<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/author/4/aadhunik-kesari" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>Aadhunik Kesari - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/author/4/rss</link>
                <description>Aadhunik Kesari RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p><strong>बाळासाहेब भोसले</strong></p>
<p><strong>​सिंदखेडराजा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ, सावरगांव माळ (ता. सिंदखेडराजा) येथे शासनाच्या वतीने 'स्मार्ट सिटी' (नवनगर) प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी विविध बैठकाही घेण्यात आल्या होत्या. अखेर डॉ. खेडेकर यांच्या या अथक प्रयत्नांना मोठे यश आले आहे.</strong></p>
<p>​डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगर रचना संचालक श्रीमती सुलेखाताई वैजापूरकर, नगरविकास सहसचिव, तसेच नगरविकास अवर सचिव श्री. प्रसाद शिंदे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17201/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260624_182223.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p><strong>बाळासाहेब भोसले</strong></p>
<p><strong>​सिंदखेडराजा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ, सावरगांव माळ (ता. सिंदखेडराजा) येथे शासनाच्या वतीने 'स्मार्ट सिटी' (नवनगर) प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी विविध बैठकाही घेण्यात आल्या होत्या. अखेर डॉ. खेडेकर यांच्या या अथक प्रयत्नांना मोठे यश आले आहे.</strong></p>
<p>​डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगर रचना संचालक श्रीमती सुलेखाताई वैजापूरकर, नगरविकास सहसचिव, तसेच नगरविकास अवर सचिव श्री. प्रसाद शिंदे यांची देखील उपस्थिती होती. या भेटीदरम्यान सावरगांव माळ - नजीराबाद स्मार्ट सिटी (नवनगर) चे अधिकृत नोटिफिकेशन (अधिसूचना) काढण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे.<br />​MSRDC कडे सादर होणार पुढील प्रस्ताव शासनातर्फे हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर, सदरचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी एम.डी., एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) कडे सादर केला जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे. ​इंटरचेंजपासून ५ किमी परिसरात उभारणी<br />प्रस्तावित सावरगांव माळ - नजीराबाद स्मार्ट सिटी ही सिंदखेडराजा इंटरचेंजपासून अवघ्या ५ किलोमीटरच्या परिसरात साकारली जाणार आहे. या प्रकल्पाची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती स्वतः डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे सिंदखेडराजा परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17201/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17201/maha</guid>
                <pubDate>Wed, 24 Jun 2026 21:49:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260624_182223.jpg"                         length="73703"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>मुंबई : दि.२३ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील अधिवेशनात सरकारच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता न झाल्याने आ. मुनगंटीवार यांनी हक्कभंगाची सूचना देत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. </strong></p>
<p>सभागृहात बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, ५ मार्च २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबतचा अशासकीय ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने हा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17196/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260624-wa0044.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>मुंबई : दि.२३ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील अधिवेशनात सरकारच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता न झाल्याने आ. मुनगंटीवार यांनी हक्कभंगाची सूचना देत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. </strong></p>
<p>सभागृहात बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, ५ मार्च २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबतचा अशासकीय ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने हा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात पाठपुरावा करताना काही अधिकाऱ्यांनी प्रतिकूल शेरे नोंदविल्याची माहिती समोर आल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. "ज्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी अर्पण केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत प्रशासकीय स्तरावर नकारात्मक भूमिका घेतली जात असेल, तर हा अत्यंत गंभीर विषय आहे," असे आ.मुनगंटीवार म्हणाले.</p>
<p>महाराष्ट्र विधानसभेने व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी केवळ ठराव पाठवायचा आहे. तरीही तो रखडत असेल, तर त्यामागील कारणांचा शोध घेऊन जबाबदारी निश्चित झाली पाहिजे," असेही आ.मुनगंटीवार  स्पष्ट केले. हक्कभंगाच्या मुद्द्यावर बोलताना आ.मुनगंटीवार यांनी रोखठोक भूमिका घेतली. "मंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास हक्कभंग प्रस्ताव मंत्र्यांविरोधात दिला जातो. मात्र अनेकदा फाईल अडविण्याचे किंवा विलंबाचे कारण प्रशासकीय पातळीवर असते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही हक्कभंगाची कार्यवाही करण्याची तरतूद करण्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.</p>
