<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/author/4/aadhunik-kesari" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>Aadhunik Kesari - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/author/4/rss</link>
                <description>Aadhunik Kesari RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>म्हसवड : सातारा जिल्ह्यातील विकासनगर परिसरात प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा अवघ्या १२ दिवसांत झालेला संशयास्पद मृत्यू हा अत्यंत गंभीर व चिंताजनक प्रकार असून या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मृत तरुणी भाग्यश्री संजय मोटे (वय २१) हिने दि. ३० मार्च २०२६ रोजी राजकुमार कांबळे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही दिवसांतच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले. मुलीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सासरच्या मंडळींकडून ५ लाख रुपये व ५ तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी पूर्ण न केल्याने तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.</p>
<p>दि. १२ एप्रिल रोजी रात्री संबंधित तरुणीला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>म्हसवड : सातारा जिल्ह्यातील विकासनगर परिसरात प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा अवघ्या १२ दिवसांत झालेला संशयास्पद मृत्यू हा अत्यंत गंभीर व चिंताजनक प्रकार असून या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मृत तरुणी भाग्यश्री संजय मोटे (वय २१) हिने दि. ३० मार्च २०२६ रोजी राजकुमार कांबळे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही दिवसांतच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले. मुलीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सासरच्या मंडळींकडून ५ लाख रुपये व ५ तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी पूर्ण न केल्याने तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.</p>
<p>दि. १२ एप्रिल रोजी रात्री संबंधित तरुणीला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती देण्यात आली; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूमागील कारणांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पती, सासू व इतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी तातडीने व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16975/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16975/maha</guid>
                <pubDate>Wed, 15 Apr 2026 11:24:43 +0530</pubDate>
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>वरोडा : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंग ला आज दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास दहा ते बारा हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत 10 करोड रुपये आहे नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी चारच्या सुमारास जिनिंगला लागलेली ही आग विझवण्यासाठी विविध ठिकाणांचे आठ बंब प्रयत्न करत असतानाही वृत्त लिहीस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती.</p>
<p>आग लागल्याचे वृत्त कळताच प्रशासन खडबडून जागी झाले.  तहसीलदार योगेश कौटकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, उपविभागीय पोलीस</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16973/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img_20260413_202432.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>वरोडा : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंग ला आज दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास दहा ते बारा हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत 10 करोड रुपये आहे नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी चारच्या सुमारास जिनिंगला लागलेली ही आग विझवण्यासाठी विविध ठिकाणांचे आठ बंब प्रयत्न करत असतानाही वृत्त लिहीस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती.</p>
<p>आग लागल्याचे वृत्त कळताच प्रशासन खडबडून जागी झाले.  तहसीलदार योगेश कौटकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल,पोलीस निरीक्षक सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह त्वरने  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली. ही आग विझवण्यासाठी वणी, वरोडा, भद्रावती नगरपरिषदेचे तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती, जीएमआर, साई वर्धा, डब्लू सी एल आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु चार तास झाले असतानाही आग विझवण्यात यश आले नव्हते. या आगीत जिनिंग मधील कापूस हलविण्यासाठी उपयोगात येणारे एक वाहन जळून खाक झाले.</p>
