमिकेची जोरदार प्रशंसा होऊन याला खूप प्रेम मिळाल होत.<br />"विकी विद्या का वो वाला व्हिडिओ," "स्त्री 2," आणि "SRI" चा समावेश असलेल्या रोमांचक आगामी प्रोजेक्ट्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9629/bollywood</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9629/bollywood</guid>
                <pubDate>Mon, 30 Oct 2023 15:06:47 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-10/img-20231030-wa0015.jpg"                         length="96382"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बर्थडे स्पेशल: अदिती राव हैदरी या अभिनेत्रीचा सिल्व्हर स्क्रीन स्पेक्टॅकल प्रवास... वाचा सविस्तर</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई:  विविध भूमिका करून कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाणारी अदिती राव हैदरी ही एक अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलुत्वा ने नेहमीच चर्चेत असते.विविध प्रकल्पांसह रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी ती सदैव सज्ज आहे. ऐतिहासिक नाटकांपासून ते विचार करायला लावणाऱ्या कथांपर्यंत, आदितीचे आगामी प्रकल्प सिनेप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">28 ऑक्टोबर 1986 रोजी अदिती राव हैदरी हीचा जन्म  हैदराबाद येथे झाला. आदितीचे वडील बोहरा मुस्लिम आणि आई हिंदू होती. अदिती मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि रामेश्वर राव यांच्या कुटुंबातील आहे.अदितीच्या लव्ह लाईफबद्दल अनेक बातम्या येत आहेत. असे ही म्हटले जाते की,  ती 17 वर्षांची होती तेव्हा ती वकील सत्यदीप</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9603/bollywood"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-10/img_20231028_1511461.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई:  विविध भूमिका करून कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाणारी अदिती राव हैदरी ही एक अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलुत्वा ने नेहमीच चर्चेत असते.विविध प्रकल्पांसह रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी ती सदैव सज्ज आहे. ऐतिहासिक नाटकांपासून ते विचार करायला लावणाऱ्या कथांपर्यंत, आदितीचे आगामी प्रकल्प सिनेप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">28 ऑक्टोबर 1986 रोजी अदिती राव हैदरी हीचा जन्म  हैदराबाद येथे झाला. आदितीचे वडील बोहरा मुस्लिम आणि आई हिंदू होती. अदिती मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि रामेश्वर राव यांच्या कुटुंबातील आहे.अदितीच्या लव्ह लाईफबद्दल अनेक बातम्या येत आहेत. असे ही म्हटले जाते की,  ती 17 वर्षांची होती तेव्हा ती वकील सत्यदीप मिश्रा यांच्या प्रेमात पडली. तसेच  वयाच्या 21 व्या वर्षी तिने सत्यदीप मिश्रा शी लग्न केले.पण आदिती आणि सत्यदीपचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांमधील वाद  वाढू लागला. रिपोर्ट्सनुसार, आदितीचा वयाच्या 25 व्या वर्षी सत्यदीपपासून घटस्फोट झाला. <br />गांधी टॉक्स<br />मधील अदिती राव हैदरी आणि विजय सेतुपती यांचे "गांधी टॉक्स" सहकार्य खूप उत्साहवर्धक आहे.गांधी टॉक्स" विचार करायला लावणारा आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध अनुभव असल्याचे वचन देतो.उल्लेखनीय म्हणजे, हा चित्रपट संवादविरहित असून, केवळ प्रसिद्ध संगीतकार ए.आर. यांच्या संगीतावर अवलंबून आहे "सुफियुम सुजातायुम" मधील मूक मुलीच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अदिती एका अनोख्या सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करणार आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">हीरामंडी:<br />या बहुप्रतीक्षित प्रकल्पामुळे भारतीय मनोरंजन जगतात खळबळ उडाली आहे. हीरामंडी हे दूरदर्शी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत अदितीचे दुसरे सहकार्य आहे.  आगामी मालिका ऐतिहासिक रेड-लाइट डिस्ट्रिक्टच्या पार्श्‍वभूमीवर सेट करण्यात आली आहे, ती पात्रे आणि त्यांच्या गुंतागुंतीबद्दल एक अनोखी आणि मनमोहक अंतर्दृष्टी देते. आता वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार्‍या या मालिकेत आदिती राव हैदरीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. <br /><br /></p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">लायनेस <br />"लायनेस" हा अदिती राव हैदरी यांचा आगामी हॉलिवूड प्रकल्प, सध्या निर्मितीत आहे आणि तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यांना तिच्या कर्तृत्वाची माहिती नाही त्यांच्यासाठी, तिने जागतिक फॅशन सीनवर एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक ब्रँडचा चेहरा म्हणून आपला ठसा उमटवला आहे, तर आंतरराष्ट्रीय मंचावर तिच्या अभिनयाची सुरुवात तिच्या अपवादात्मक प्रतिभेचे जगभरात प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाली आहे.  अभिनेत्री लायनेस एक आकर्षक आणि प्रभावशाली कथा सादर करण्यासाठी तयार आहे.  अदितीने एक मजबूत आणि सशक्त व्यक्तिरेखा साकारली आहे. ती एका शानदार आणि भावनिकरित्या भरलेल्या चित्रणाच्या अपेक्षेने. "लायनेस" मध्ये अदितीचा सहभाग केवळ तिच्या कलेबद्दलची तिची अटळ बांधिलकी दर्शवत नाही  तर हॉलीवूडमधील रोमांचक संधी देखील उघड करतो.आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असताना, तिचे चाहते तिच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत, <br /><br /></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9603/bollywood</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9603/bollywood</guid>
                <pubDate>Sat, 28 Oct 2023 15:46:35 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-10/img_20231028_1511461.jpg"                         length="176098"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बॉलिवुडच्या बादशहाला जिवे मारण्याची धमकी...! पोलिसांची Y+ सुरक्षा; काय नेमक प्रकरण, वाचा सविस्तर</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज<br />मुंबई: बॉलिवूडचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असेलेला स्टार शाहरुख खानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शाहरुख खान ला जीवे मारण्यावची धमकी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांच्या यशानंतर काही असंतुष्ट घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.यामुळे मुंबई पोलिसांनी शाहरुखला Y+ सुरक्षा दिली आहे. या Y+ सुरक्षेअंतर्गत, 6 वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि 5 शस्त्रे असलेले पोलिस 24 तास शाहरुख खानसोबत असतील.<br />मोठी गोष्ट म्हणजे या सुरक्षेचा खर्च शाहरुख खान करणार आहे. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भारतात खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज ठेवण्याची परवानगी नाही. याआधीही शाहरुखला अनेकदा जीवे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9326/bollywood"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-10/shah_rukh_khan_asksrk_1675495200645_1685208370681.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज<br />मुंबई: बॉलिवूडचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असेलेला स्टार शाहरुख खानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शाहरुख खान ला जीवे मारण्यावची धमकी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांच्या यशानंतर काही असंतुष्ट घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.यामुळे मुंबई पोलिसांनी शाहरुखला Y+ सुरक्षा दिली आहे. या Y+ सुरक्षेअंतर्गत, 6 वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि 5 शस्त्रे असलेले पोलिस 24 तास शाहरुख खानसोबत असतील.<br />मोठी गोष्ट म्हणजे या सुरक्षेचा खर्च शाहरुख खान करणार आहे. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भारतात खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज ठेवण्याची परवानगी नाही. याआधीही शाहरुखला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याच्या अनेक चित्रपटांमुळे त्याला प्रचंड विरोधाचाही सामना करावा लागला आहे.<br />'पठाण' चित्रपटाच्या रिलीजच्या वेळीच मिळाली होती जिवंत जाळण्याची धमकी आली होती. ही धमकी अयोध्येतील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी तर शाहरुख खानला जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. तसेंच  बंगल्याबाहेर निषेध करण्यासाठी  जमाव आला होता.  