<p>राज्य शासन अधिकाऱ्यांच्या वेतनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. त्यामुळे राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाशी संबंधित विषयांमध्ये प्रशासनाने सकारात्मक, संवेदनशील आणि जबाबदार भूमिका घेणे अपेक्षित असल्याचेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न प्रदान करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातही व्यक्त केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा विषय आश्वासन समितीकडे पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच आश्वासनाच्या पूर्ततेत अनावश्यक दिरंगाई झाल्यास अध्यक्ष म्हणून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न प्रदान करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या तेजस्वी इतिहासाला आणि राष्ट्रभक्तीच्या अखंड परंपरेला अभिवादन करण्यासारखे आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेने व्यक्त केलेल्या जनभावनांचा सन्मान राखत शासनाने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा," अशी ठाम मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17196/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17196/maha</guid>
                <pubDate>Wed, 24 Jun 2026 10:04:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260624-wa0044.jpg"                         length="90736"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p><strong>भोकर :  भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने  अंगणवाडी सेविकेचा तर बसखाली आल्याने एका यूवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी तीनच्या दरम्यान भोकर–म्हैसा रस्त्यावर घडली.</strong></p>
<p>या बाबत मिळालेल्या माहितीनुसार खडकी( ता भोकर)येथील अंगणवाडी कार्यकर्ता अर्चना गोविंद शिंदे (वय ३१) या आपली स्कुटी क्रमांक (एम.एम.२६,सी.डब्ल्यु १९६१) जात असताना भोकर–म्हैसा मार्गावरील नागपूरपाटी ते चिंचाळापाटी दरम्यान कार क्रमांक (एम.एच.४१ ए.टी. १८१९ ) जोराची धडक देऊन फरकटत  नेल्याने अर्चना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुसऱ्या घटनेत याच मार्गावरील पोमनाळा–सोनारी गावाच्या दरम्यान मन्मथ शंकर कापसे( रा.पळसा ता. हदगाव)हा युवक  दुचाकी क्रमांक (एम.एच.२६ ए.एल.५४९३) भरधाव वेगात जाताना बस क्रमांक (एम.एच.१३ सी.यु.६८७३)</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17194/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260623_203758.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p><strong>भोकर :  भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने  अंगणवाडी सेविकेचा तर बसखाली आल्याने एका यूवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी तीनच्या दरम्यान भोकर–म्हैसा रस्त्यावर घडली.</strong></p>
<p>या बाबत मिळालेल्या माहितीनुसार खडकी( ता भोकर)येथील अंगणवाडी कार्यकर्ता अर्चना गोविंद शिंदे (वय ३१) या आपली स्कुटी क्रमांक (एम.एम.२६,सी.डब्ल्यु १९६१) जात असताना भोकर–म्हैसा मार्गावरील नागपूरपाटी ते चिंचाळापाटी दरम्यान कार क्रमांक (एम.एच.४१ ए.टी. १८१९ ) जोराची धडक देऊन फरकटत  नेल्याने अर्चना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुसऱ्या घटनेत याच मार्गावरील पोमनाळा–सोनारी गावाच्या दरम्यान मन्मथ शंकर कापसे( रा.पळसा ता. हदगाव)हा युवक  दुचाकी क्रमांक (एम.एच.२६ ए.एल.५४९३) भरधाव वेगात जाताना बस क्रमांक (एम.एच.१३ सी.यु.६८७३) च्या खाली आल्याने मन्मथ कापसेचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17194/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17194/maha</guid>
                <pubDate>Tue, 23 Jun 2026 20:41:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260623_203758.jpg"                         length="150157"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व वाढती महागाई यासह असंख्य प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आसुड मोर्चा काढला असून या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रा रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या नवा मोंढा येथील पक्ष कार्यालयात नुतन जिल्हाध्यक्ष खासदार प्रा रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नवा मोंढा येथील छोटेखानी जाहिर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर घणाघाती</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17192/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260623_181303.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व वाढती महागाई यासह असंख्य प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आसुड मोर्चा काढला असून या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रा रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या नवा मोंढा येथील पक्ष कार्यालयात नुतन जिल्हाध्यक्ष खासदार प्रा रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नवा मोंढा येथील छोटेखानी जाहिर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर घणाघाती टीका केली. </p>
<p>काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेच्या व्यासपीठावर ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ यशपाल भिंगे, प्रदेश सरचिटणीस अँड सुरेंद्र घोडजकर, डॉ श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण, माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, कार्याध्यक्ष महेश देशमुख, पप्पु कोंडेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. <br />नवा मोंढा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दळभद्री विचार सरणीमुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. देशात महागाई वाढली असून त्यांची झळ सामान्य माणसाला बसत आहे. देशात व राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार नसल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन सरकार विरोधात लढा उभारावा तसेच विविध प्रकारचे आंदोलन करून सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी खा. प्रा रविंद्र चव्हाण, माजी आमदार हनमंतराव पाटिल बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, माजी अध्यक्ष राजेश पावडे यांची समयोचित भाषणे झाली. </p>