<p>आग विझवण्याचा महिलेचा केविलवाणा प्रयत्न<br />जिनिंग मध्ये कर्मचाऱ्यांच्या चहापानाची व्यवस्था करणारी गिताबाई नामक महिला कर्मचारी मात्र लागलेली ही प्रचंड आग बादलीने विझवण्याचा केविलवाणा  प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. गेले दोन दिवस जिनींग मागील कामकाज बंद होते. त्यामुळे आगीचे कारण समजू शकले नाही. या सुट्टीत जिनींग मध्ये काही काम केल्या जात असल्याची चर्चाही दबक्या आवाजात परिसरात ऐकावयास मिळाली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16973/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16973/maha</guid>
                <pubDate>Mon, 13 Apr 2026 20:28:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img_20260413_202432.jpg"                         length="723068"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात उघडकीस आली. सदर वाघ हा चार दिवसांपूर्वीच विहीरीत पडला असावा असा प्राथमीक अंदाज आहे. या घटनेने वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.</p>
<p>  प्राप्त माहितीनुसार<br />तिरोडा वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र वडेगाव अंतर्गत गट क्र. २६४ माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16971/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0138.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात उघडकीस आली. सदर वाघ हा चार दिवसांपूर्वीच विहीरीत पडला असावा असा प्राथमीक अंदाज आहे. या घटनेने वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.</p>
<p> प्राप्त माहितीनुसार<br />तिरोडा वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र वडेगाव अंतर्गत गट क्र. २६४ माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे जलद बचाव पथक व तिरोडा वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विजय धांडे, नवीन नागझिराचे सहाय्यक वनसंरक्षक मनिषा चव्हाण, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत, टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनीही भेट देऊन पाहणी केली. यावेळी एनटीसीए प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, मानद-वन्यजीव रक्षक सावन बहेकार, राजेश भनदिर्गे, एलडीओ प्रविण सोनवाने, मेघराज तुलावी यांच्या उपस्थितीत सदर वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर वाघ हे शिकारीच्या बेताने पाठलाग करीत असताना अचानकपणे कठडे नसलेल्या विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पुढील तपास सहायक वनसंरक्षक विजय धांडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रविकमल भगत करीत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16971/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16971/maha</guid>
                <pubDate>Mon, 13 Apr 2026 06:53:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0138.jpg"                         length="73910"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर : गुरूंचा महिमा आपल्याला संतांनी सांगितला आणि त्यांच्या ग्रंथांतून तो आपल्याला आजही वाचायला मिळतो. तीच परंपरा आजही अनेकदा पाहायला मिळते. आजच्या कार्यक्रमात एका गुरु-शिष्याचे हेच नाते दिसून येत असून ‘ऊब ही महीतली’ या शीर्षकातला ऊब हा शब्द सर्जनाचे प्रतिनिधित्व करतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. पक्षी आपली अंडी उबवताना अंड्यांना ऊब देत नवनिर्मिती करतात, त्याच अर्थाने एका गुरुकडून सर्जनशीलपणे शिष्याचे ज्ञानपोषण कसे होते हे या निमित्ताने पाहायला मिळत असल्याचे उद्गारही अंभुरे यांनी काढले. सुप्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगोर्‍यांना कविवर्य प्रा. इंद्रजित भालेराव यांनी सजवलेल्या ‘ऊब ही महीतली’ या पुस्तकाच्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16969/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0131.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर : गुरूंचा महिमा आपल्याला संतांनी सांगितला आणि त्यांच्या ग्रंथांतून तो आपल्याला आजही वाचायला मिळतो. तीच परंपरा आजही अनेकदा पाहायला मिळते. आजच्या कार्यक्रमात एका गुरु-शिष्याचे हेच नाते दिसून येत असून ‘ऊब ही महीतली’ या शीर्षकातला ऊब हा शब्द सर्जनाचे प्रतिनिधित्व करतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. पक्षी आपली अंडी उबवताना अंड्यांना ऊब देत नवनिर्मिती करतात, त्याच अर्थाने एका गुरुकडून सर्जनशीलपणे शिष्याचे ज्ञानपोषण कसे होते हे या निमित्ताने पाहायला मिळत असल्याचे उद्गारही अंभुरे यांनी काढले. सुप्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगोर्‍यांना कविवर्य प्रा. इंद्रजित भालेराव यांनी सजवलेल्या ‘ऊब ही महीतली’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. या कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. कैलास अंभुरे आणि प्राचार्य विवेक मिरगणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.</p>