2010 मध्ये 'माय नेम इज खान' चित्रपटादरम्यान शाहरुखला अनेक धमक्या आल्या होत्या.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><strong>अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज सुरक्षा कर्मचारी असतील सोबत</strong></p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">   सुरक्षा कर्मचारी MP-5 मशीनगन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तूलने सुसज्ज असतील. खान यांच्या बंगल्यावर चार सशस्त्र पोलिसही सदैव उपस्थित राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><strong>यापूर्वी या कलाकारांना ही आल्या होत्या अश्या धमक्या</strong></p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या मिळाल्यानंतर त्याला Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. याशिवाय आमिर खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना X सुरक्षा कवच मिळाले आहे ज्यामध्ये त्यांना 3 PSOS मिळाले आहेत जे त्यांच्यासोबत तीन शिफ्टमध्ये 24 तास राहतात.या कलाकारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती </p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9326/bollywood</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9326/bollywood</guid>
                <pubDate>Mon, 09 Oct 2023 14:10:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-10/shah_rukh_khan_asksrk_1675495200645_1685208370681.jpg"                         length="190962"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी दिली आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या वाहिदा राहमन या ८ व्या महिला अभिनेत्री ठरल्या आहेत.</p>
<p>वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट या  गावात 3 फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली होती पण त्या त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे  लोकप्रिय झाल्या. </p>
<p>९० हून अधिक हिंदी चित्रपटात केले अभिनय</p>
<p>वहिदांनी त्यांच्या करिअरमध्ये घुँघर, चाँदनी, चौदहवी का चाँद, जस्टिस,ज़िदगी ज़िंदगी, ज्वालामुखी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9177/e-t"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-09/img-20230926-wa0041.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी दिली आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या वाहिदा राहमन या ८ व्या महिला अभिनेत्री ठरल्या आहेत.</p>
<p>वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट या  गावात 3 फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली होती पण त्या त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे  लोकप्रिय झाल्या. </p>
<p>९० हून अधिक हिंदी चित्रपटात केले अभिनय</p>
<p>वहिदांनी त्यांच्या करिअरमध्ये घुँघर, चाँदनी, चौदहवी का चाँद, जस्टिस,ज़िदगी ज़िंदगी, ज्वालामुखी ,ज्योती बने ज्वाला, 12 ओ क्लॉक, तीसरी क़सम, त्रिशूल, त्रिसंध्या, दर्पण, दिल दिया दर्द लिया, दिल का राजा, दिल्ली 6, धरती, धरम काँटा, नमक हलाल, नमकीन,नीलकमल, पथ्थर के सनम, पालकी,प्यासा, गाइड, रेश्मा और शेरा आणि रंग दे बसंती यांसारख्या ९० हून अधिक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.</p>
<p>*आतापर्यंत फक्त 7 महिला कलाकारांना मिळाला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार*</p>
<p>1969 मध्ये  पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेत्री देविका राणी यांना देण्यात आला होता. यानंतर सुलोचना, कानन देवी, दुर्गा खोटे, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 2020 मध्ये हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना देण्यात आला. तसेच 2023 मध्ये हा पुरस्कार वहीदा रहमान यांना देण्यात येणार आहे. </p>
<p>वहीदा रहमान यांना  मिळालेले आजपर्यंतचे पुरस्कार</p>
<p>वहीदा रहमान यांना गाईड (१९६५) व नील कमल (१९६८) या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, रेशमा और शेरा (१९७१) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.<br />१९७२ साली वहीदा रहमान यांना पद्मश्री पुरस्कार  या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.<br />इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी चित्रपट पुरस्कार (२०१३) मिळाला होता.<br />फिल्मफेअरचा आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलचा असे दोन जीवनगौरव पुरस्कार ही त्यांना प्राप्त झाले आहेत.<br />बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा 'तीसरी कसम’ला पुरस्कार तसेच मध्य प्रदेश सरकारचा किशोरकुमार अलंकरण पुरस्कार (२०१८-१९) ला देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.</p>
<p>वहीदा रहमान यांच्या जीवनाविषयी यी लिहिली गेलेली काही पुस्तके</p>
<p>कॉन्व्हर्सेशन विथ वहिदा रहमान (मूळ इंग्रजी, लेखिका नसरीन मुन्नी कबीर) - वहीदा रहमान यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक. मराठी अनुवाद, ‘वहिदा रेहमान : हितगुजातून उलगडलेली’, अनुवादक मिलिंद चंपानेरकर</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9177/e-t</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9177/e-t</guid>
                <pubDate>Tue, 26 Sep 2023 15:28:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-09/img-20230926-wa0041.jpg"                         length="207827"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आजचा सर्वाधिक व्हायरल होत असलेला फोटो</title>
                                    <description><![CDATA[<h1 class="wp-block-post-title">स्वरा भास्करने साखरपुड्यात नेसली आईच्या लग्नातली साडी</h1>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/7534/e-t"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-02/screenshot_20230217-131647_chrome.jpg" alt=""></a><br /><h1 class="wp-block-post-title">स्वरा भास्करने साखरपुड्यात नेसली आईच्या लग्नातली साडी</h1>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/7534/e-t</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/7534/e-t</guid>
                <pubDate>Fri, 17 Feb 2023 13:20:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-02/screenshot_20230217-131647_chrome.jpg"                         length="320293"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विशेष  : लता</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p><em>आधुनिक केसरी </em></p>
<p>सिद्धेश्वर पवार,गोडवा,<br />बालाजी नगर,मेहकर<br />9422880080 / 7350473030</p>
<p><br />तुझं गाणं ऐकत ऐकतच<br />मोठं झालोय आम्ही<br />तुझ्याच गाण्यानं<br />झोपवायची आई पाळण्यात<br />तुझं गाणं एकरूप झालंय<br />आमच्या जीवनात</p>
<p>तुझ्याच आवाजात<br />भासायचा तिचाही आवाज<br />साद घालायची ती<br />तुझ्याच आवाजात</p>
<p>तू जहा जहा चलेगा<br />मेरा साया साथ होगा<br />अस ती गुणगुणायची<br />तेव्हा ती सोबतच असायची<br />तुझ्याच आवाजात</p>
<p>फुलल तारुण्य आमचं<br />तुझ्याच आवाजात<br />हरवलं दुःखही आमचं<br />तुझ्याच आवाजात</p>
<p>नाम गुम जायेगा<br />मेरी आवाज ही पहचान है<br />पण खरं सांगू<br />तुझा आवाज ठरली<br />देशाचीही ओळख</p>
<p>तुझा आवाज देशातल्या<br />प्रत्येकाच्या घराघरात<br />अन मनामनात<br />तूच होती खरी भारतरत्न<br />अन विश्व रत्न सुद्धा</p>
<p>सूर्य चंद्र तारे<br />अन तुझा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/7473/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-02/img-20230206-wa0042.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p><em>आधुनिक केसरी </em></p>
<p>सिद्धेश्वर पवार,गोडवा,<br />बालाजी नगर,मेहकर<br />9422880080 / 7350473030</p>
<p><br />तुझं गाणं ऐकत ऐकतच<br />मोठं झालोय आम्ही<br />तुझ्याच गाण्यानं<br />झोपवायची आई पाळण्यात<br />तुझं गाणं एकरूप झालंय<br />आमच्या जीवनात</p>
<p>तुझ्याच आवाजात<br />भासायचा तिचाही आवाज<br />साद घालायची ती<br />तुझ्याच आवाजात</p>
<p>तू जहा जहा चलेगा<br />मेरा साया साथ होगा<br />अस ती गुणगुणायची<br />तेव्हा ती सोबतच असायची<br />तुझ्याच आवाजात</p>
<p>फुलल तारुण्य आमचं<br />तुझ्याच आवाजात<br />हरवलं दुःखही आमचं<br />तुझ्याच आवाजात</p>