<p>काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नुतन जिल्हाध्यक्ष खासदार प्रा रविंद्र, उतरचे जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना शुभेच्छा देत सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा सल्ला दिला. <br />नवा मोंढा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून आसुड मोर्चाला प्रारंभ झाला. या आसुड मोर्चात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हातात बॅनर घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते. हा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रा रविंद्र चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ यशपाल भिंगे, अँड सुरेंद्र घोडजकर, माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर, डॉ श्रावण रॅपनवाड, डॉ रेखा चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष महेश देशमुख, माजी शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार, रामदास पाटील सुमठानकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. <br />जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आसूडमोर्चा" द्वारे आपल्याकडे विविध मागण्या मांडत असून त्या पुढील प्रमाणे आहेत. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. शेतीसाठी आवश्यक खत व बियाण्यांचा तुटवडा, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किंमती, बेरोजगारी, शासकीय कार्यालयांतील दिरंगाई तसेच विविध योजनांच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे जनतेला मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील वारंवार निर्माण होणारा गोंधळ, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, वाढते शैक्षणिक शुल्क, प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि शिक्षित युवकांमधील वाढती बेरोजगारी यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तणावाखाली आहेत. शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी वर्ग देखील या अनिश्चितता, वाढत्या शैक्षणिक खर्च व रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे चितेत असून शासनाने या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.</p>
<p>त्यामुळे खालील मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्यासाठी आज रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानुषंगाने खालील मागण्या बाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. <br />काँग्रेस पक्षाच्या या मोर्चात माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सुरेश दादा गायकवाड, युवक काँग्रेस पक्षाचे बालाजी गाढे, अतुल पेदेवाड, नगरसेवक सत्यपाल सावंत, नगरसेवक मुन्ना अबास, एकनाथ मोरे, सुरेश हटकर, कार्याध्यक्ष महेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद गुंडले, सुरज शिंदे, गोविंद बाबा गौड, प्रताप देशमुख, शिवाजी पाटील, राजू बोळसेकर, ज्योती कदम श्वेता पाटील, ललिता कुंभार, परमेश्वर कते, जिल्हा प्रवक्ते बापुसाहेब पाटील, भगवानराव मनुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, मधुकर दिघे, सचिन टाले, संजय भोसीकर, व्यंकटराव मोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.</p>
<p>कांचनगिरे यांचा प्रवेश</p>
<p>सिडको येथील शिवसेनेचे कार्यकर्ते विनोद कांचनगिरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी कांचनगिरे हे काँग्रेस पक्षाचे सिडको विभागांचे प्रमुख होते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी विनोद कांचनगिरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारली. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17192/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17192/maha</guid>
                <pubDate>Tue, 23 Jun 2026 18:17:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260623_181303.jpg"                         length="533558"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>काँग्रेसचा आसूड मोर्चा दुसऱ्या क्रांतीची नांदी ठरेल : सपकाळ</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : नांदेड पॅटर्न म्हणजे काँग्रेसच्या विचारांचा, स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा पॅटर्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या धोरणाविरुद्ध लढा उभा करण्यासाठी, झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हा विशाल आसूड मोर्चा आहे.या मोर्चाच्या माध्यमातून दुसऱ्या क्रांतीची सुरुवात होईल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शासनाला दिला. मंगळवारी दुपारी जिल्हा व शहर काँग्रेस काँग्रेस कार्यालयातून या आसूड मोर्चाची सुरुवात झाली. तत्पूर्वी मोर्चाला संबोधित करताना सकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर घनाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाहीत, शेतकऱ्यांना खोटे आश्वासने देऊन बड्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17190/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260623_180644.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : नांदेड पॅटर्न म्हणजे काँग्रेसच्या विचारांचा, स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा पॅटर्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या धोरणाविरुद्ध लढा उभा करण्यासाठी, झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हा विशाल आसूड मोर्चा आहे.या मोर्चाच्या माध्यमातून दुसऱ्या क्रांतीची सुरुवात होईल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शासनाला दिला. मंगळवारी दुपारी जिल्हा व शहर काँग्रेस काँग्रेस कार्यालयातून या आसूड मोर्चाची सुरुवात झाली. तत्पूर्वी मोर्चाला संबोधित करताना सकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर घनाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाहीत, शेतकऱ्यांना खोटे आश्वासने देऊन बड्या उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते.परंतु देशात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शेतकऱ्यांंना कर्जमाफी दिली जात नाही, अशी सडकून टीका सपकाळ यांनी केली. देशाचे अर्थशास्त्र उलट्या दिशेने फिरत आहे. पेट्रोल, डिझेल व सिलेंडर ्च्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. खाद्यतेल, सर्व प्रकारच्या डाळी महागल्या आहेत, असे असताना पंतप्रधान मोदी यांनी अदानी आणि अंबानींसह इतर बड्या उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. देशातील नागरिकांना बचत करण्याचे व विदेश यात्रा न करण्याचा सल्ला देणारे मोदी मात्र विदेश यात्रा काही सोडत नाहीत. असाही घनाघात त्यांनी केला.</p>