<p>प्राइड सेंचुरी कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड, बा. भो. शास्त्री, कविवर्य फ. मुं. शिंदे, नंदिनी चपळगावकर, प्रवीण बर्दापूरकर, अनंतराव उमरीकर, हनुमानदास वर्मा, राधाकृष्ण मुळी, कविवर्य दासू वैद्य आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.<br />पुढे बोलताना अंभुरे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे इंद्रजित भालेराव यांच्या मनात आपल्या गुरुवर्यांबद्दल असलेला आदर, व्याकुळता, आर्तता, गुरुनिष्ठा आदी सर्वच भावनांचा सुंदर मेळा असून रसाळ सरांच्या साहित्यविषयक, समीक्षाविषयक अनेक गुणांचे पदर या पुस्तकातून उलगडले गेले आहेत. एखाद्या विषयासाठी वाहून घेऊन तळमळीने एखादे काम उभे करणे म्हणजे काय असते हे रसाळ सरांकडून आजच्या आमच्या पिढीने समजून उमजून घेतले पाहिजे असेही यावेळी अंभुरे म्हणाले.<br />सुधीर रसाळ आणि त्यांच्या पत्नी सुमती रसाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर बालाजी काळे यांनी ‘सुंदर ते ध्यान’ हा अभंग गाऊन सभागृहातले वातावरण प्रसन्न केले. त्यानंतर  उपस्थित पाहुण्याचे स्वागत  आदित्य प्रकाशनाचे प्रकाशक विलास फुटाणे यांनी केले त्यानंतर इंद्रजित भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात रसाळ सरांबद्दलच्या भावना व्यक्त करत पुस्तकाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य विवेक मिरगणे यांनी यावेळी रसाळ सरांच्या कारकीर्दीतल्या अनेक आठवणी सांगून त्यांच्या शिकवण्याच्या वैशिष्ट्याचे आजही महात्म्य टिकून असून आजची प्राध्यापकांची पिढी त्यांच्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांचे शिकवणे जीवाचा कान करून ऐकणारे विद्यार्थी आजही त्यांचा अभिमानाने उल्लेख करत असतात, असे सांगून रसाळ सरांनी, मसाप किंवा सरस्वती भुवन या संस्थांसाठी ज्या निकोपपणे काम केले, ते आजही आम्ही विसरलेलो नाही आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सरस्वती भुवन संस्था पुढे नेत राहू, असेही मिरगणे यांनी याप्रसंगी त्यांना आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चव्हाळ यांनी केले, तर बबन आव्हाड यांनी आभार मानले.</p>
<p>इंद्रजितने माझे चरित्रच उभे केले<br />आज या अवचित कार्यक्रमामुळे मी संकोचून गेलो आहे आणि आनंदूनही गेलो आहे. कारण एक शेतकर्‍याचा मुलगा साहित्यात रुची ठेवून रसज्ञ होतो, नरहर कुरुंदकरांसारख्या मोठ्या समीक्षकाच्या सान्निध्यात राहून साहित्य समजून घेतो हे पाहताना मला फार आनंद व्हायचा. त्याचे प्रेमळ बोलणे मला जास्त भावून जाते अशी भावना सत्कारमूर्ती सुधीर रसाळ यांनी बोलून दाखवली. या पुस्तकातून माझ्या साहित्याच्या अंगाने माझे चरित्रच त्याने उभे केल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16969/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16969/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 20:48:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0131.jpg"                         length="132420"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले, तर त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला, जणू काळजाशी जपलेली आपल्या भूमीची ओळखच. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16967/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0130.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले, तर त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला, जणू काळजाशी जपलेली आपल्या भूमीची ओळखच. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळा दि. ७ सप्टेंबर १९९३ ला झाला होता. त्यावेळी आशाताई भोसले व ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडेदादा यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी जैन हिल्स येथे त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही मनात ताजा आहे, साधेपणाने, प्रेमाने आणि आत्मीयतेने झालेला संवाद आजही स्मरणात कोरलेला आहे. त्यांच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. अशी स्वरसम्राज्ञी आता आपल्यात नसली तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व सदैव जिवंत राहील.</p>
<p>अशोक भवरलाल जैन,<br />अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16967/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16967/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 20:44:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0130.jpg"                         length="634021"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मंठा : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून  कारवाई करण्यात आली.<br />धाडीदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16965/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0128.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मंठा : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून  कारवाई करण्यात आली.<br />धाडीदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू नष्ट करण्यात आली.