<p>नाम गुम जायेगा<br />मेरी आवाज ही पहचान है<br />पण खरं सांगू<br />तुझा आवाज ठरली<br />देशाचीही ओळख</p>
<p>तुझा आवाज देशातल्या<br />प्रत्येकाच्या घराघरात<br />अन मनामनात<br />तूच होती खरी भारतरत्न<br />अन विश्व रत्न सुद्धा</p>
<p>सूर्य चंद्र तारे<br />अन तुझा आवाज<br />कधीही न थांबणारा<br />सृष्टीच्या अस्तित्वापर्यंत<br /> जगण्याची उमेद देणारा<br /><br /></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/7473/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/7473/mah</guid>
                <pubDate>Mon, 06 Feb 2023 14:31:37 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-02/img-20230206-wa0042.jpg"                         length="41216"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मीनाकुमारी : एक शोकांतिका</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो अजूनही तसाच आहे, गाव मात्र बदलेलं आहे. कब्रस्थानाला लागून शासकीय विश्रामगृह आहे, निझामकालीन भव्य अशी वास्तू आहे. सांगितलं जातं की इथे मीनाकुमारी अधूनमधून राहायला येत असत. या परिसरात कमालीची शांतता आहे. इथं मन खूप रमतं. लेखनासाठी खूप सुंदर जागा आहे. म्हणूनच बहुतेक मीनाकुमारीला ही जागा आवडत असावी, आयुष्याच्या उत्तराधार्थ त्या एकाकी पडल्या होत्या आणि लेखणीशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5480/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/minakumari.jpeg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो अजूनही तसाच आहे, गाव मात्र बदलेलं आहे. कब्रस्थानाला लागून शासकीय विश्रामगृह आहे, निझामकालीन भव्य अशी वास्तू आहे. सांगितलं जातं की इथे मीनाकुमारी अधूनमधून राहायला येत असत. या परिसरात कमालीची शांतता आहे. इथं मन खूप रमतं. लेखनासाठी खूप सुंदर जागा आहे. म्हणूनच बहुतेक मीनाकुमारीला ही जागा आवडत असावी, आयुष्याच्या उत्तराधार्थ त्या एकाकी पडल्या होत्या आणि लेखणीशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती. मी बरेच दिवस झाले यावर लिहावं म्हणत होतो पण वेळ मिळत नव्हता, पण १ ऑगस्ट मीनाकुमारीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द व्यक्त होत आहे.</p>
<p>चंदेरी दुनियेत प्रसिध्दीच्या शिखरावर असताना अवघ्या ३९ वर्षी जगाचा निरोप घ्यावा, ते ही अशा करुण अवस्थेत, हे मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. रील लाईफमध्ये आयुष्यभर त्यांनी ट्रजेडी क्वीनच्या भूमिका केल्या आणि रिअल लाईफ मध्येही ट्रजेडी क्वीन म्हणूनच जगल्या. म्हणून मीनाकुमारीला 'ट्रजेडी क्वीन' ही म्हंटलं जातं. इथं मला ऱ्होन्डा ब्रिनी यांच्या 'द सिक्रेट' मधली 'लॉ ऑफ अट्रक्शन' चा  सिद्धांत आठवतो.</p>
<p>बालपण</p>
<p>मीनाकुमारी ह्या रवींद्रनाथ टागोर कुटुंबातील होत्या, हे फार कमी लोकांना माहिती असेल. रवींद्रनाथ टागोर यांची भावजय ह्या बालविधवा होत्या. त्यांनी बालविधवा प्रथेस कडवा विरोध करून इसाई धर्म स्वीकारला आणि मेरठ येथे प्यारेलाल यांच्याशी विवाह केला. त्यांना प्रभावती नावाची गुणी मुलगी झाली. तिचा आवाज खूप गोड होता म्हणून तिने मुंबई गाठले तिथे तिची भेट संगीतकार अलिबक्षशी झाली. नंतर विवाहात रूपांतर झाले आणि प्रभावतीची इकबाल बानो झाली. या जोडप्याला तीन मुली झाल्या. पहिली खुर्शीद लग्नानंतर पाकिस्तानात गेली. दुसरी मधू हास्य कलाकार 'महेमुद' ची पत्नी आणि सगळ्यात लहान महजबी म्हणजेच मीनाकुमारी.</p>
<p>'अलिबक्ष'ची परिस्थिती कामं नसल्याने खूपच दयनीय होती.  ज्या दिवशी काम त्याच दिवशी पोटाला मिळायचं. दोन मुली नंतर तिसरी मुलगी असह्य होती म्हणून 'महजबी' ला 'मीनाकुमारी' ला अनाथ आश्रमात टाकावं लागलं पण कुठं तरी ममता जागृत झाली आणि परत तिला घरी आणण्यात आलं. घरची परिस्थिती खूपच वाईट होती. अली बक्ष आणि इकबाल बानो दोघे ही कामाकरिता बाहेर पडायचे. 'महजबी' ची शिक्षणात आवड होती पण घरच्या दरिद्रीमुळे तिन्ही मुलींनाही बाल कलाकार म्हणून कामाला लावले.  त्यामुळे सगळेच कामासाठी बाहेर पडल्याने स्वयंपाक एकदाच बनायचा कारण घरी येण्याची कुठलीच वेळ नियोजित नव्हती. त्यामुळे शिळ्या जेवणाची सवय नंतर आवड 'मीना कुमारी' ला  शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर, ठेचा आणि कांदा ती आवडीने खायची. घरच्या हालक्याच्या परिस्थिती मुळे घरात रोजच भांडणे व्हायची. त्यामुळे मीनाकुमारी मध्ये लहानपणापासूनच एकाकीपणा आला होता ती खडे गोळा करायची आणि ती खड्याशी गप्पा मारायची आणि ही सवय तिची शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर आणि एकांता मधले खडे. अवघ्या चौथ्या वर्षी 'महजबी' ला पोटासाठी कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं. तो चित्रपट होता विजय भट्ट दिग्दर्शित ' लेदर फेस' ( १९३९ ) या चित्रपटाच्या वेळी 'महजबी'चं वय फक्त चार वर्षे होतं. या चित्रपटासाठी 'महजबी' ला २५ रुपये भेटले होते आणि घरची चूल पेटली होती. आठव्या आणि नवव्या वर्षी तिला 'एक ही भूल' 'पूजा' चित्रपट भेटला. बाल कलाकार म्हणून भरपूर कामे मिळू लागली.  'महजबी' आवाज ही गोड होता यातून ही  तिला पैसे मिळाय लागले आणि घर चालायला लागले आता 'महजबी' बाल वयातच घर चालविणारी मशीन बनली होती. 'महजबी' मुळे घरात प्रसन्नता अली होती. 'महजबी' पैसा कमविणारी मशीन बनली होती, शिकलेली मशीन जास्त पैसा कामावेल म्हणून अली बक्ष ने 'महजबी' ला हिंदी, इंग्लिश आणि उर्दू ची शिकवणी लावली. टीचर घरी येऊन शिकवायचे. अशा वेळातच 'महजबी' च्या आई चं निधन झालं, हा खूप मोठा धक्का 'महजबी' ला होता. नवव्या वर्षी सर्व प्रथम संगीतकार अनिल बिस्वास यांनी 'महजबी' ला गायनाची संधी दिली 'बहेन' (१९४१ ) चित्रपटात. पुढे 'पिया घर आजा' चित्रपटात सगळेच 'मीनाकुमारी'नी गायली. १४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरु झाला.</p>
<p>प्रेम आणि विवाह</p>
<p>१४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरू झाला. मीनाकुमारीच्या अभिनयाची प्रशंसा व्हायची पण चित्रपट थर्ड ग्रेडचे असायचे. ह्या काळात होमी वाडिया च्या 'लक्ष्मी नारायण' पौराणिक चित्रपटात 'लक्ष्मी' ची भूमिका मिळाली. या चित्रपटामुळे ओळीने 'हनुमान पाताल विजय', 'गणेश महिती' असे पौराणिक चित्रपट मिळाले आणि मीनाकुमारीला लोकप्रियता मिळाली. होमी वाडीया सोबतच्या शेवटच्या चित्रपटात ' अल्लादिन का चिराग' ( १९५२ ) साठी मीनाकुमारीला मिळाले होते, दहा हजार रुपये. त्या पैशातून आलिशान सेकंड हँड कार खरेदी केली आणि ड्रायव्हिंग ही शिकली.</p>
<p>याच काळात देविका राणी सोबत हिट चित्रपट देणारे अशोक कुमार यांनी 'तमाशा' चित्रपटासाठी  मीनाकुमारी ला वेगळ्या प्रकारची भूमिका दिली. हा चित्रपट तर चालला नाही पण या चित्रपटाच्या सेट वर मीनाकुमारीच्या 'सपनाचा राजकुमार' 'कमाल अमरोही' शी भेट झाली. चित्रपट 'पुकार' च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर आगामी फिल्मसाठी मीनाकुमारीला त्यांनी पसंद केलं होतं पण ते काही जुळून आलं नव्हतं, पण मीना कमाल अमरोहीच्या प्रेमात पडली. त्यावेळी मीनाकुमारी फक्त आठ वर्षाची होती. कमाल अमरोहीचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार होतं तसेच त्याकाळातले सर्वात महागडे दिग्दर्शक होते. 'महल' चित्रपटासाठी त्यांनी त्याकाळी सर्वात जास्त एक लाख रुपये घेतले होते. सांगितलं जातं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा होऊन 'मधुबाला' ने सुद्धा स्वतः हुन लग्नाचं प्रपोजल दिलं होतं. मीनाकुमारी वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्या प्रेमात होती. घरात कमाल अमरोहीचे असंख्य फोटो मीनाकुमारी लावलेले होते. 'तमाशा' चित्रपटाच्या सेटवर दहा वर्षांनी मीनाकुमारीची कमाल अमरोही ची भेट झाली होती. दहा वर्षांपूर्वी मीना बाल तर आता ती तरुण होती. कमाल अमरोही मीनाकुमारी पेक्षा १५ वर्षांनी मोठे व विवाहित होते.</p>