<p>यावेळी खासदार रवींद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार,हाणमंत पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, अब्दुल सत्तार श्रावण रेपनवाड, रेखा चव्हाण, रामदास पाटील, सुरेंद्र घोडजकर, महेश देशमुख, तिरुपती कोंडेकर बालाजी गाडे शंकर शिंदे एकनाथ मोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण, उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि शहराध्यक्ष अब्दुल गफार यांचा पदग्रहण सोहळा सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडला. देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे . भविष्यात "वन नेशन वन इलेक्शन,वन पार्टी' अशी वाटचाल सुरू आहे. काही मूठभर लोकांच्या हाती राजसत्ता आणि धर्म सत्ता देण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.</p>
<p> पुढील निवडणुका स्वबळावर  -खासदार रवींद्र चव्हाण</p>
<p>सत्ताधाऱ्यांकडून दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. नांदेडची अवस्था अत्यंत बकाल झाली असून नागरिकांना चार दिवस आड पाणी मिळत आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. विकासाचा पत्ता नाही. अशी टीका खासदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी मोठ्या मनाने उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीचे खासदार फुटले. आता यापुढे सर्व निवडणुका  स्वबळावर लढण्यास काँग्रेस सक्षम आहे, त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आम्हाला बळ द्यावे, अशी विनंती खासदार रवींद्र चव्हाण यांनी सपकाळ यांना केली.</p>
<p> मोर्चाने  लक्ष वेधले<br /> बैलगाड्या, ट्रॅक्टर्सवर बसून शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हातात आसूड घेऊन सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. हा मोर्चा मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.<br />काँग्रेसच्या आसूड मोर्चाने शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. या मोर्चात प्रचंड संख्येने शेतकरी कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17190/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17190/maha</guid>
                <pubDate>Tue, 23 Jun 2026 18:11:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260623_180644.jpg"                         length="459480"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>धानोरकरांचा बाऊन्सर वडेट्टीवरांनी हायकोर्टाद्वारे टोलवला..!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p>      <strong>श्याम हेडाऊ </strong></p>
<p><strong>चंद्रपूर : चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून धानोरकर वडेट्टीवार गटांची आपसात सुरू असलेली अंतर्गत कलहाची बाब आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचली असून हायकोर्टाने वडेट्टीवार यांच्या गटाचे राजेश अडुर यांना दिलासा देत धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांना गटनेता पदाकडे जाण्यासाठी ब्रेक लावलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर मनपा गटनेता प्रकरणात  महत्त्वपूर्ण आदेश देत नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वडेट्टीवार गटाच्या राजेश अड्डूर यांना मोठा दिलासा मिळाला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मात्र चांगला जोरदार धक्का बसला आहे.</strong></p>
<p>हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांनी धानोरकर यांचा बाउन्सर हायकोर्टामार्फत परस्पर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17188/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_210852.png" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p>   <strong>श्याम हेडाऊ </strong></p>
<p><strong>चंद्रपूर : चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून धानोरकर वडेट्टीवार गटांची आपसात सुरू असलेली अंतर्गत कलहाची बाब आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचली असून हायकोर्टाने वडेट्टीवार यांच्या गटाचे राजेश अडुर यांना दिलासा देत धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांना गटनेता पदाकडे जाण्यासाठी ब्रेक लावलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर मनपा गटनेता प्रकरणात  महत्त्वपूर्ण आदेश देत नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वडेट्टीवार गटाच्या राजेश अड्डूर यांना मोठा दिलासा मिळाला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मात्र चांगला जोरदार धक्का बसला आहे.</strong></p>
<p>हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांनी धानोरकर यांचा बाउन्सर हायकोर्टामार्फत परस्पर टोलविला असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी काँग्रेसचे गटनेते म्हणून सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मा. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या त्या आदेशाला  स्थगिती  दिली असून, पुढील सुनावणी  ६ जुलै २०२६ रोजी ठेवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजेश अड्डूर हेच सध्या काँग्रेसचे अधिकृत गटनेते पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त यांनी एक आदेश जारी करून चंद्रपूर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कार्यरत असलेले राजेश मुरली अडूर यांचे नाव रद्द केले होते. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद केली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध राजेश अड्डूर यांनी एडव्होकेट ए. एम. घारे यांच्यामार्फत हायकोर्टात रिट याचिका दाखल केली.२२ जून २०२६ रोजी या याचिकेवर मा. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि मा. न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच, अंतरिम दिलासा देत विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेते पदाबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती दिली. </p>