याप्रकरणी अविनाश भगवान गायकवाड राहणार मंठा बीके कॉर्नर इंदिरानगर विनायक नारायण इंगोले राहणार मंठा या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>ही कारवाई पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, फौजदार संतोष माळगे, विठ्ठल केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी आनंद ढवळे, मंगेश चौरे, सतीश आमटे, शिवानंद काळुसे, संतोष बनकर, मुंजा कोलगणे, जगन्नाथ सुक्रे आणि महिला पोलीस कर्मचारी सुला मरकड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.<br />मंठा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16965/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16965/crime</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 20:40:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0128.jpg"                         length="1473156"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजाने संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. आशाताई यांच्या निधनाने भारतावर शोककळा पसरली आहे. विविध भाषेत गाताना मराठी भाषेची कास न सोडणाऱ्या त्या गायिका होत्या. महाराष्ट्राच्या मातीतील हिरा आपण गमावला. या लोकप्रिय गायिकेच्या जाण्याने संगीत क्षेत्राची हानी झाली. आज आपण लोकप्रिय गायिकेला गमावले मी माझ्या कुटुंब आणि पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16963/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0109.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजाने संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. आशाताई यांच्या निधनाने भारतावर शोककळा पसरली आहे. विविध भाषेत गाताना मराठी भाषेची कास न सोडणाऱ्या त्या गायिका होत्या. महाराष्ट्राच्या मातीतील हिरा आपण गमावला. या लोकप्रिय गायिकेच्या जाण्याने संगीत क्षेत्राची हानी झाली. आज आपण लोकप्रिय गायिकेला गमावले मी माझ्या कुटुंब आणि पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16963/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16963/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 17:29:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0109.jpg"                         length="210497"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : भारतीय संगीतविश्वाला आपल्या स्वरांनी मोहिनी घालणाऱ्या, सुरांच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या आयुष्यात आनंद, वेदना आणि भावना जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून, भारतीय संस्कृतीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा, चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला आहे, अशा अत्यंत भावुक शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या एक युग होत्या. एक अखंड वाहणारी सुरांची गंगा होत्या. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावना जिवंत व्हायच्या, प्रत्येक सुरामध्ये जीवनाचा स्पंदन असायचे . त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या सुख-दुःखांना शब्द आणि स्वर दिले. त्यामुळेच त्यांचे जाणे हे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16961/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0096.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : भारतीय संगीतविश्वाला आपल्या स्वरांनी मोहिनी घालणाऱ्या, सुरांच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या आयुष्यात आनंद, वेदना आणि भावना जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून, भारतीय संस्कृतीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा, चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला आहे, अशा अत्यंत भावुक शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या एक युग होत्या. एक अखंड वाहणारी सुरांची गंगा होत्या. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावना जिवंत व्हायच्या, प्रत्येक सुरामध्ये जीवनाचा स्पंदन असायचे . त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या सुख-दुःखांना शब्द आणि स्वर दिले. त्यामुळेच त्यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे निधन नसून, एका संपूर्ण सांस्कृतिक पर्वाचा अंत असल्याची जाणीव मनाला चटका लावणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p>माझ्या सांस्कृतिक कार्य मंत्री पदाच्या कार्यकाळात आशाताईंना महाराष्ट्र भूषण हा सन्मान देण्यात आला हे मी माझे परमभाग्य समजतो. </p>
<p>सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून कार्य करत असताना आशाताईंशी अनेकदा भेटण्याचा योग आला होता. त्या प्रत्येक भेटीत त्यांचे साधेपण, आत्मीयता आणि कलेप्रती असलेली अविचल निष्ठा मनाला स्पर्शून जायची. त्यांच्याशी झालेल्या त्या संवादांच्या, त्या क्षणांच्या आठवणी आज मनाला खोलवर भिडत आहेत. आज त्या आठवणींचाच आधार घेऊन त्यांना स्मरावे लागत आहे, हीच सर्वात मोठी वेदना असल्याची भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आशाताईंचा स्वर आज जरी शांत झाला असला, तरी त्यांचे गीत, त्यांची कला आणि त्यांचा अमर वारसा काळाच्या पलीकडे जिवंत राहील. त्यांच्या सुरांचा गंध हा युगानुयुगे भारतीयांच्या मनात दरवळत राहील. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या अपार दुःखाचा सामना करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16961/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16961/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 16:45:50 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0096.jpg"                         length="105208"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, भारतीय संगीत विश्वासाठी ही एक अतुलनीय हानी आहे. आपल्या विलक्षण, सुमधुर आवाजाच्या जोरावर त्यांनी गेल्या आठ दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीने केवळ हिंदीच नव्हे, तर विविध भारतीय भाषांतील संगीताला समृद्ध केले आणि भारतीय संगीताचा गोडवा जगभर पोहोचवला. त्यांच्या जाण्याने आज अजरामर सुरांचा सुरेल प्रवास आणि संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.</p>
<p>          आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गात संगीतसृष्टीला अनमोल ठेवा दिला. त्यांच्या प्रत्येक गाण्यात भाव, अभिव्यक्ती आणि सुरेलपणाची अद्वितीय सांगड दिसून येत असे.<br />त्यांच्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16959/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0095.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, भारतीय संगीत विश्वासाठी ही एक अतुलनीय हानी आहे. आपल्या विलक्षण, सुमधुर आवाजाच्या जोरावर त्यांनी गेल्या आठ दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीने केवळ हिंदीच नव्हे, तर विविध भारतीय भाषांतील संगीताला समृद्ध केले आणि भारतीय संगीताचा गोडवा जगभर पोहोचवला. त्यांच्या जाण्याने आज अजरामर सुरांचा सुरेल प्रवास आणि संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.</p>
<p>     आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गात संगीतसृष्टीला अनमोल ठेवा दिला. त्यांच्या प्रत्येक गाण्यात भाव, अभिव्यक्ती आणि सुरेलपणाची अद्वितीय सांगड दिसून येत असे. शास्त्रीय, सुगम संगीत, गझल, लोकसंगीत, चित्रपट गीत अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, लयबद्धता आणि भावनिक तरलता यामुळे त्यांच्या गीतांना आजही तितकीच लोकप्रियता आहे.<br />त्यांच्या गायकीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून, नवोदित कलाकारांसाठी त्या सदैव आदर्श राहिल्या आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ महानच नव्हे, तर अजरामर आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि श्री माता महाकाली त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोक संदेशातून केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16959/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16959/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 16:39:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0095.jpg"                         length="404581"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चिंचोली लिंबाजी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व पिकांचे नुकसान कारणीभूत</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड)  येथील तरुण शेतकरी दिपक किसन दांगोडे (वय ३५) यांनी शनिवार(ता.१२) पहाटे सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपक दांगोडे हे शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या वडिलांच्या नावे चिंचोली लि. शिवारातील गट क्रमांक ३७२ मध्ये सुमारे ०.८९ आर जमीन आहे. या जमिनीवर वि. वि. का. सेवा सहकारी सोसायटी, चिंचोली लिंबाजी यांचे सुमारे 37500 रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. तसेच नातेवाईक व मित्रांकडूनही हात उसनवारी घेतल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मात्र, हे कर्ज ७/१३ उताऱ्यावर नोंदलेले नसल्याचेही</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16956/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0061.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड)  येथील तरुण शेतकरी दिपक किसन दांगोडे (वय ३५) यांनी शनिवार(ता.१२) पहाटे सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपक दांगोडे हे शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या वडिलांच्या नावे चिंचोली लि. शिवारातील गट क्रमांक ३७२ मध्ये सुमारे ०.८९ आर जमीन आहे. या जमिनीवर वि. वि. का. सेवा सहकारी सोसायटी, चिंचोली लिंबाजी यांचे सुमारे 37500 रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. तसेच नातेवाईक व मित्रांकडूनही हात उसनवारी घेतल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मात्र, हे कर्ज ७/१३ उताऱ्यावर नोंदलेले नसल्याचेही सांगितले जाते. यावर्षी खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी तसेच अलीकडील गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जफेडीची चिंता वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.<br />मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.