<p>'मीनाकुमारी' ला अमरोही सोबत काम करण्याची आणि भेटायची इच्छा खूप असायची. ती मनातल्या मनात  अमरोही वर खूप प्रेम करायच्या. एकेदिवशी अचानक कमाल अमरोहीने सेक्रेटरी बाकर अली जवळ 'अनारकली' चित्रपटाचा प्रसाव पाठविला होता, हा प्रस्ताव ऐकून मीनाकुमारी खूप खुश झाली. 'अनारकली' चे निर्माते मखनलाल मीनाकुमारी ला तीन हजार देऊ इच्छित होते. मागची फिल्म 'अल्लादिन का चिराग' ला मीनाला दहा हजार मिळाले होते. त्यामुळे मिनाचे वडील अली बक्ष या प्रस्तावास तयार नव्हते शेवटी अमरोहीने मध्यस्थी करून पंधरा हजार रुपये ठरविले. यावेळेस अमरोही च्या मनात मिनाबद्दल  प्रेम नव्हतं. मीनाकुमारीचं एकतर्फी प्रेम होतं. 'अनारकली' साठी लोकशन पाहण्यासाठी अमरोही आग्र्याला गेले. इकडे मीनाकुमारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला गेली होती, परतीच्या वेळी तिच्या मोटारीला मोठा अपघात झाला आणि तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही बातमी वृत्तपत्रात अमरोही यांनी वाचली त्यावेळी 'अनारकली' च्या लोकेशन साठी आलेल्या दिल्लीच्या हॉटेलमध्ये होते. ते तातडीने पुण्याला मीनाकुमारीला भेटायला पुण्याला आले. यावेळी मीनाकुमारीला खूप आनंद झाला. चार महिने हॉस्पिटलमध्ये होती. रोज दोघांच्या भेटी व्हायला लागल्या आता अमरोही ही मीनाच्या प्रेमात पडले होते. पण इकडे अनारकली चित्रपट डब्ब्यात गेला असला तरी याच काळात मीनाकुमारी ला 'बैजू बावरा (१९५३) व फुटपाथ (१९५३) हे ब्लॉकबस्टर मिळाले आणि मीना लोकप्रियेतेच्या शिखरावर पोहचली. इकडं अमरोही आणि मीना ने लग्न करायचं ठरवलं होतं पण अडचण मीनाचे वडील अली बक्ष होते कारण मीना सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. त्यामुळे ते विरोध करणारे होते. तरीही या दोघांनी लपून लग्न केलं आणि काही नाही झाले अशा पद्धतीने घरी आपआपल्या घरी राहिले. मीनाने विचार केला की दोन लाख आले की वडिलांना द्यावं आणि लग्नाबद्दल सांगावं पण त्याआधीच तिच्या वडिलांना कळलं आणि मीनाला अमरोहीला तलाक दे म्हणून तकादा लावला. अमरोही सोबत काम करण्यास मज्जाव केला आणि ज्यादिवशी तू अमरोही सोबत काम करशील त्यादिवशी माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील, अस अली बक्ष नी सुनावलं पण मिनाकडून हे शक्य नाही झाले आणि ते घर मिनासाठी बंद झाले. अमरोही नी पालिहिल ला घर घेतलं आणि दोघे सुखाने राहू लागले.</p>
<p>चित्रपट प्रवास व एक गुणी अभिनेत्री</p>
<p>बैजू बावरा व  नंतर फुटपाथ नंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 'बैजू बावरा' (१९५३) ला पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. लागलीच दुसऱ्या वर्षी ही  'परिणिता' साठी मीनाकुमारी ने फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. कमाल अमरोही ने दोघांच्या प्रेमकहाणी वर 'दायरा' चित्रपट निर्माण केला तो ही सुपर हिट ठरला. </p>
<p>आपल्या ३४ वर्षाच्या रजतपटीय आयुष्यात अभिनय सम्राट अशोककुमार पासून ते 'मेरे अपने' विनोद खन्ना पर्यंत कितीतरी अभिनेत्याशी जुगलबंदी तिला खेळावी लागली. पण मीनाकुमारी कुठेच कमी पडली नाही. मीनाकुमारीला आव्हानात्मक भूमिका मिळत गेल्या करण ती पेलविण्याची ताकत तिच्यात होती. म्हणून ती अजोड होती. मीनाकुमारीने अभिनयाचे कधीही अभिनयाची ट्रेनिंग घेतली नाही. ती स्वतः च अभिनयाची विद्यापीठ होती. 'साहेब बिवी और गुलाम' तिच्यातला 'अभिनय साम्राज्ञी' समोर आणते. अभिनयाचे सर्व आव्हाने तिने स्वीकारले. संवाद फेकीत ती अजोड होती. तिचे संवाद लेखकाच्या आत्म्याशी समरस व्हायची. तिचे डोळे कारुण्याचे गुलाम होते. निर्मलतेचे धनी होते. या डोळ्यांनी कधी ग्लिसरीन चा उपयोग ही केला नाही. अशी ही प्रगल्भ अभिनेत्री. भूमिकेच्या अंतरंगात शिरून तिचे सर्व पैलू पडद्यावर सादर करण्याची करण्याची क्षमता तिच्यात होती. क्षमते बरोबरच काही शिकण्याची ही तिची वृत्ती होती. मीनाकुमारीच्या अभिनयाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तिचा पेहराव बोलत नसे, भूमिकेत शिरताना तिच्या सर्वांगावर परिणाम दिसत असे.</p>
<p>मीनाकुमारीला तिच्या छोट्याशा कारकिर्दीत चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाली आहेत. तिचा ' साहिब, बिवी और गुलाम' हा चित्रपट बर्लिन फेस्टिव्हल मध्ये नामांकित झाला होता. मीनाकुमारीने एकूण ९१ चित्रपटात भूमिका केल्या. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ चित्रपटात तिच्याबरोबर अशोक कुमार मुख्य भूमिकेत होता. ७ चित्रपटात धर्मेंद्र बरोबर. राज कुमार, राजकपूर, दिलीपकुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना अशा दिगग्ज कलाकारांसोबत काम केलेलं आहे नव्हे उलट या दिगग्ज अभिनेत्री सोबत या कलाकारांनी काम केलेलं आहे.</p>
<p>मीनाकुमारी परीस होती, ज्याला ही तिने स्पर्श केलं ते सोनं झालं. धर्मेंद्रला मोठं बनविण्यात तिचा मोठा हात आहे. तिचे को -स्टार तिच्या प्रभावाने मोठी व्हायची. महेमुदला ही तिनेच हात दिला नाहीतर महेमुदचे 'पेइंग गेस्ट' असलेले अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा आज या ठिकाणी कदाचित नसते. कारण या दोघांना ब्रेक महेमुदने दिला होता.</p>
<p>वैवाहिक जीवन</p>
<p>तीन -चार वर्षांच्या सुखी संसारानंतर या सुखी संसाराला ग्रहण लागायला चालू झाले. एकिकडे चित्रपट हिट वर हिट होत असताना रिअल लाईफचा चित्रपट फ्लॉप होत होता. तिचे चित्रपट जरी हिट होत असले तरी ती सुखी नव्हती. अमरोही आणि तिचे खटके उडायला लागले होते. या नात्यात दुरावा येण्याचं कारण सांगितलं जातं की,  मीनाकुमारीची आपल्या को - स्टारशी जवळीक. दुसरं कारण अमरोहीचा पझेसिव्हनेसपणा. असं ही सांगितलं जातं की कमाल अमरोही बाबतीत तिचे को - स्टार मिसगाईड करायचे आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचे. यामुळे कमाल अमरोहीने तिच्यावर काही बंधने आणली. तीन अटी तिच्यावर लादल्या गेल्या म्हणजे आता अटीवर त्यांचा संसार चालू होता. त्या तीन अटी अशा होत्या. </p>
<p>१. मीनाकुमारीने बरोबर संध्याकाळी साडे सहा वाजता घरी यावे आणि दोघे एकमेकांना वेळ द्यावा.</p>
<p>२. आपल्या मेकअप रूम मध्ये आपल्या को - स्टारला किंवा इतर कुणालाही प्रवेश करू देता कामा नये. सांगितले जाते की यासाठी अमरोही ने पाळतीवर आपली माणसं ही ठेवली होती. या काळात मीनाकुमारीची गुलजार शी जवळीक वाढली होती आणि गुलजार आणि मीनाकुमारी मेकअप रूम मध्ये तासनतास बसायचे. म्हणून ही अट.</p>
<p>३. कुठं जायचं असेल तर आपल्याच गाडीतुन जायचं, दुसऱ्याच्या गाडीत बसायचं नाही. सांगितलं जातं की मीनाकुमारीने एकदा आपली गाडी असतानाही प्रदीप कुमारच्या गाडीत प्रवास केला होता.</p>
<p>एकीकडे मीनाकुमारी यशाच्या शिखरावर राज्य करीत होती तर एकीकडे तिची मानसिक घुसमट चालू होती. आणि ह्या अमरोहीच्या अटी तिला पाळणं जड झालं आणि वाद वाढतंच गेला. सांगितलं जात तिचे को - स्टार, मित्र किंवा नातेवाईक ह्या दोघांची समजूत न काढता उलट आगीत तेल ओतण्याचे काम केलं. जेव्हा कायमच घर सोडून मीनाकुमारी आपले जिजा महेमुद कडे आली तेव्हा अमरोही मीनाकुमारीची समजूत काढण्यासाठी घरी होते खरंतर महेमुद नी मीनाकुमारीची समजूत काढून अमरोही सोबत पाठवायला हवे होते पण त्यांनी तसं नाही केला कारण मीनाकुमारी ही परीस होती तिची सर्वानाच गरज होती. पण स्वतः मीनाकुमारीचं वाटोळं होत गेलं. त्यामुळे मीनाकुमारी कमाल अमरोही पासून दूर दूर होत गेली. सांगितलं जातं पाकिजा मध्ये आधी धर्मेंद्र होता पण धर्मेंद्रशी मीनाकुमारीशी जवळीक पाहून अमरोहीने धर्मेंद्रला पाकिजातून काढून टाकले आणि त्याचा परिणाम असा झाला की पाकिजा बंद पडला नंतर सुनील दत्तच्या हस्तक्षेपामुळे पाकिजाचे शूटिंग परत चालू झाले पण मीनाकुमारी व्यवस्थित सहकार्य करीत नव्हती. १९५४ ला सुरू केलेले पाकिजाचे शूटिंग १९७२ ला पूर्ण झाले.  आणि रिलीज झाला. पाकिजा हा चित्रपट कमाल अमरोही आणि मीनाकुमारीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट मीनाकुमारीला पाहण्याची खूप इच्छा होती, चित्रपट रिलीज होऊनही ती पाकिजा चित्रपट पाहू शकली नाही कारण ती हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी होती आणि तीन महिन्यांतच ती जगाला निरोप दिला.</p>
<p>अनेक कलाकारांशी संबंध</p>
<p>मीनाकुमारीचे तिच्या अनेक सहकलाकारशी नेहमी नाव जोडलं गेलं. अशोक कुमार, भारतभूषण, दिलीप कुमार, धर्मेंद्र, गुलजार. गुलजार सोबतचा एक किस्सा प्रचंड गाजला होता. कमाल अमरोहीने मीना कुमारी वर बऱ्याच अटी ठेवल्या होत्या. त्यातली एक अट म्हणजे मीनाकुमारीच्या मेकअप रूम मध्ये पुरुष कलाकारास बंदी होती. पण गुलजार आणि मीनाकुमारी तासान तास मेकअप रूम मध्ये बसायचे. बाकर ने कमाल अमरोहीला ही बातमी दिली. तेंव्हा गुलजार ला सेट वरच  मारण्याचा प्लॅन झाला पण गुलजार त्यातून निसटले.</p>
<p>माणूसकीची मीनाकुमारी</p>