<p>कोर्टाच्या या स्थगिती आदेशानंतर याचिकाकर्त्यांचे वकील अँड. ए. एम. घारे यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त, नागपूर यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. हायकोर्टाच्या स्थगिती आदेशामुळे राजेश अड्डूर हेच चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कायम आहेत, त्यामुळे प्रशासनाने आता महाविकास आघाडी किंवा काँग्रेस गटाच्या वतीने राजेश अड्डूर यांच्याशिवाय इतर कोणत्याही नगरसेवकाचा किंवा व्यक्तीचा कोणताही पत्रव्यवहार अथवा संपर्क स्वीकारू नये. असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून वडेट्टीवार गटामध्ये आनंदाचे तर खासदार धानोरकर गटात मात्र सन्नाटा छा गया है.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17188/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17188/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 21:10:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_210852.png"                         length="2775220"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार</title>
                                    <description><![CDATA[<p style="text-align:left;"><strong><span style="color:rgb(0,0,0);">आधुनिक केसरी न्यूज</span></strong></p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : समाजातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव ठेऊन अ‍ॅड.वसंतराव साळुंके वकिली करीत पेशाला सामाजिक कार्याची जोडही दिली. यामुळेच ते पाचव्यांदा निवडून येऊ शकले, असे गौरवोद्गार उद्योजक मानसिंग पवार यांनी काढले. महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारणीवर अ‍ॅड.वसंतराव दिगंबरराव साळुंके यांची सलग पाचव्यांदा निवड झाली. याबद्दल नागरी सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी पैठण रोडवरील ग्रॅड कल्याण सभागृहात करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, बार कॉन्सिल सदस्य अँड राजेंद्र उमाप, अ‍ॅड.वसंतराव साळुंके, मधुमती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते साळुंके दांपत्याचा स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन आणि</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17186/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260622-wa0146.jpg" alt=""></a><br /><p style="text-align:left;"><strong><span style="color:rgb(0,0,0);">आधुनिक केसरी न्यूज</span></strong></p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : समाजातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव ठेऊन अ‍ॅड.वसंतराव साळुंके वकिली करीत पेशाला सामाजिक कार्याची जोडही दिली. यामुळेच ते पाचव्यांदा निवडून येऊ शकले, असे गौरवोद्गार उद्योजक मानसिंग पवार यांनी काढले. महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारणीवर अ‍ॅड.वसंतराव दिगंबरराव साळुंके यांची सलग पाचव्यांदा निवड झाली. याबद्दल नागरी सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी पैठण रोडवरील ग्रॅड कल्याण सभागृहात करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, बार कॉन्सिल सदस्य अँड राजेंद्र उमाप, अ‍ॅड.वसंतराव साळुंके, मधुमती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते साळुंके दांपत्याचा स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन आणि लेखन डॉ.संजय शिंदे यांनी केले. कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क, निगर्वी स्वभाव यांच्या बळावर मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमधील दिग्गजांना शह देत मराठवाडयाच्या मातीचे नाव उज्ज्वल करणारे महाराष्ट्र आणि गोवा वकीत परिषदेचे माजी चेअरमन अँड वसंतराव साळुंके यांचा पाचव्यांदा ऐतिहासिक विजय झाला आहे. १९९८ पासून सुरु असलेला हा विजयी रथ अखंडपणे पाचव्यांदा धावला. वकील परिषदेच्या इतिहासाठी हा एक सुवर्णमय किर्तिमान ठरला आहे.या निमित्त राज्यभरातून आलेल्या शेकडो वकिलांच्या हा कार्यक्रम झाला. उद्योजक मानसिंग पवार यांनी  अ‍ॅड. साळुंके यांचा वसा आणि वारसा नवीन मंडळींनी पुढे नेला पाहिजे, असे आवाहन केले. तर अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची लोकप्रियता पाहता त्यांना तहहयात सदस्य करावे, असे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले.</p>
<p><br />  सत्काराला उत्तर देताना अँड.वसंतराव साळुंके अत्यंत भावुक झाले. आपल्या यशाचे रहस्य उलगडताना ते म्हणाले, ’माझ्या आयुच्यात निवडणुकीसाठी मला कधीच कोणत्याही अवघड किवा अयोग्य गोष्टी कराव्या लागल्या नाहीत. त्यामुळे मी निवडून आलो असा अहंकार माझ्या तोंडून कधीच निघाला नाही. वकिलांनी मला निवडून दिले ही कृतज्ञतेची भावना माझ्या मनात राहील.<br />ज्येष्ठ विधिज्ञ रमेशराव धोर्डे आणि मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी साळुंके यांच्या अविरत विजयाचे गमक उलगडताना सांगितले की, ’त्यांच्या निगर्वी स्वभाव, प्रत्येकाच्या सुख-दुखात धावून जाण्याची वृत्ती, वकिलांच्या न्याय हक्कांसाठी सदैव अग्रभागी राहणे. या व अशा अनेक गोष्टींमुख ते वकिलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. केवळ वकिलीच नव्हे, त्यांच्या पर्यावरणप्रमाणे वृक्षारोपणाच्या ध्यासाचेही यावेळी बळीराम साळुंके यांनी कौतुक केले. अ‍ॅड. रवींद्र गोरे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. दीपक देशमुख यांनी सूत्रसंचालन तर अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी आभार मानले. प्रारंभी अ‍ॅड.