<br />दरम्यान, मागील पंधरवड्यात कर्जबाजारीपणा व गारपीटीमुळे परिसरातील दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने तात्काळ मदत व योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16956/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16956/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 13:09:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0061.jpg"                         length="422937"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लग्नाला जात असताना भीषण अपघात : बहीन,भाऊ जागीच ठार</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ११ एप्रिल सायं. अंदाजे ६:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अंकुर अरुण शहारे (वय-१८ रा.देवरी) आणि रितिका संजय जांभुळकर (वय-१०, रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी) असे मृत बहीण भावाचे नाव आहे. तर अरुणा अरुण शहारे (वय ५० रा. देवरी) असे जखमी आईचे नाव आहे. जखमीला तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.</p>
<p>सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्याला होते. आणि</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16954/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260412-wa0052.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ११ एप्रिल सायं. अंदाजे ६:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अंकुर अरुण शहारे (वय-१८ रा.देवरी) आणि रितिका संजय जांभुळकर (वय-१०, रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी) असे मृत बहीण भावाचे नाव आहे. तर अरुणा अरुण शहारे (वय ५० रा. देवरी) असे जखमी आईचे नाव आहे. जखमीला तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.</p>
<p>सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्याला होते. आणि रितिका ही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. वडील कोरोना काळामध्ये वारल्यामुळे घरची जबाबदारी ही आई अरुणा हिच्या अंगावर होती.</p>
<p>अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोळदे येथे आज त्यांचे नातलगाचे लग्न सभारंभाचे कार्यक्रम असल्या कारणामुळे ते आपल्या तिघेही दुचाकीवरून देवरी वरून बोळदे येथे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास अर्जुनी/मोर तालुक्यातील नवेगाव/बांध येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडले. या भीषण अपघातात अंकुर तसेच त्याची बहीण रितिका यांच्या शरीरावरून वाहन गेल्याने त्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर आई अरुणा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16954/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16954/maha</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 13:06:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260412-wa0052.jpg"                         length="39905"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर, दि.11 : राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावरून तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथून प्राप्त माहितीनुसार  11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.45 वाजता सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी नोंदविण्यात आली. याचा केंद्रबिंदु चंद्रपूर जिल्ह्यातील  हार्दोना (ता. राजुरा) गावाजवळ असल्याचे कळते. सदर धक्का हा अती सौम्य प्रकारचा आहे . या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नाही. याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी  केले आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवित</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16952/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260411-wa0212.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर, दि.11 : राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावरून तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथून प्राप्त माहितीनुसार  11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.45 वाजता सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी नोंदविण्यात आली. याचा केंद्रबिंदु चंद्रपूर जिल्ह्यातील  हार्दोना (ता. राजुरा) गावाजवळ असल्याचे कळते. सदर धक्का हा अती सौम्य प्रकारचा आहे . या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नाही. याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी  केले आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. तसेच नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल, अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16952/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16952/maha</guid>
                <pubDate>Sat, 11 Apr 2026 21:36:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260411-wa0212.jpg"                         length="484406"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        