<p>एक माणूस म्हणून मीनाकुमारी ग्रेटच होती. अमरोहीशी लग्न होताच तिने अमरोही च्या पत्नीला व त्यांच्या मुलांना आपलंसं केलं. होतं. मीनाकुमारीला लहान मुले खूप आवडायची. चित्रपटात लहान मुलांना मारायचा सीन असला की मारल्यानंतर ती त्यांना मायेने जवळ घ्यायची आणि रडायची तिने कुणाकडून काही घेतले नाहीत, देतच राहिली. अमरोही पासून वेगळं जरी राहत असली तरी अमरोही च्या पाहुण्यांचा मान सन्मान करीत असे.अमरोही पासून वेगळं झाल्यापासून ती दारूच्या आहारी खूप गेली होती. सांगितलं जातं की धर्मेंद्र सोबतचं प्रेमभंग झाल्याने ती खूपच अल्कोहोलिक होती. अमरोही नंतर धर्मेंद्र आपल्याला आधार देईल असं मीनाकुमारीला वाटलं होतं. सांगितलं जातं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ती धर्मेंद्रला पत्र पाठवायची की एकदा मला भेट पण धर्मेंद्र कडून तिला प्रतिसाद मिळाला नाही. मीनाकुमारीची आर्थिक परिस्थिती खूपच हालक्याची झाली होती. दारू साठी सुध्दा पैसा नसायचा. सांगितलं जातं की शेवटच्या क्षणी ती रात्र न दिवस  दारूच्या नशेत राहायची. तिचे नोकर तिला तिच्या दारू मध्ये देशी टाकून द्यायचे तरी तिला भान नसायचं, नोकर तिच्या शरीराशी खेळायचे पण तिला कसलं भान नाही असायचं. तिला जेव्हा कळलं की आपण आता जिवंत राहू शकत नाही तेंव्हा मुमताज कडून तीन लाख उसने घेतल्याची परतफेड म्हणून जुहूचा बंगला मुमताजला मरण्यापूर्वी  देऊन टाकला, कुणाचं कर्ज अंगावर घेऊन नाही गेली. तिच्या अंतविधी साठी पैसे नव्हते तेव्हा एका निर्मात्याकडे तिचा पैसा होता, त्या निर्मात्याने तो पैसा देऊ केला मग तिची अंतविधी झाली. अशाप्रकारे या अभिनय साम्राज्ञीचा ३१ मार्च १९७२ ला अंत झाला.</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/minakumari_01.jpeg" alt="Minakumari_01"></img><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/suresh-shirshikar.jpg" alt="suresh shirshikar"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मनोरंजन</category>
                                            <category>Stories</category>
                                            <category>लेख</category>
                                            <category>बॉलिवूड</category>
                                            <category>अभिनेत्री</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5480/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5480/lekh</guid>
                <pubDate>Fri, 29 Jul 2022 14:46:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/minakumari.jpeg"                         length="235440"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सुपरस्टार राजेश खन्ना</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतीदिन आहे. राजेश खन्नाचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे ते १९६८-७६ या कालावधीतल्या त्याच्या अशक्य अशा यशामुळे. राजेश खन्ना यांनी एकामागोमाग एक असे सलग १५ हिट सिनेमे दिले होते. यानंतर प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला राजेश यांच्यासोबतच काम करायचं होतं. सिनेमात राजेश खन्ना असणं हीच गोष्ट तो सिनेमा हिट करण्यासाठी पुरेशी होती. या काळात रोमान्सला एक नवी ओळख देणारे राजेश खन्ना होते. पुढेही त्याने सुपरहिट चित्रपट दिले, नाही असं नाही. पण ही वर्षं फिरून पुन्हा आली नाहीत. वैभवाचे दिवस सरले तरी राजेश खन्ना पुन्हा सामान्य माणूस होऊच शकला नाही. मनाने तिथंच राहिला.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5322/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/rajesh-khanna_01-copy.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतीदिन आहे. राजेश खन्नाचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे ते १९६८-७६ या कालावधीतल्या त्याच्या अशक्य अशा यशामुळे. राजेश खन्ना यांनी एकामागोमाग एक असे सलग १५ हिट सिनेमे दिले होते. यानंतर प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला राजेश यांच्यासोबतच काम करायचं होतं. सिनेमात राजेश खन्ना असणं हीच गोष्ट तो सिनेमा हिट करण्यासाठी पुरेशी होती. या काळात रोमान्सला एक नवी ओळख देणारे राजेश खन्ना होते. पुढेही त्याने सुपरहिट चित्रपट दिले, नाही असं नाही. पण ही वर्षं फिरून पुन्हा आली नाहीत. वैभवाचे दिवस सरले तरी राजेश खन्ना पुन्हा सामान्य माणूस होऊच शकला नाही. मनाने तिथंच राहिला. </p>
<p>चित्रपट उद्योग बदलला. प्रेक्षक बदलले. अमिताभ बच्चन नावाच्या नव्या वादळाने जुने हिशेब उधळून टाकले. राजेश खन्ना मात्र अखेरपर्यंत पुनरागमनाचे प्रयत्न करत राहिले.</p>
<p>राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असं होतं. त्यांच्या वडिलांचे नाव होते लाला हिरानंद आणि आईचे नाव होते चंद्रानी खन्ना. त्यांचे वडील लाला हिरानंद एम. सी. हायस्कूल मध्ये मुख्याध्यापकाची  नोकरी करत होते. ही शाळा आता पाकिस्तान मध्ये येते. त्यानंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना दत्तक घेतले त्यांची नावे आहेत चुन्नीलाल खन्ना आणि लीलावती खन्ना. त्यांचे नवीन वडील हे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. ते १९३५ मध्ये लाहोर हुन मुंबईला आले. राजेश खन्ना एका टॅलेंट हंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत आले होते. ही स्पर्धा युनायटेड फिल्म प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारे अमृतसरमध्ये जन्माला आलेले जतीन खन्ना चित्रपटनगरीत आले आणि राजेश खन्ना या नावाने ओळखले जाऊ लागले. राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‹आखिरी खत›, ‹बहारों के सपने› आणि ‹राज› अशा चित्रपटांनी झाली. पण १९६९ साली आलेल्या ‹आराधना› चित्रपटानं त्यांना रातोरात स्टार बनवलं. त्यानंतर आलेल्या ‘खामोशी’ मध्ये त्यांच्या अभिनयाची प्रचंड स्तुती झाली आणि चित्रपट समीक्षक त्यांना सुपरस्टार म्हणू लागले. १९६९  ते १९७६ या काळात ते हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते.</p>
<p>पण १९७६ नंतर त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटू लागले. अमिताभ बच्चन यांच्या ‹अँग्री यंग मॅन›च्या उदयाचा हाच काळ ! चित्रपटसृष्टीवर अमिताभ बच्चन नावाचं गारूड पडलं आणि राजेश खन्ना त्या झंझावातात मागे पडले. देशभरात सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरं होत होती. तरुणांना ‹मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता› म्हणणारा अमिताभ जास्त आपलासा वाटत होता. पण त्या आधीचं दशक निर्विवादपणे राजेश खन्ना आणि त्यांच्या चित्रपटांनी गाजवलं. २००० साली मात्र ते चित्रपटांतून ते पूर्णपणे गायब झाले. त्यादरम्यान एखाद दुसरे चित्रपट केले. त्याशिवाय टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. राजेश खन्ना यांचा ‹रियासत› हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा ‹गॉडफादर› चित्रपटानं प्रेरित होती. बॉक्स ऑफिसचे चढ-उतार राजेश खन्ना यांनी जवळून पाहिले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं. काँग्रेसकडून १९९१ ते १९९६ या काळात दिल्ली लोकसभेसाठी खासदार म्हणून राजेश खन्ना यांनी काम केलं. यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.</p>
<p> राजेश खन्ना यांनी जाणीवपूर्वक  वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या, चित्रपटांतून विविध प्रयोग केले. कटी पतंग, ‹अमर प्रेम, ‹अपना देश›, ‹आपकी कसम›, ‹नमक हराम›, ‹फिर वही रात›, ‹अगर तुम ना होते›, ‹आवाज›, ‹प्रेम नगर›, ‹अवतार›, ‹आनंद›, ‹हम दोनों› अशा चित्रपटांनी आजही चित्रपट रसिकांना मोहिनी घातली आहे. मुमताज यांच्याबरोबर त्यांची जोडी हिट झाली होती. दोघांनी आठ चित्रपट एकत्र केले आणि सर्व चित्रपट गोल्डन ज्युबिलीपर्यंत गेले. पण शर्मिला टागोर, आशा पारेख, झीनत अमान या अभिनेत्रींबरोबरचे त्यांचे चित्रपटसुद्धा गाजले होते. व्यावसायिक चित्रपट तेव्हा संपूर्ण त्याज्य मानला जात होता असे अनेक विषय आणि मुद्दे खन्नाच्या चित्रपटांतून वारंवार येतात. हे चित्रपट यशस्वी झाले नसतील. पण म्हणून त्यांचं महत्व कमी होत नाही. या चित्रपटांकडे पाहून त्यांचा दुर्दम्य आशावाद आणि स्वप्ने पाहण्याची ताकद लक्षात येते. राजेश खन्ना यांनी एकूण १८० सिनेमांमध्ये काम केलं. यातील १६३ सिनेमे हे फिचर फिल्म होते. १२८ सिनेमांमध्ये त्यांनी मूख्य भूमिका साकारल्या. २२ सिनेमांमध्ये दुहेरी भूमिका केल्या तर छोट्या- मोठ्या अशा १७ सिनेमांमध्ये काम केलं. राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी तीन वेळा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. तर १४ वेळा ते या पुरस्कारांसाठी नामांकित झाले होते. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनद्वारे हिंदी सिनेमांतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना चार वेळा मिळाला. तर याच पुरस्कारासाठी ते २५ वेळा नामांकित झाले होते. भारतीय टपाल खात्याने तीन मे २०१३ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टाचे तिकीट सुद्धा काढले होते. </p>