सुनील काळदाते,अ‍ॅड. मयूर साळुंके, अ‍ॅड. अशोक ठेळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास आ. विक्रम काळे, माजी आ. मोहनराव साळुंके, अरविंद गोरे, बार कौन्सिल सदस्य अ‍ॅड.राजेंद्र बागुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17186/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17186/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 19:33:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260622-wa0146.jpg"                         length="110895"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘स्वारातीम’ विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत २४ महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, पात्र प्राचार्य व प्राध्यापकांची अनुपलब्धता तसेच शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) नियमांतील तरतुदीत त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. विद्यापीठाच्या तपासणीत ५४ महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याचे, काही ठिकाणी पात्र अध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती न झाल्याचे तसेच काही संस्थांनी ट्रिपल ए ऑनलाइन अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न केल्याचे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17184/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260622-wa0152.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत २४ महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, पात्र प्राचार्य व प्राध्यापकांची अनुपलब्धता तसेच शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) नियमांतील तरतुदीत त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. विद्यापीठाच्या तपासणीत ५४ महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याचे, काही ठिकाणी पात्र अध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती न झाल्याचे तसेच काही संस्थांनी ट्रिपल ए ऑनलाइन अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न केल्याचे निदर्शनास आले.</p>
<p>ट्रिपल ए अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न करणे, वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रयोगशाळा न उभारणे अशा महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, त्यामध्ये कै. ग्यानबाजी केशवे वरिष्ठ<br />महाविद्यालय, माहूर; महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, उस्माननगर; देविदासराव कल्याणकर महाविद्यालय, नांदेड; कै. बाबुराव इंगेवाड महाविद्यालय, वाघाळा; शिवशक्ती महाविद्यालय, काकांडी; दिगंबरराव भाऊराव पाटील महाविद्यालय, रामेश्वर; महात्मा<br />बसवेश्वर महाविद्यालय, मरखेल; राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, नरसी; कृषीरत्न शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जवळाबाजार; राजर्षी शाहू महाविद्यालय, हिंगोली; आदर्श महिला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली; विठ्ठल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी; संत तुकाराम महाविद्यालय, धानोरा; ज्ञानदीप कला व विज्ञान महाविद्यालय, मरडसगाव; कै. सिताराम पाटील महाविद्यालय, सरकळी; बाळासाहेब ठाकरे वरिष्ठ महाविद्यालय, ताडकळस आणि ब्रिलियंट महिला वाणिज्य महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच छत्रपती कला व विज्ञान महाविद्यालय, जवळाबाजार; बहिर्जी स्मारक वरिष्ठ महाविद्यालय, हट्टा; समाजप्रबोधनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कनेरगाव; कौशल्य ज्ञानवर्धिनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोरेगाव; शिवाजी महाविद्यालय, मुरूड; त्रिपुरा महाविद्यालय, लातूर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांबाबतही तपासणीसाठी प्रस्ताव व एफ ग्रेड प्राप्त झाल्याने त्यांच्या बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशावरही स्थगती घालण्यात आली आहे.</p>
<p>विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना बी.एस्सी. प्रथम वर्षासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज, परीक्षा अर्ज, हॉलतिकीट किंवा निकालासंदर्भात कोणतेही शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालय प्रशासन व संस्थेवर राहील, असा स्पष्ट इशाराही विद्यापीठाने दिला आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची विद्यापीठ मान्यता, आवश्यक प्रयोगशाळांची उपलब्धता तसेच विद्यापीठाचे अधिकृत परिपत्रक तपासूनच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17184/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17184/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 18:41:54 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260622-wa0152.jpg"                         length="84240"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोकरला मावेजासाठी शेतकऱ्याचे जलबुडी अंदोलन</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर : ता. येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी त्या परिसरातील शेतकऱ्यांची अतिरिक्त जमिन भुसंपादित केली.मावेजा देण्यासाठी संबधीत विभागाने "तारीक पे तारीक" अशी भुमिका घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २२) चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सूरू केले आहे. तालुक्यातील एकमेव सूधा प्रकल्प त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरला आहे.प्रकल्पाची १.१० मीटर ऊंची  वाढवण्यासाठी सहा गावांतील ३७.०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संबंधित जमिनीचा मावेजा देण्यासाठी शासन चालढकल करून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.या बाबत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असता  विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोडे यांनी १० जुन २०२६ पर्यंत मावेजा देण्यात येईल असे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17181/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260622-wa0144.