<p>राजेश खन्ना यांचा विवाह मार्च १९७३ साली डिंपल कपाडिया यांच्याशी झाला. डिंपल यांचा पहिला चित्रपट ‹बॉबी› रिलीज होण्याच्या सहा महिन्यांआधी त्यांचा विवाह झाला. कालांतराने ते वेगळे झाले, पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या आजारपणात डिंपल यांनी त्यांची खूप काळजी घेतली होती. त्यांनी चाहत्यांचं  ते प्रेम अनुभवलं जे आजपर्यंत कुठल्याही सुपरस्टार ने अनुभवलं नसेल. त्यांचे चाहते त्यांच्या गाडीचे चुंबन घ्यायचे. जिथं त्यांची गाडी जायची, मुली ती धूळ आपल्या भांगात भरायच्या. बराचश्या मुलींनी राजेश खन्ना यांच्या फोटो बरोबर लग्न केले होते. चाहते त्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहायचे. राजेश खन्ना यांचं स्टारडम निर्विवाद होतं. इतकं वलय कमावणारा अभिनेता तसा दुर्मिळच.</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/suresh-mantri.jpg" alt="suresh mantri"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मनोरंजन</category>
                                            <category>बॉलिवूड</category>
                                            <category>अभिनेता</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5322/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5322/lekh</guid>
                <pubDate>Tue, 19 Jul 2022 16:51:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/rajesh-khanna_01-copy.jpg"                         length="1427137"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>म्युझिक टीचर (Netflix)</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>तो सिमल्याच्या निसर्गरम्य वातावरणात राहत असलेला संगीतशिक्षक असतो.  त्याचे वडील शास्त्रीय संगीतातले नामवंत व्यक्तिमत्त्व व गुरू होते. त्याच्या आयुष्यात निरनिराळ्या नात्यांनी पाच स्त्रिया येतात. </p>
<p>त्याची आई त्याला समजून घेणारी. त्याने सुखी, आनंदी असावे यासाठी आशेने डोळे लावून बसलेली. धाकटी बहीण मायाळू, साधी, मोजक्याच अपेक्षा/आकांक्षा असलेली.</p>
<p>दोघींच्या सहवासात शांतपणे जीवन जगणारा तो पोटापुरते इच्छिणारा, महत्त्वाकांक्षी नसणारा.</p>
<p>एके दिवशी त्याला मोठ्या घरचे बोलावणे येते. त्यांच्या तरुण मुलीला गाणे शिकवायचे असते. तरुण मुलीची आईच चौकशी करत असते, कमी पगारात ती गाण्याची शिकवणी ठरवून टाकते. शिकवणी सुरू होते, तरुण मुलगी आनंदाने शिकत असते.</p>
<p>गाणे शिकणारी आणि ते शिकवणारा - दोघे गाण्याची उत्फुल्ल</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5300/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/music-teacher_02.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>तो सिमल्याच्या निसर्गरम्य वातावरणात राहत असलेला संगीतशिक्षक असतो.  त्याचे वडील शास्त्रीय संगीतातले नामवंत व्यक्तिमत्त्व व गुरू होते. त्याच्या आयुष्यात निरनिराळ्या नात्यांनी पाच स्त्रिया येतात. </p>
<p>त्याची आई त्याला समजून घेणारी. त्याने सुखी, आनंदी असावे यासाठी आशेने डोळे लावून बसलेली. धाकटी बहीण मायाळू, साधी, मोजक्याच अपेक्षा/आकांक्षा असलेली.</p>
<p>दोघींच्या सहवासात शांतपणे जीवन जगणारा तो पोटापुरते इच्छिणारा, महत्त्वाकांक्षी नसणारा.</p>
<p>एके दिवशी त्याला मोठ्या घरचे बोलावणे येते. त्यांच्या तरुण मुलीला गाणे शिकवायचे असते. तरुण मुलीची आईच चौकशी करत असते, कमी पगारात ती गाण्याची शिकवणी ठरवून टाकते. शिकवणी सुरू होते, तरुण मुलगी आनंदाने शिकत असते.</p>
<p>गाणे शिकणारी आणि ते शिकवणारा - दोघे गाण्याची उत्फुल्ल मौज अनुभवतात . </p>
<p>निसर्गाच्या सान्निध्यात प्रफुल्लित मनांच्या सहवासाने आयुष्याला रंगत येत जाते.</p>
<p>एका संगीतस्पर्धेत तरुण मुलीला भाग घेण्यास शिक्षक प्रवृत्त करतो. तरुण मुलीचे ते स्वप्न नसते. तिला त्याच्याशी लग्न करून संसार थाटायचा असतो, त्याच्या प्रेमात न्हाऊन निघायचे असते.</p>
<p>त्याचे मत - तिने चांगली गायिका व्हावे , तिची प्रतिभा फुलवावी ... लग्न व संसार होईलच नंतर.</p>
<p>नियती वेगळेच घडवते . तरुण मुलगी गायनस्पर्धा जिंकते . </p>
<p>कालांतराने ती प्रसिद्ध गायिका होते . मुंबईला उच्च वर्तुळात वावरायला लागते . </p>
<p>तो पुलावर तिची वाट पाहत असतो . त्यांची भेट होत नाही . तिची आई त्यांना भेटू देत नाही.</p>
<p>दरम्यान तो रियाज करत रात्रीच्या नीरव एकांतात निसर्गाच्या जवळिकीत समाधान शोधत असतो . त्याचा रियाज त्याच्या नकळत आसुसून ऐकत राहणारी एक समवयस्क परित्यक्ता त्याला नकळत अचानक त्याला सामोरी येते. त्याचे कौतुक करते. ती दोघांचे प्रेम जाणून असते. त्याच्या मनात उचंबळून आलेली प्रीती तिच्यातल्या अभिसारिकेला भिडते. दोघे एकमेकांचे दुःख वाटून घेताना जवळचे सुख देऊ करतात. परंतु हा क्षणिक आनंद टिकणारा नाही, आपण हतबल आहोत हे त्यांना कळून चुकते.</p>
<p>आठेक वर्षांनी बहिणीचे लग्न ठरवायचे असते. त्याच सुमारास तिचा कार्यक्रम गावात ठरवला जातो. मित्रांकडून कार्यक्रमाची तपशीलवार माहिती मिळते. तिच्या भेटीची आशा त्याच्या मनातून मावळत जाते. जाणूनबुजून कार्यक्रमाचीच तारीख तो बहिणीच्या लग्नासाठी ठरवून टाकतो. लग्नविधी पार पडतात. त्याच मध्यरात्री तो निकराच्या आवेगाने तिला भेटायला कार्यक्रमस्थळी जाऊन पोचतो. ती गाणे संपता संपता त्याला पाहते. दोघे एका ठरावीक अंतरावरूनच भेटतात. अश्रुभरल्या डोळ्यांनी एकमेकांना पाहत राहतात. पण घट्ट मिठीत जवळ घेऊ शकत नाहीत. तो अपराधी मनाने बोलत असतो. ती फक्त ऐकत राहते. आता वेळ गेली, एकत्र येऊ शकत नाही, एवढेच ती म्हणते.</p>
<p>तो घरी परततो. आई ओळखून घेते. बहिणीची पाठवणी होते. तो आतल्या आत उन्मळून पडलेला असतो ! परंतु भवतालची हिरवाई , डोंगरदऱ्या, उतरणीवरची कौलारू घरे, दाट वनराजी, त्यातून झिरपणारा सूर्यप्रकाश, पाऊस, गाणे आणि तिच्या आठवणी यांचे त्याच्या आयुष्याशी असलेले अतूट नाते मात्र कधीही संपणार नसते !! ती कितीही दूर गेली तरीही!</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/nadini.jpg" alt="nadini"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मनोरंजन</category>
                                            <category>लेख</category>
                                            <category>बॉलिवूड</category>
                                            <category>अभिनेता</category>
                                            <category>अभिनेत्री</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5300/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5300/lekh</guid>
                <pubDate>Mon, 18 Jul 2022 16:32:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/music-teacher_02.jpg"                         length="186002"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“तेरी आँखों के दिये...”</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>धर्म व त्यातील स्पृश्य-अस्पृश्य संघर्षावर बेतलेला बिमल’दांचा ‘सुजाता’ तर मी कितीदा पाहिलाय. त्यामध्ये नुतनने साकारलेली सुजाता आणि तिचं ते माणसातल्या माणुसकीला हादरवून सोडणारं सावळं रुप, अजूनही माझ्या रोमरोमांत सरसरतं! त्यातलं अधिरच्या (सुनील दत्त) ओठी तलतच्या मुलायम स्वरातलं, ‘जलते है जिसके लिये...’  हे गाणंही मी खूपदा ऐकलं बघितलंय. बिमल’दांनी इतक्या तरलतेनं आणि हळुवारपणानं ते टिपलंय की, एक अख्खी कविताच होवून ते काळजावर उतरत राहातं.</p>
<p>दिलीपकुमार अन वैजयंतीमालाचा ‘मधुमती’ हा चित्रपट मी; औरंगाबाद कॉलेजला असताना १९७८-७९च्या दरम्यान केव्हातरी माझ्या पाहाण्यात आला होता. तेव्हा तिथल्या चित्रपटगृहांना मॅटिनी-शोला जुने चित्रपट लागायचे. तारुण्यातले कॉलेजचे ते फुलपंखी दिवस आणि इंद्रधनू स्वप्नांच्या रात्री, चित्रपटातील नायक-नायिकांमध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/5295/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-07/bimal-roy.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>धर्म व त्यातील स्पृश्य-अस्पृश्य संघर्षावर बेतलेला बिमल’दांचा ‘सुजाता’ तर मी कितीदा पाहिलाय. त्यामध्ये नुतनने साकारलेली सुजाता आणि तिचं ते माणसातल्या माणुसकीला हादरवून सोडणारं सावळं रुप, अजूनही माझ्या रोमरोमांत सरसरतं! त्यातलं अधिरच्या (सुनील दत्त) ओठी तलतच्या मुलायम स्वरातलं, ‘जलते है जिसके लिये...’  हे गाणंही मी खूपदा ऐकलं बघितलंय. बिमल’दांनी इतक्या तरलतेनं आणि हळुवारपणानं ते टिपलंय की, एक अख्खी कविताच होवून ते काळजावर उतरत राहातं.</p>