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर : ता. येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी त्या परिसरातील शेतकऱ्यांची अतिरिक्त जमिन भुसंपादित केली.मावेजा देण्यासाठी संबधीत विभागाने "तारीक पे तारीक" अशी भुमिका घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २२) चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सूरू केले आहे. तालुक्यातील एकमेव सूधा प्रकल्प त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरला आहे.प्रकल्पाची १.१० मीटर ऊंची  वाढवण्यासाठी सहा गावांतील ३७.०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संबंधित जमिनीचा मावेजा देण्यासाठी शासन चालढकल करून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.या बाबत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असता  विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोडे यांनी १० जुन २०२६ पर्यंत मावेजा देण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषण माघार घेण्यात आले. आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ७० टक्के मावेजा देण्यात यावा,रस्ता आणि पूलाचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सुरू केले आहे. अंदोलनात प्रकल्पग्रस्त शेतकरी ऊतम बाभळे, अब्दुल रहिम करीम कुरेशी, तानाजी शिवेवार,शेख नईमोद्दिन हमीद मिया, प्रशांत शिवेवार, दत्ता कदम, बालाजी वनलवाड,माधव देवकर,संजय मुरगूलवाड,शंकर नवटक्के, सुर्यकांत वनलाड,गजानन नाईकवाड, शिवाजी चिलेवाड, शिवाजी हूबेवाड, बालाजी अटकलवाड यांचा समावेश आहे.</p>
<p># सुधा प्रकल्पाची निर्मिती करून सिंचनाची सोय करण्यात आली हि बाब आमच्यासाठी दिलासा देणारी आहे.प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी जी जमीन संपादित करण्यात आली त्याचा मावेजा देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. त्वरित मावेजा मिळावा अन्यथा पूढिल काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.<br />(ऊत्तम बाभळे, शेतकरी) आम्हाला सिंचनाची व्यवस्था केल्याने समाधानी आहोत पण दूस-या टप्प्यातील कामाचा मावेजा देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. कुणाच्या दबावाखाली येऊन  आमच्या वर अन्याय करीत आहे हे समजत नाही. राजकारण बाजूला ठेवून आम्हाला न्याय देण्यात यावा.<br />(शेख नईमोद्दिन हमीद मिया, शेतकरी)</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17181/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17181/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 18:37:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260622-wa0144.jpg"                         length="65634"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर यांची हकालपट्टी..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : युवासेना उबाठा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाच्या निवडणूक निकालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. <br />शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यां सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर जहीरी टिका केली होती. त्या टिकेला युवासेना सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे शिवसेना</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17179/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_152934.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : युवासेना उबाठा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाच्या निवडणूक निकालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. <br />शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यां सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर जहीरी टिका केली होती. त्या टिकेला युवासेना सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या गोटात खळबळ माजली होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. २२ जून रोजी नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीचा निकाल जाहीर होताच कृष्णा पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे हत्यार उगारण्यात आले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली आहे.  त्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना दुहेरी धक्का बसला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17179/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17179/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 15:31:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_152934.jpg"                         length="199680"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गोंदिया : रामनगर पोलीस ठाणे अतंर्गत ​सूर्याटोला येथील रेल्वे चौकीसमोर आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी हा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला (Forensic Expert) पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने आणि पुरावे हस्तगत केले आहेत.</p>
<p>​ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17177/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_152134.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गोंदिया : रामनगर पोलीस ठाणे अतंर्गत ​सूर्याटोला येथील रेल्वे चौकीसमोर आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी हा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला (Forensic Expert) पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने आणि पुरावे हस्तगत केले आहेत.</p>