<p>दिलीपकुमार अन वैजयंतीमालाचा ‘मधुमती’ हा चित्रपट मी; औरंगाबाद कॉलेजला असताना १९७८-७९च्या दरम्यान केव्हातरी माझ्या पाहाण्यात आला होता. तेव्हा तिथल्या चित्रपटगृहांना मॅटिनी-शोला जुने चित्रपट लागायचे. तारुण्यातले कॉलेजचे ते फुलपंखी दिवस आणि इंद्रधनू स्वप्नांच्या रात्री, चित्रपटातील नायक-नायिकांमध्ये स्वतःला शोधण्यात जायच्या. आणि या गोष्टीला मीही अपवाद नव्हतो. ‘मधुमती’मधील मधु (वैजयंतीमाला) त्यावेळी मला खूपच भावली होती; पण चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा मला तितकीशी आकळली नव्हती. तेव्हाच्या त्या वयाची माझी प्रगल्भता त्यासाठी कमी पडली. मात्र, पुढे जेव्हा खोलात जावून विचार करायची सवय जडली आणि मी स्वतः लिहू सुद्धा लागलो त्यावेळी; मला आवडलेले, काळजात घर करुन असलेले जुने अभिजात चित्रपट पहायचा मग मी सपाटाच लावला. त्या सपाट्यात बिमल रॉयचे एकेक मास्टर-पीस ‘परिणिता’ (१९५४), ‘बिराज बहू’, ‘परख’, ‘काबुलीवाला’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’ असे चाकोरीबाहेरचे चित्रपट माझ्या हाती लागत गेले आणि पडद्यावर सुद्धा कधी न पाहिलेल्या बिमल’दांच्या मी प्रेमातच पडलो.</p>
<p>बिमल रॉय... निर्देशक, निर्माते आणि लेखक! अवघी चित्रपटसृष्टी ज्यांना बिमल’दा या नावानेच ओळखते. नेहमीचे राज रस्ते सोडून स्वतःची नवी वाट तयार करणारे हटके चित्रपट त्यांनी निर्मिले. त्यांचे चित्रपट म्हणजे शब्द, कला आणि भाव-भावनांच्या माध्यमातून समाजाच्या दांभिकतेवर ओढलेले चाबकाचे फाटकारेच होते.</p>
<p>१२ जुलै १९०९ला तत्कालीन पूर्व बंगालमधील सुत्रपूर ढाका (ढाका आता बांगला देशाचा भाग आहे.) येथील एका श्रीमंत बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील खूप मोट्ठे जमीनदार होते. पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इस्टेट मॅनेजरने त्यांना फसवून सर्व काही लुटून नेलं. या धक्क्यातून स्वतःला सावरत आपल्या आई आणि धाकट्या भावासह ते कलकत्याला निघून आले. कलकत्याला ते आले तेव्हा धैर्य आणि जागतेपणी पाहिलेली आपली स्वप्नं तेवढी त्यांच्यासोबत होती. हळुहळु परिस्थिती सुधारली तसे ते निर्देशक, अभिनेते आणि पटकथा लेखक प्रोथमेश चंद्र बरूआ यांचे सहाय्यक कॅमेरामन म्हणून कलकत्ता इंडस्ट्रीत काम करु लागले. त्यानंतर पुढे कलकत्त्यातील प्रसिद्ध ‘न्यू थियेटर’मध्ये निर्देशक, सिने छायाचित्रकार आणि पटकथा लेखक नितीन बोस यांचे देखील सहाय्यक कॅमेरामन म्हणून त्यांनी काम पाहिलं. पुढे लाइटिंग आणि कॉम्पोझिशनमध्ये कमांड मिळवून सिनेसृष्टीत अल्पावधीतच ते नावारुपास आले.  </p>
<p>एकदा असंच, के. एल. सैगलचा ‘देवदास’ (१९३६) बनविण्यात प्रोथमेश बरूआ मग्न असताना, बिमल’दांना ‘देवदास’चं कथानक इतकं काही आवडलं की, मनात त्यांनी ठरवूनच टाकलं - पुढे, आपणही कधी असे मोठे निर्देशक बनू तेव्हा ‘देवदास’ पुन्हा आपल्या पद्धतीने बनवू! आणि खरंच, काही वर्षातच आपली जिद्द, मेहनत व कर्तबगारीने ते लवकरच एक निर्देशक म्हणून काम करु लागले. मात्र सुरवातीची काही वर्ष त्यांनी बंगाली चित्रपटांवर लक्ष केंद्रित केलं. ‘उदयर पाथेय’ (१९४४) हा वर्णभेदाविरोधात निर्मिलेला त्यांचा पहिला बंगाली चित्रपट! या चित्रपटाने सिनेसृष्टीतील बिमल’दांचं स्थान मजबूत केलं. दुसरे महायुद्ध आणि फाळणी यामुळे बंगाली सिनेमांचा खूप मोठा ऱ्हास झाला होता.  </p>
<p>लवकरच बिमल’दांच्या लक्षात आलं की, कलकत्त्यातील चित्रपटसृष्टी ढासळत आलीये. तिथले निर्देशक, निर्माते, अभिनेते सगळेच मुंबईला स्थलांतरित होतायेत. मग काय, ‘न्यू थिएटर्स’चा शेवटचा चित्रपट ‘अंजनगढ’ करुन बिमल’दा सुद्धा आपल्या टीमसह मुंबईला निघून आले. त्यांच्या या टीममध्ये संपादक ऋषीकेश मुखर्जीसह पटकथा लेखक नबेंदू घोष, सहाय्यक दिग्दर्शक असितसेन, चित्रपट लेखक कमल बोस आणि गीतकार, संगीतकार कवी सलील चौधरी या दिग्गजांचा समावेश होता.        </p>
<p>मुंबईत आल्यानंतरचा ‘बॉम्बे टॉकीज’साठी निर्मिलेला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘माँ’. त्यानंतरचा चित्रपट होता ‘बाप बेटी’! १९५३ला मात्र, त्यांनी स्वतःची प्रोडक्शन संस्था ‘बिमल रॉय प्रोडक्शन’ ही स्थापन केली. आणि त्या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट होता १९५३चा ‘दो बिघा जमीन’. ज्या मध्ये सावकाराच्या कर्जाच्या जोखडात मान अडकलेल्या एका शेतकऱ्याची, शंभूची भूमिका बलराज सहानी सारख्या कसलेल्या अभिनेत्याने अभिनीत केली होती. बिमल’दाने या चित्रपटाला इतक्या अप्रतिम रितीने सादर केलं की, ‘दो बिघा जमीन’ने इतिहास रचला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या दोन फिल्मफेअर पुरस्कारासह राष्ट्रीय पुरस्कारावर आणि आंतरराष्ट्रीय कान्स पुरस्कारावरही या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली. हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याने यूके, चीन, कार्लोवी व्हेरी, कान्स, यूएसएसआर, व्हेनिस आणि मेलबर्नमध्ये प्रशंसाच नाही तर पुरस्कारही मिळवले. आता पर्यंतच्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांपैकी ‘दो बिघा जमीन’ हा एक मानला जातो.    </p>
<p>पुढे, १९५५ला आपल्या मनातला ‘देवदास’ साकारण्याची इच्छा बिमल’दा यांना पूर्ण करता आली. दिलीप कुमार, सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला या त्रयींचा ‘देवदास’ (१९५५) आजही पारो आणि चंद्रमुखीच्या अभिनयासाठी याद केला जातो. ‘देवदास’च्या पारोची भुमिका मीना कुमारीने करावी अशी बिमल’दांची इच्छा होती, पण काही कारणांमुळे ती भुमिका पुढे सुचित्रा सेनने साकारली होती. कवी आणि गीतकार गुलज़ार सुद्धा बिमल’दांचे चहेते शिष्य होते. त्यांनाही बिमल’दांसारखं चित्रपट निर्देशक व्हायचं होतं. पण ते कवी, लेखक आणि गीतकार झाले.</p>
<p>भारतीयच नाही तर जागतिक चित्रपटांवरही बिमल’दांचा प्रभाव होता.  फार कमी लोकांना माहितीये की ब्रिटिश सरकारसाठी त्यांनी दोन डॉक्युमेंट्रीज बनविल्या   होत्या. १९५६ला गौतम बुद्ध यांच्यावर माहितीपट बनविला होता. ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात या माहितीपटाचं खूप कौतुकही झालं होतं. पुनर्जन्माच्या कथानकावर बेतलेला त्यांचा ‘मधुमती’ हा एक माईलस्टोन चित्रपट! त्या चित्रपटाची प्रेरणा घेवून नंतरही काही चित्रपट आले ‘द रेइनकारनेशन ऑफ पीटर प्राऊड’ (१९७५), ‘कर्ज’ (१९८०), कन्नड चित्रपट ‘युगपुरुष’ (१९८९), तामिळ चित्रपट ‘एनाकन येरुवन’ (१९८४), आणि २००८ साली आलेला ‘ओम शांती ओम’. रोमँटिक-रिअलिस्ट मेलोड्रामासाठी बिमल’दा प्रसिद्ध होते. मनोरंजनासोबत प्रबोधनाकडेही त्यांनी लक्ष दिलं. १९५९मध्ये पहिल्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जुरीच्या सदस्यांमध्ये त्यांचाही सहभाग होता.</p>
<p>बिमल’दांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं म्हटलं तर कोणत्या चित्रपटाबद्दल बोलावं असा प्रश्न पडतो. सगळेच तर लाजवाब, तेवढेच मनन, चिंतन करायला लावणारे  होते! धर्म व त्यातील स्पृश्य-अस्पृश्य संघर्षावर बेतलेला त्यांचा ‘सुजाता’ तर मी कितीदा पाहिलाय. त्यामध्ये नुतनने साकारलेली सुजाता आणि तिचं ते माणसातल्या माणुसकीला हादरवून सोडणारं सावळं रुप, अजूनही माझ्या रोमरोमांत सरसरतं! त्यातलं अधिरच्या (सुनील दत्त) ओठी तलतच्या मुलायम स्वरातलं, ‘जलते है जिसके लिये...’  हे गाणंही मी खूपदा ऐकलं बघितलंय. बिमल’दांनी इतक्या तरलतेनं आणि हळुवारपणानं ते टिपलंय की, एक अख्खी कविताच होवून ते काळजावर उतरत राहातं! सुजाताच्या डोळ्यातले भावच नाही तर तिच्या हनुवटीवरचा तीळही मग, तिच्या हृदयीच्या उत्कट तरंगांबद्दल बोलू पाहतो. आसवांच्या लड्यांमध्ये दबलेले तिचे ते अबोल हुंकार, मनातलं रुदन अधिरला ऐकायला जावू नये म्हणून, ते; साडीचा पदर तोंडात दाबून धरणं... हे फक्त फक्त बिमल’दांमधला संवेदनशील फनकारच टिपू शकतो.</p>
<p>‘जब तलक ना ये तेरे रस के भरे होठों से मिले</p>
<p>यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी जुल्फों के तले...’</p>
<p>काय ते मजरूहचे आशय संपन्न शब्द... बस्स, गाणं ऐकत राहावं आणि बघत राहावं वाटतं!</p>
<p>‘बंदिनी’ मधल्या ‘ओ रे माझी...’ या गाण्याच्या वेळीची कल्याणीची (नुतन) द्विधा मन:स्थिती असेल वा, ‘परख’मधलं ‘ओ सजना...’ बिमल’दांची  एकेक फ्रेम म्हणजे खजिना आहे सृजनाच्या अविष्काराचा ! शैलेन्द्रने सुद्धा ‘ओ सजना...’ या गाण्यात,</p>
<p>‘तुमको पुकारे मेरे मन का पपिहरा</p>
<p>मीठी मीठी अगनी में जले मोरा जियरा...’ सारखी सुंदर शब्दरचना प्रसवलीये. त्यामुळेच की काय; रस की फुहार झाल्यासारखाच लताजींचा आवाज लागलाय. कृष्ण-धवल छायाचित्रण कसं असावं याचा जणू मापदंडच आहे हे गाणं! सजनाच्या आठवणींनी दाराच्या उंबऱ्यात उभी ती सीमा (साधना)... अगदी साधी-सोज्वळ आणि तेवढीच मनमोहक! पावसाच्या फ़ुआरीतून ओठांवर आलेले लताजींचे ते स्वर, ती राजस झोपडी, झोपडीच्या पत्र्यावरुन टपटपणाऱ्या त्या पागोळ्या, पानांवरचे लकाकणारे दव, आणि धरित्रीला चुंबिणारे ताटीच्या झरोख्यातून टिपलेले ते पावसाचे चांदण थेंब...  व्वा, कल्पकतेची भरारी म्हणतात ती ही!</p>