<p>​ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरिय तपासणीसाठी (Post-Mortem) रुग्णालयात पाठवला आहे. मृत महिला कोण आहे आणि ती कुठली रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. या महिलेची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या असल्यास किंवा मृत महिलेबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17177/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17177/crime</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 15:27:13 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_152134.jpg"                         length="141008"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर हे पराभुत झाले आहेत. माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मते पडली असून कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना केवळ ५ मते मिळाली आहेत. २३ मते बाद झाली आहेत. दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17174/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_131621.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर हे पराभुत झाले आहेत. माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मते पडली असून कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना केवळ ५ मते मिळाली आहेत. २३ मते बाद झाली आहेत. दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला आहे. <br />नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाची द्वैवार्षिक निवडणूक १८ जून रोजी पार पडली होती. ४५२ मतांपैकी ४५१ मतदान झाले होते. मुदखेड नगरपालिकेतील एका महिला नगरसेविकेने मतदान केले नव्हते. २२ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरवातीला सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या उघडून सर्व मते एकत्रित करण्यात आली. त्यानंतर २५ मतांचे गठ्ठे तयार करुन एकत्र करण्यात आली. तीन टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना ११२ तर शिवसेना उबाठा गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांना २२ मते मिळाली व वंचितचे प्रशांत इंगोले यांना ३ मते मिळाली. १४ मते बाद झाली. दुसऱ्या फेरीत राजूरकर यांना ११५ तर आष्टीकर यांना ३० मते मिळाली. इंगोले यांना २ मते मिळाली. तीन मते बाद झाली. तिसऱ्या फेरीत राजूरकर यांना ११२ तर आष्टीकर यांना ३२ मिळाली व वंचितचे प्रशांत इंगोले यांना शुन्य मते मिळाली. तर ६ मते बाद झाली. भाजपाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ४५१ मतांपैकी ३३९ मते मिळाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यापेक्षा २५५ मते अधिक घेत दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ आणि वंचितचे उमेदवार इंगोले यांना ५ मते मिळाली. २३ मते ही बाद झाली आहेत.<br />विजयी उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे. <br />नांदेड विधान परिषद निवडणूक मतमोजणी निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाल्याचे कळताच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याचे कळताच जोरदार घोषणाबाजी करत गुलाची उधळण करीत जल्लोष साजरा केला आहे.<br />नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भाजपाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी होताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमा होऊन  विजयाचा जल्लोष साजरा करत होते. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री डि पी सावंत, महापौर कविता मुळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापु देशमुख, संजय कौडगे, माधव कदम , नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, दिनकर दहीफळे, नगरसेवक किशोर स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, राजूरकर यांचे चिरंजीव अशितोष राजूरकर, माजी महापौर विजय येवनकर, कैलास गोरठेकर, गिरीश गोरठेकर, भाऊसाहेब गोरठेकर, प्रविण साले, प्रविण सारडा, नगरसेवक वैजनाथ देशमुख, महेन्द्र देमगुंडे, यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. </p>
<p>राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी<br />नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गेल्या तीन वर्षांपासून निवडणूका झाल्या नव्हत्या मात्र नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी या निवडणुकीत ३३९ मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. </p>
<p>महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट<br />नांदेड जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या मतांची संख्या ही १५० पेक्षा जास्त असतांना महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळाली आहेत. तसेच एम आय एम पक्षाची १५ मते होती ती मते कोणाच्या पारड्यात पडली यांचा अंदाज येत नाही. मात्र जी मते बाद झाली आहेत. त्यात एम आय एम पक्षाचे मते असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत महाविकास आघाडीच्या मतात मोठी फाटाफूट झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सुरवाती पासून एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p><br />सर्वांचे आभार - खा. अशोकराव चव्हाण<br />महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीची विजयी घोडदौड दिसून येते आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सुद्धा भाजप महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. महायुतीच्या राज्यातील सर्वच विजयी उमेदवारांचे ही मी अभिनंदन करतो. महायुतीच्या या विजया मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,  सुनेत्राताई पवार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांचे मार्गदर्शन तसेच महायुतीचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. महायुतीच्या या विजयासाठी सर्वांचेच अभिनंदन व आभार माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17174/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17174/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 13:23:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_131621.jpg"                         length="281167"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        