<p>त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मधुबाला ही, ‘बिराज बहू’ या चित्रपटातील मुख्य नायिकेची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक होती. यासाठी तिने अनेकवेळा बिमल रॉय यांच्या कार्यालयाला भेटही दिली मात्र, तिचं मानधन आपल्याला परवडणार नाही या विचारांनी बिमलदा यांनी तिच्याऐवजी कामिनी कौशलला कास्ट केले. आपल्या महागड्या फीमुळे आपण भूमिका गमावली हे समजल्यावर मधुबाला म्हणालेली - ‘बिराज बहू’च्या भुमिकेसाठी मला एक रुपया मानधन मिळालं असतं तरी चाललं असतं. कित्ती, काय अन कशा कशाबद्दल बोलू? बिमल’दा म्हणजे सृजनांचा अथाह आविष्कार आहे असं मी म्हटलं ते यासाठीच! मग, अनुपम अशा त्या चित्रपटांचं विस्मरण तरी कसं शक्य आहे?</p>
<p>‘दो बिघा जमीन’ (१९५४), ‘बिराज बहू’ (१९५५), आणि ‘देवदास’ (१९५६) या चित्रपटांसाठी सलग तीन वर्षे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणाऱ्या, आणि नवीन पिढीसाठी प्रेरणास्त्रोत बनून गेलेल्या बिमल’दांच्या पत्नीचं नाव मनोबिना रॉय होतं. बनारसमध्ये लग्न झालेल्या या दाम्पत्याला चार मुलं होती. निर्देशक म्हणून बावीस, आणि निर्माते म्हणून तेवीस चित्रपटांवर त्यांनी आपल्या ‘बिमल रॉय प्रॉडक्शन’ची मोहोर सोडली.</p>
<p>आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अकरा फिल्मफेअर, दोन राष्ट्रीय, आणि कान्स फेस्टिवलचं आंतरराष्ट्रीय पारितोषिक, हे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. मात्र, एवढं असूनही या फनकाराचे काही चित्रपट व्यवसायिक दृष्ट्या पूर्णतः यशस्वी झाले नाही हे एक कटू वास्तव आहे. वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी ०८ जानेवारी १९६६ला  फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झालेल्या या महान व्यक्तिमत्वाची ओळख, खरं तर माझ्या शब्दांपलीकडली आहे. ‘परिणीता’ (१९५३), ‘बेनाजिर’, ‘यहुदी’, ‘प्रेमपत्र’, उसने कहाँ था’ हे त्यांचे रसिक चाहत्यांना भावलेले आणखी काही चित्रपट!      </p>
<p>बिमल’दा म्हटलं की आता डोळ्यांसमोर येत राहातील त्यांच्या चित्रपटातल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखा, आणि कानात नित्य वाजत राहातील मजरूहच्या लेखणीतून उतरलेली ‘सुजाता’साठीची ती तरल स्पंदनं, जी आजही कितीतरी काळजात या गाण्याच्या रुपात चिरंजीव झालेली आहे -</p>
<p>‘जलते है जिसके लिये, तेरी आँखों के दिये</p>
<p>ढूँढ लाया हूँ वोही, गीत मैं तेरे लिये...’</p>
<p> (संदर्भ: विकिपीडिया, यु-ट्युब, बिमल रॉय मेमोरियल आणि तबस्सुम टॉकीज.)  </p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/mandewala.jpg" alt="mandewala"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मनोरंजन</category>
                                            <category>बॉलिवूड</category>
                                            <category>अभिनेता</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/5295/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/5295/lekh</guid>
                <pubDate>Mon, 18 Jul 2022 16:25:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-07/bimal-roy.jpg"                         length="1923950"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>200 हल्ला हो (दलित स्त्रीमधला अंगार), जीवनसंध्या (वयस्करांचे प्रश्न)</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>सार्थक दासगुप्ता आणि त्यांच्या बंगाली टीमने वरील चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन यांसह निर्मिती केली आहे. ती एका विशिष्ट विचारानेच केली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा, इतकी ती प्रत्ययकारी झाली आहे. हिंदी व मराठी या दोन भाषांत आपल्याला तो पाहायला मिळू शकतो. मराठीपेक्षा हिंदी संवाद व डबिंग यांचा दर्जा साहजिकच उत्तम झाला आहे. अमोल पालेकरांनी यात एक महत्त्वाची भूमिका केली असून ती त्यांनी अप्रतिमरीत्या वठवली आहे, हेही सिनेमा पाहण्यासाठी एक कारण नक्कीच आहे. पार्श्वसंगीत व एकदोन गाणीही उल्लेखनीय वाटली.</p>
<p>आपल्या या देशात जातीधर्मांमुळे आणि गरिबीमुळे सामान्य जनतेच्या वाट्याला जे काही जिणे येते, ते अतिशय दाहक व भेदक वास्तव</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4912/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-06/nadini2.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>सार्थक दासगुप्ता आणि त्यांच्या बंगाली टीमने वरील चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन यांसह निर्मिती केली आहे. ती एका विशिष्ट विचारानेच केली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा, इतकी ती प्रत्ययकारी झाली आहे. हिंदी व मराठी या दोन भाषांत आपल्याला तो पाहायला मिळू शकतो. मराठीपेक्षा हिंदी संवाद व डबिंग यांचा दर्जा साहजिकच उत्तम झाला आहे. अमोल पालेकरांनी यात एक महत्त्वाची भूमिका केली असून ती त्यांनी अप्रतिमरीत्या वठवली आहे, हेही सिनेमा पाहण्यासाठी एक कारण नक्कीच आहे. पार्श्वसंगीत व एकदोन गाणीही उल्लेखनीय वाटली.</p>
<p>आपल्या या देशात जातीधर्मांमुळे आणि गरिबीमुळे सामान्य जनतेच्या वाट्याला जे काही जिणे येते, ते अतिशय दाहक व भेदक वास्तव आहे. ती परिस्थिती बदलणे तर सोडाच, परंतु त्यात आणखी वाईट भर पडूनच आयुष्य जगावे लागते हेच दलितांच्या नशिबी असते. त्यात दलित स्त्रियांचे हाल तर कुत्रादेखील खाणार नाही, एवढे ते हृदयद्रावक आणि सहनशक्तीच्या पलीकडचे आयुष्य झालेले असते.</p>
<p>जनतेसाठी काम करण्याची शपथ घेणारे राजकारणी, दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी सरकारी संस्था चालवणारे समाजकारणी व जनतेचे रक्षक असणारे पोलीसदल यांनीच जर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जनतेला पिडायचे ठरवले तर काय होते ते आपल्याला 200 हल्ला हो या सिनेमात पाहायला मिळते. रिंकू राजगुरू या अभिनेत्रीचे भेदक डोळे अंगार ओकत असताना आपण थरारतो. तिने आशा सुर्वे परिणामकारक केली आहे. सुषमा देशपांडे यांनी ताराबाई कांबळे या अन्यायग्रस्त दलित महिलेच्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे. उपेंद्र लिमये नेहमीप्रमाणेच राकट व निर्दय इन्स्पेक्टर चांगला उभा करतात. आर्टिकल 15 यानंतर तसाच प्रभावी ठरलेला हा चित्रपट जरूर पाहावा असाच आहे, Zee 5 वर पाहू शकता.</p>
<p>प्राइम ॲमेझॉनवर पाहिलेला जीवनसंध्या हा मराठी चित्रपट मला फार अपील झाला. त्याची पटकथा आणि कलाकार यांमुळे तो पकड घेतो. अशोक सराफला आपण विनोदी शिक्का मारलेला आहे, पण यात त्याचा सर्वोकृष्ट अभिनयाने रंगवलेला ज्येष्ठ नागरिक खूप भावतो. किशोरी शहाणे, समीर धर्माधिकारी यांचीही अभिनयाची साथ चांगली आहे.</p>
<p>आपल्या आयुष्यात वृद्धत्वीही इतके वेगवेगळे प्रसंग येत असतात की त्यांना तोंड देताना साथीला समंजस जोडीदार नसेल तर एकटा माणूस एकाकी होऊन जातो. तसे न होता त्याने उतारवयात नवा जोडीदार शोधला तर मुलामुलींना ते मुळीच पटत नाही. कारण लग्न फक्त तरुणवयातच करायचे असते, असा त्यांचा (गैर)समज असतो. या सिनेमातले ज्येष्ठ नायक व नायिका स्वतःची इच्छा थांबवू शकत नाहीत व मुलामुलींच्या मनाविरुद्ध लग्न करून ते स्वतंत्र संसार सुरू करतात.</p>
<p>पुढे प्रकृतीच्या अडचणी येतात, तेव्हा मुलाला सांगणे त्यांना भागच पडते. तरीही मुलगा अट घालतो, ती मान्य करून अखेर दोघे वेगळे होतात. अगदी शेवटी - वडिलांच्या मृत्युसमयी - त्यांच्या 'उतारवयात असलेली साथीदाराच्या गरजेची' खरी जाणीव मुलाला होते. हा धडा मुलं फारच उशिरा शिकतात. म्हाताऱ्या आई/वडिलांचे मन त्यांना कधी समजलेलेच नसते, ते तसा प्रयत्नही करत नाहीत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या पाहण्यात येत आहेत. अशा मुलांनी हा सिनेमा अगदी जरूर पाहायला हवा.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मनोरंजन</category>
                                            <category>बॉलिवूड</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4912/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4912/lekh</guid>
                <pubDate>Mon, 27 Jun 2022 15:56:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/nadini2.jpg"                         length="220093"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        